शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

सर्व डाळींवरील निर्यातबंदी उठवली; शेतक-यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:24 IST

यंदाप्रमाणे पुढील वर्षीही देशात कडधान्यांचे व पर्यायाने डाळींचे मुबलक उत्पादन होईल हे लक्षात घेऊन आणि शेतकºयांना विक्रीच्या अधिक संधी उपलब्ध होऊन चांगली किंमत मिळावी

नवी दिल्ली/ मुंबई : यंदाप्रमाणे पुढील वर्षीही देशात कडधान्यांचे व पर्यायाने डाळींचे मुबलक उत्पादन होईल हे लक्षात घेऊन आणि शेतकºयांना विक्रीच्या अधिक संधी उपलब्ध होऊन चांगली किंमत मिळावी हे उद्दिष्ट डोळ््यापुढे ठेवून केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व प्रकारच्या डाळींवरील निर्यातबंदी उठविण्यास मंजुरी दिली. शेतकºयांसाठी ही आनंदाची बाब असली तरी ग्राहकांसाठी मात्र यामुळे डाळींचे दर काहीसे वाढण्याची शक्यता आहे.यंदा सर्वच डाळींचे दमदार पिक देशांत आले. मागीलवर्षीच्या १६० लाख टनाच्या तुलनेत यंदा २३० लाख टन डाळींचे उत्पादन देशात झाले. मागणी २३५ ते २४० लाख टन असताना भरमसाठ उत्पादनामुळे शेतकºयांच्या मालाला किमान आधारभूत किंमतदेखील मिळत नव्हती.यामुळे केंद्र सरकारने शेतकºयांकडून आधारभूत किंमत अथवा बाजारभाव जोे अधिक असेल त्या दरावर २० लाख टन डाळी खरेदी केल्या आहेत. तरीही शेतकºयांंच्या पिकाला दरच मिळत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी आयातबंदी लावण्यात आली होती. याआधी तूर, मसूर व चणाडाळीवरील निर्यातबंदी टप्प्याने उठविली गेली होती. आता ती सर्वच डाळींच्या बाबतीत लागू करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या आर्थिक विषयक समितीने घेतला.हा निर्णय तात्विक स्वरूपाचा आहे व त्यामुळे कोणालाही, कोणत्याही डाळीची कितीही निर्यात लगेच करता येईल, असे नाही.कारण देशांतर्गत डाळींचे उत्पादन, उपलब्धता, मागणी, आंतरराष्टÑीय बाजारातील उलाढाल, आयात-निर्यातीचे चित्र यांचा अभ्यास करुन किती निर्यात करू द्यायची, कोणत्या डाळींची निर्यात करू द्यायची व त्यासाठी किती निर्यात शुल्क आकारायचे याचा निर्णय घेण्यासाठी विविध खात्यांच्या सचिवांची एक समितीही नेमण्यात आली आहे. ही समिती प्राप्त परस्थितीनुसार वेळोवेळी निर्णय घेईल.

टॅग्स :Farmerशेतकरी