शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

‘बल्लारपूर’चे रोजंदार कायम

By admin | Updated: March 15, 2016 02:00 IST

मे. बल्लारपूर इन्डस्ट्रिज लि. या कंपनीच्या (बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट््स लि.) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कारखान्यात गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो

मुंबई: मे. बल्लारपूर इन्डस्ट्रिज लि. या कंपनीच्या (बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट््स लि.) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कारखान्यात गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो कामगारांना अखेर नोकरीत कायम केले जाणार आहे.या कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्र लोक कामगार संघटना आणि ‘बिल्ट’ कंपनी यांच्यात १९९७ पासून सुरु असलेल्या तंट्यात गेल्या आठवड्यात उभयपक्षी सहमतीने तडजोड झाली. त्यानुसार असे ठरले की, कंपनीत काम करीत असलेल्या २२४ कामगारांपैकी जे कामगार रोजंदारीवर काम करीत होते त्यांना १ जानेवारी २०१० पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीत कायम केले जाईल.यापैकी जे दरम्यानच्या काळात निवृत्त झाले असतील, मृत झाले असतील अथवा ज्यांनी राजीनामा दिला असेल असे ते या तारखेपासून कायम नोकरीत होते, असे मानून त्यांची सर्व देणी दिली जातील, असेही कंपनीने मान्य केले आहे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालाच्या विरुद्ध कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांच्या खंडपीठाने सुनावणीच्या दरम्यान दोन्ही पक्षांना हा तंटा सामोपचाराने मिटविण्याची सूचना केली. त्यानुसार वरीलप्रमाणे समझोता झाला व कंपनीचे अपील निकाली काढले गेले. या खेरीज जे कामगार २४ आॅगस्ट २००९ ते १ जानेवारी २०१० या काळात नोकरी सोडून गेले असतील, त्यांनाही कामावर असलेल्या कामगारांप्रमाणे नसले तरी सुयोग्य पैसे दिले जातील, असेही कंपनीने मान्य केले. (विशेष प्रतिनिधी)पक्षपात दूर झाला, कंपनीने नमते घेतलेरोजंदार कामगारांना कायम करताना कंपनी पक्षपात करते. दोन्ही मान्यताप्राप्त संघटनांचे सदस्य असलेल्या हजारो कामगारांना गेल्या कित्येक वर्षांत कायम केले गेले. पण आमचे सदस्य अनेक वर्षे (काहीजण १९७४पासून) रोजंदारीवर काम करीत असूनही व त्यांनी वर्षात २४० दिवस सलग काम केलेले असूनही त्यांना कायम केले जात नाही, अशी महाराष्ट्र लोक कामगार संघटनेची मुख्य तक्रार होती.अखेर मान्यताप्राप्त नसूनही याच संघटनेने कामगारांना न्याय मिळवून दिला. या कामगारांनी कधी २४० दिवस सलग काम केलेलेच नाही, असे म्हणणाऱ्या कंपनीलाही अखेर त्यांना कायम नोकरीत घ्यावे लागले.