शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

‘बल्लारपूर’चे रोजंदार कायम

By admin | Updated: March 15, 2016 02:00 IST

मे. बल्लारपूर इन्डस्ट्रिज लि. या कंपनीच्या (बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट््स लि.) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कारखान्यात गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो

मुंबई: मे. बल्लारपूर इन्डस्ट्रिज लि. या कंपनीच्या (बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट््स लि.) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कारखान्यात गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो कामगारांना अखेर नोकरीत कायम केले जाणार आहे.या कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्र लोक कामगार संघटना आणि ‘बिल्ट’ कंपनी यांच्यात १९९७ पासून सुरु असलेल्या तंट्यात गेल्या आठवड्यात उभयपक्षी सहमतीने तडजोड झाली. त्यानुसार असे ठरले की, कंपनीत काम करीत असलेल्या २२४ कामगारांपैकी जे कामगार रोजंदारीवर काम करीत होते त्यांना १ जानेवारी २०१० पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीत कायम केले जाईल.यापैकी जे दरम्यानच्या काळात निवृत्त झाले असतील, मृत झाले असतील अथवा ज्यांनी राजीनामा दिला असेल असे ते या तारखेपासून कायम नोकरीत होते, असे मानून त्यांची सर्व देणी दिली जातील, असेही कंपनीने मान्य केले आहे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालाच्या विरुद्ध कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांच्या खंडपीठाने सुनावणीच्या दरम्यान दोन्ही पक्षांना हा तंटा सामोपचाराने मिटविण्याची सूचना केली. त्यानुसार वरीलप्रमाणे समझोता झाला व कंपनीचे अपील निकाली काढले गेले. या खेरीज जे कामगार २४ आॅगस्ट २००९ ते १ जानेवारी २०१० या काळात नोकरी सोडून गेले असतील, त्यांनाही कामावर असलेल्या कामगारांप्रमाणे नसले तरी सुयोग्य पैसे दिले जातील, असेही कंपनीने मान्य केले. (विशेष प्रतिनिधी)पक्षपात दूर झाला, कंपनीने नमते घेतलेरोजंदार कामगारांना कायम करताना कंपनी पक्षपात करते. दोन्ही मान्यताप्राप्त संघटनांचे सदस्य असलेल्या हजारो कामगारांना गेल्या कित्येक वर्षांत कायम केले गेले. पण आमचे सदस्य अनेक वर्षे (काहीजण १९७४पासून) रोजंदारीवर काम करीत असूनही व त्यांनी वर्षात २४० दिवस सलग काम केलेले असूनही त्यांना कायम केले जात नाही, अशी महाराष्ट्र लोक कामगार संघटनेची मुख्य तक्रार होती.अखेर मान्यताप्राप्त नसूनही याच संघटनेने कामगारांना न्याय मिळवून दिला. या कामगारांनी कधी २४० दिवस सलग काम केलेलेच नाही, असे म्हणणाऱ्या कंपनीलाही अखेर त्यांना कायम नोकरीत घ्यावे लागले.