शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

सर्व डाळींवरील निर्यातबंदी उठवली; शेतक-यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:24 IST

यंदाप्रमाणे पुढील वर्षीही देशात कडधान्यांचे व पर्यायाने डाळींचे मुबलक उत्पादन होईल हे लक्षात घेऊन आणि शेतकºयांना विक्रीच्या अधिक संधी उपलब्ध होऊन चांगली किंमत मिळावी

नवी दिल्ली/ मुंबई : यंदाप्रमाणे पुढील वर्षीही देशात कडधान्यांचे व पर्यायाने डाळींचे मुबलक उत्पादन होईल हे लक्षात घेऊन आणि शेतकºयांना विक्रीच्या अधिक संधी उपलब्ध होऊन चांगली किंमत मिळावी हे उद्दिष्ट डोळ््यापुढे ठेवून केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व प्रकारच्या डाळींवरील निर्यातबंदी उठविण्यास मंजुरी दिली. शेतकºयांसाठी ही आनंदाची बाब असली तरी ग्राहकांसाठी मात्र यामुळे डाळींचे दर काहीसे वाढण्याची शक्यता आहे.यंदा सर्वच डाळींचे दमदार पिक देशांत आले. मागीलवर्षीच्या १६० लाख टनाच्या तुलनेत यंदा २३० लाख टन डाळींचे उत्पादन देशात झाले. मागणी २३५ ते २४० लाख टन असताना भरमसाठ उत्पादनामुळे शेतकºयांच्या मालाला किमान आधारभूत किंमतदेखील मिळत नव्हती.यामुळे केंद्र सरकारने शेतकºयांकडून आधारभूत किंमत अथवा बाजारभाव जोे अधिक असेल त्या दरावर २० लाख टन डाळी खरेदी केल्या आहेत. तरीही शेतकºयांंच्या पिकाला दरच मिळत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी आयातबंदी लावण्यात आली होती. याआधी तूर, मसूर व चणाडाळीवरील निर्यातबंदी टप्प्याने उठविली गेली होती. आता ती सर्वच डाळींच्या बाबतीत लागू करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या आर्थिक विषयक समितीने घेतला.हा निर्णय तात्विक स्वरूपाचा आहे व त्यामुळे कोणालाही, कोणत्याही डाळीची कितीही निर्यात लगेच करता येईल, असे नाही.कारण देशांतर्गत डाळींचे उत्पादन, उपलब्धता, मागणी, आंतरराष्टÑीय बाजारातील उलाढाल, आयात-निर्यातीचे चित्र यांचा अभ्यास करुन किती निर्यात करू द्यायची, कोणत्या डाळींची निर्यात करू द्यायची व त्यासाठी किती निर्यात शुल्क आकारायचे याचा निर्णय घेण्यासाठी विविध खात्यांच्या सचिवांची एक समितीही नेमण्यात आली आहे. ही समिती प्राप्त परस्थितीनुसार वेळोवेळी निर्णय घेईल.

टॅग्स :Farmerशेतकरी