शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत चेंगराचेंगरीमुळे गेला ३१ जणांचा जीव, अभिनेत्याला पाहण्याचा नादात मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
5
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
6
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
7
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
8
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
9
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
10
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
11
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
12
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
13
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
14
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
15
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
16
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
17
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
18
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
19
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
20
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

ठाण्यात यापुढे झाडे तोडण्यावर बंदी

By admin | Updated: April 28, 2016 03:39 IST

ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता आणखी एक चपराक लगावली आहे.

ठाणे : जागतिक वसुंधरा दिनाच्या दिवशीच १४०० वृक्ष तोडीचे प्रस्ताव पटलवार आणणाऱ्या ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता आणखी एक चपराक लगावली आहे. शहरामधील हरित क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने आणि झाडांचे संरक्षण करण्याच्यादृष्टीने यापुढे विकासकाला विकास प्रस्तावातंर्गत बाधित होणारे वृक्ष तोडण्याची परवानगी न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दिले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली १४०० वृक्ष तोडीचे प्रस्ताव पटलावर आले होते. त्याला जबरदस्तीने मंजुरीही देण्यात आली. परंतु, या संदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, आयुक्तांनी त्याची दखल घेऊन पोखरण रोड नं. २ मधील एकाही वृक्षाला बाधा होणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता हा महत्त्वाचा निर्णय घेऊन वृक्ष प्राधिकरण समिती आणि पालिकेतील काही अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. ठाणे शहरात पाच लाख वृक्ष लागवड योजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी आयुक्तांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती संजय वाघुले, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपआयुक्त (उद्यान) ओमप्रकाश दिवटे यांच्यासह वन विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.वृक्ष संवर्धनासाठी जयस्वाल यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची घोषणा केली आहे. या समितीत मनपा पदाधिकाऱ्यांसोबतच वृक्ष मित्रांचाही समावेश असणार आहे. वृक्षतोडीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीकडे जे प्रस्ताव प्राप्त होतात ते आधी या विशेष समिती समोर येतील. त्यानंतरच ते वृक्ष प्राधिकरण समिती समोर सादर करण्यात येणार आहेत. या पुढे कुठल्याही विकासकाला विकास प्रस्तावातंर्गत बाधित होणारी झाडे तोडण्याची परवानगी न देता ती झाडे त्यांनी पुनर्रोपण करण्याची परवानगी देण्यात येईल. त्याचप्रमाणे पूर्वीच्या एका झाडास ५ झाडे लावण्याचा जो नियम होता त्याऐवजी आता एका झाडासाठी १५ झाडे लावणे बंधनकारक असेल.