शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

बाळासाहेबांचे स्मारक लाल फितीशाहीत अडकले!

By admin | Updated: January 22, 2016 03:52 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने करून दोन महिने उलटले

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने करून दोन महिने उलटले; तरी या स्मारकाबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप कागदोपत्रीदेखील सुरू झालेली नाही. बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना तीन दिवसांपूर्वी पाठवले होते. शिवसेनाप्रमुखांच्या तिसऱ्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या स्मृतींना शिवाजी पार्कवर अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसोबत महापौर बंगल्यात पत्र परिषद घेऊन स्मारक उभारणीची घोषणा केली होती. बाळासाहेबांचे स्मारक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असेच होईल, असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर गेल्या दोन महिन्यात स्मारकाबाबत कोणतीही हालचाल शासकीयपातळीवर झाली नाही.शासनाच्या या दप्तरदिरंगाईबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी आज लोकमतशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे आज जे स्थान आहे त्याचे मोठे श्रेय हे शिवसेनाप्रमुखांनाच जाते. सरकारी लालफितशाहीवर त्यांनी नेहमीच आसूड उगारले आणि आज त्यांचेच स्मारक लालफितशाहीमध्ये अडकले आहे ही दु:खाची बाब आहे. हे स्मारक उभारण्याचा शब्द मुख्ळमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत आदेश निघायला हवे होते. तसे न झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत आहे की नाही असा प्रश्न पडतो. (विशेष प्रतिनिधी)राज यांचा होता विरोधबाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यात उभारण्यास मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी विरोध दर्शविली होता. तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. महापौर बंगला ही पुरातन वास्तु असून त्याऐवजी अन्यत्र ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची मागणी त्यांनी केली होती............................उद्योगमंत्री देसाई यांनी दिलेल्या पत्रावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त अजेय मेहता यांना दिले होते, मात्र शिवसेनेच्याच ताब्यात असलेल्या महापालिकेतून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे समजते.बाळासाहेबांच्या नावेनिराधार स्वावलंबन योजनाशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेची घोषणा आज राज्य शासनाने केली. आत्महत्या केलेल्यांच्या विधवांना या योजनेंतर्गत आॅटोरिक्षा खरेदी करण्यासाठी १०० टक्के कर्ज देण्यात येणार आहे. शासनाची मदत मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या कुटुंबातील विधवांनाच हे कर्ज मिळेल आणि रिक्षा परवानाही दिला जाईल. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुुटुंबाला शासन एक लाख रुपयांची मदत देते. आॅटोरिक्षासाठी कर्ज घेताना हीच रक्कम हमी म्हणून वापरता येईल.