शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

बाळासाहेबांचे स्मारक लाल फितीशाहीत अडकले!

By admin | Updated: January 22, 2016 03:52 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने करून दोन महिने उलटले

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने करून दोन महिने उलटले; तरी या स्मारकाबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप कागदोपत्रीदेखील सुरू झालेली नाही. बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना तीन दिवसांपूर्वी पाठवले होते. शिवसेनाप्रमुखांच्या तिसऱ्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या स्मृतींना शिवाजी पार्कवर अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसोबत महापौर बंगल्यात पत्र परिषद घेऊन स्मारक उभारणीची घोषणा केली होती. बाळासाहेबांचे स्मारक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असेच होईल, असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर गेल्या दोन महिन्यात स्मारकाबाबत कोणतीही हालचाल शासकीयपातळीवर झाली नाही.शासनाच्या या दप्तरदिरंगाईबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी आज लोकमतशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे आज जे स्थान आहे त्याचे मोठे श्रेय हे शिवसेनाप्रमुखांनाच जाते. सरकारी लालफितशाहीवर त्यांनी नेहमीच आसूड उगारले आणि आज त्यांचेच स्मारक लालफितशाहीमध्ये अडकले आहे ही दु:खाची बाब आहे. हे स्मारक उभारण्याचा शब्द मुख्ळमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत आदेश निघायला हवे होते. तसे न झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत आहे की नाही असा प्रश्न पडतो. (विशेष प्रतिनिधी)राज यांचा होता विरोधबाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यात उभारण्यास मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी विरोध दर्शविली होता. तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. महापौर बंगला ही पुरातन वास्तु असून त्याऐवजी अन्यत्र ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची मागणी त्यांनी केली होती............................उद्योगमंत्री देसाई यांनी दिलेल्या पत्रावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त अजेय मेहता यांना दिले होते, मात्र शिवसेनेच्याच ताब्यात असलेल्या महापालिकेतून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे समजते.बाळासाहेबांच्या नावेनिराधार स्वावलंबन योजनाशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेची घोषणा आज राज्य शासनाने केली. आत्महत्या केलेल्यांच्या विधवांना या योजनेंतर्गत आॅटोरिक्षा खरेदी करण्यासाठी १०० टक्के कर्ज देण्यात येणार आहे. शासनाची मदत मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या कुटुंबातील विधवांनाच हे कर्ज मिळेल आणि रिक्षा परवानाही दिला जाईल. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुुटुंबाला शासन एक लाख रुपयांची मदत देते. आॅटोरिक्षासाठी कर्ज घेताना हीच रक्कम हमी म्हणून वापरता येईल.