शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

हिंदुस्थानात येण्यासाठी लढा देणारे बलुची नेतेही स्वातंत्र्य योद्धे - उद्धव ठाकरे

By admin | Updated: August 24, 2016 08:21 IST

काश्मीरमध्ये मारले गेलेले व हिंसाचार करणारे लोक पाकिस्तानच्या दृष्टीने स्वातंत्र्यसैनिक असतील, तर बलुची नेतेही स्वातंत्र्य योद्धेच आहेत असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे

- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - 'काश्मीरमध्ये मारले गेलेले व हिंसाचार करणारे लोक पाकिस्तानच्या दृष्टीने स्वातंत्र्यसैनिक असतील, तर मग हिंदुस्थानात येण्यासाठी लढा देणारे बलुची नेतेही स्वातंत्र्य योद्धेच आहेत असे आम्ही मानतो. पंतप्रधानांचे यावर काय म्हणणे आहे?', असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारला आहे. 
 
'कश्मीरात वातावरण सुधारायचे असेल तर हुरियतवाले व पाकिस्तानबरोबर चर्चा व्हावी, असे जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना वाटते. हे काही बरोबर नाही. रस्त्यावर उतरणार्‍यांना कायद्याचा व पोलिसांचा धाक नाही व लष्करावर दगड मारणे हे राष्ट्रप्रेम नाही', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 
 
संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे - 
- पंतप्रधान मोदी यांचे समर्थन बलुची नेत्यांना भारी पडले आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यवादी नेत्यांवर पाकिस्तान सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे व त्यांना आता तुरुंगाची हवा खावी लागेल असे दिसते. 
 
- पाकव्याप्त कश्मीरातील बलुचिस्तान, गिलगीट वगैरे भागातील जनता त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात रस्त्यांवर उतरली आहे. त्यांना पाकिस्तानी अत्याचारापासून मुक्ती हवी आहे. तेथे मानव अधिकाराचे हनन होत आहे व पाकिस्तानने तिकडे लक्ष द्यावे, असे मोदी यांनी सुनावले. मोदी यांच्या वक्तव्याचे बलुची नेत्यांनी स्वागत केले. इंदिरा गांधी यांनी पाक अत्याचारापासून बांगलादेशची मुक्तता केली होती. 
 
- मोदी यांनी बांगलादेशप्रमाणे बलुचिस्तानची मुक्तता करावी असे या नेत्यांनी म्हटले, हे धाडसच समजावे लागेल. 
 
- पाकिस्तानने गिळलेल्या कश्मीरात गेल्या ७० वर्षांत विकासाला पूर्णपणे खीळ बसली आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक सलोख्याचा खेळखंडोबा चालला आहे. दहशतवादास प्रोत्साहन देणारे ‘कॅम्प’ तेथे चालवले जातात व तेथील बेरोजगार तरुणांच्या हाती शस्त्रे देऊन दहशतवादी बनवणे हाच तेथे रोजगार बनला आहे. 
 
- हिंदुस्थानचे पंतप्रधान यासंदर्भात काय करणार आहेत? बलुची नेत्यांच्या सुटकेसाठी पाकव्याप्त कश्मीरात लष्कर घुसवणार की बलुची नेत्यांवरील दमनचक्रावर आणखी एक भाषण ठोकून धिक्कार करणार? हिंदुस्थानच्या पंतप्रधानांचे अभिनंदन केले म्हणून बलुची नेत्यांना मोठ्या कारवाईस तोंड द्यावे लागत आहे. 
 
- इथे आमच्या कश्मीरातही रोज उठून पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे व पाकड्यांचे गुणगाण करणारे कमी नाहीत. त्यांच्यावर आपण काय कारवाई केली? कश्मीरात सध्या जे वातावरण चिघळले आहे ते राष्ट्रहिताचे नाही. वातावरण सुधारायचे असेल तर हुरियतवाले व पाकिस्तानबरोबर चर्चा व्हावी, असे जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना वाटते. हे काही बरोबर नाही. रस्त्यावर उतरणार्‍यांना कायद्याचा व पोलिसांचा धाक नाही व लष्करावर दगड मारणे हे राष्ट्रप्रेम नाही.