शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

‘बल्लारपूर’चे रोजंदार कायम

By admin | Updated: March 15, 2016 02:00 IST

मे. बल्लारपूर इन्डस्ट्रिज लि. या कंपनीच्या (बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट््स लि.) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कारखान्यात गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो

मुंबई: मे. बल्लारपूर इन्डस्ट्रिज लि. या कंपनीच्या (बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट््स लि.) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कारखान्यात गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो कामगारांना अखेर नोकरीत कायम केले जाणार आहे.या कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्र लोक कामगार संघटना आणि ‘बिल्ट’ कंपनी यांच्यात १९९७ पासून सुरु असलेल्या तंट्यात गेल्या आठवड्यात उभयपक्षी सहमतीने तडजोड झाली. त्यानुसार असे ठरले की, कंपनीत काम करीत असलेल्या २२४ कामगारांपैकी जे कामगार रोजंदारीवर काम करीत होते त्यांना १ जानेवारी २०१० पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीत कायम केले जाईल.यापैकी जे दरम्यानच्या काळात निवृत्त झाले असतील, मृत झाले असतील अथवा ज्यांनी राजीनामा दिला असेल असे ते या तारखेपासून कायम नोकरीत होते, असे मानून त्यांची सर्व देणी दिली जातील, असेही कंपनीने मान्य केले आहे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालाच्या विरुद्ध कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांच्या खंडपीठाने सुनावणीच्या दरम्यान दोन्ही पक्षांना हा तंटा सामोपचाराने मिटविण्याची सूचना केली. त्यानुसार वरीलप्रमाणे समझोता झाला व कंपनीचे अपील निकाली काढले गेले. या खेरीज जे कामगार २४ आॅगस्ट २००९ ते १ जानेवारी २०१० या काळात नोकरी सोडून गेले असतील, त्यांनाही कामावर असलेल्या कामगारांप्रमाणे नसले तरी सुयोग्य पैसे दिले जातील, असेही कंपनीने मान्य केले. (विशेष प्रतिनिधी)पक्षपात दूर झाला, कंपनीने नमते घेतलेरोजंदार कामगारांना कायम करताना कंपनी पक्षपात करते. दोन्ही मान्यताप्राप्त संघटनांचे सदस्य असलेल्या हजारो कामगारांना गेल्या कित्येक वर्षांत कायम केले गेले. पण आमचे सदस्य अनेक वर्षे (काहीजण १९७४पासून) रोजंदारीवर काम करीत असूनही व त्यांनी वर्षात २४० दिवस सलग काम केलेले असूनही त्यांना कायम केले जात नाही, अशी महाराष्ट्र लोक कामगार संघटनेची मुख्य तक्रार होती.अखेर मान्यताप्राप्त नसूनही याच संघटनेने कामगारांना न्याय मिळवून दिला. या कामगारांनी कधी २४० दिवस सलग काम केलेलेच नाही, असे म्हणणाऱ्या कंपनीलाही अखेर त्यांना कायम नोकरीत घ्यावे लागले.