शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मध्य वैतरणा प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

By admin | Updated: August 24, 2016 20:58 IST

शिवसेना व भाजपा युतीमध्ये गेल्या वर्षभरात असंख्य मतभेद असले तरी एका गोष्टीवर युतीचे एकमत झाले आहे़ मध्य वैतरणा प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - शिवसेना व भाजपा युतीमध्ये गेल्या वर्षभरात असंख्य मतभेद असले तरी एका गोष्टीवर युतीचे एकमत झाले आहे़ मध्य वैतरणा प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ १ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येणार आहेत़ त्यामुळे निवडणुकीपूर्वी युतीबाबतचे संकेत स्पष्ट होण्याची शक्यता आहे़

मध्य वैतरणा धरणाला नानाशंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी काही वर्षांपूर्वी केली होती़ मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानंतर या धरणाला त्यांचे नाव देण्याचे शिवसेनेने ठरविले़ तशी मागणीही गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली होती़ परंतु गेल्या वर्षभरात शिवसेना आणि भाजपाच्या मैत्रीत फुट पडून उभय पक्षांनी असहकार पुकारला़ त्यामुळे शिवसेनेचा हे स्वप्न भाजपा पूर्ण होऊ देईल का, याबाबत शंका व्यक्त होत होती़

या नामकरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळही मिळत नसल्याने हा संशय आणखी बळावला होता़ परंतु अखेर १ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे़ या कार्यक्रमात शिवसेना व भाजपाचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत़ त्यामुळे पालिकेच्या आगामी निवडणुकीत उभय पक्षांची काय भूमिका असेल, याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे़ मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण २०१२ मध्ये पूर्ण झाले़

रोलर कॉम्पेक्टेड काँक्रिट रोलर (आरसीसी) पद्धतीने बांधण्यात आलेले महाराष्ट्रातील हे पहिले धरण आहे़ १९९३ मध्ये मध्य वैतरणा प्रकल्प आखण्यात आला़ त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथे हे धरण बांधण्यात येणार होते़ मात्र या प्रकल्पासाठी पावणेदोन लाख वृक्षांची कत्तल करावी लागणार असल्याने पर्यावरण मंत्रालयाने आक्षेप घेतला होता़

अखेर बीड जिल्ह्यात तेवढ्याच वृक्षांचे पुर्नरोपण केल्यानंतर २००७ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली़ चार वर्षांत या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ विलंबाने वाढविला खर्च १९९३ मध्ये चितळे समितीने मध्य वैतरणा धरणाची शिफारस केली़ २००९ मध्ये धरणाचे काम सुरु झाले़ जवहारलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण अभियान अंतर्गत या प्रकल्पाला निम्मा निधी मिळाला़ या प्रकल्पाचा खर्च १२०० कोटी अपेक्षित होता़

मात्र अनेक वर्षांच्या दिरंगाईमुळे हा खर्च दोन हजार कोटींवर पोहोचला़ धरणाचे वैशिष्ट जलदगतीने पूर्ण होणारे जगातील हे ९ वे आरसीसी धरण आहे़ या धरणाची उंची १०२़४ मीटर एवढी आहे़ भाकरा नंगाल धरणानंतर आरसीसी पद्धतीने बांधण्यात आलेले मध्य वैतरणा हे देशातील दुसरे मोठे धरण आहे़