शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

मध्य वैतरणा प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

By admin | Updated: August 24, 2016 20:58 IST

शिवसेना व भाजपा युतीमध्ये गेल्या वर्षभरात असंख्य मतभेद असले तरी एका गोष्टीवर युतीचे एकमत झाले आहे़ मध्य वैतरणा प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - शिवसेना व भाजपा युतीमध्ये गेल्या वर्षभरात असंख्य मतभेद असले तरी एका गोष्टीवर युतीचे एकमत झाले आहे़ मध्य वैतरणा प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ १ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येणार आहेत़ त्यामुळे निवडणुकीपूर्वी युतीबाबतचे संकेत स्पष्ट होण्याची शक्यता आहे़

मध्य वैतरणा धरणाला नानाशंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी काही वर्षांपूर्वी केली होती़ मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानंतर या धरणाला त्यांचे नाव देण्याचे शिवसेनेने ठरविले़ तशी मागणीही गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली होती़ परंतु गेल्या वर्षभरात शिवसेना आणि भाजपाच्या मैत्रीत फुट पडून उभय पक्षांनी असहकार पुकारला़ त्यामुळे शिवसेनेचा हे स्वप्न भाजपा पूर्ण होऊ देईल का, याबाबत शंका व्यक्त होत होती़

या नामकरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळही मिळत नसल्याने हा संशय आणखी बळावला होता़ परंतु अखेर १ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे़ या कार्यक्रमात शिवसेना व भाजपाचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत़ त्यामुळे पालिकेच्या आगामी निवडणुकीत उभय पक्षांची काय भूमिका असेल, याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे़ मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण २०१२ मध्ये पूर्ण झाले़

रोलर कॉम्पेक्टेड काँक्रिट रोलर (आरसीसी) पद्धतीने बांधण्यात आलेले महाराष्ट्रातील हे पहिले धरण आहे़ १९९३ मध्ये मध्य वैतरणा प्रकल्प आखण्यात आला़ त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथे हे धरण बांधण्यात येणार होते़ मात्र या प्रकल्पासाठी पावणेदोन लाख वृक्षांची कत्तल करावी लागणार असल्याने पर्यावरण मंत्रालयाने आक्षेप घेतला होता़

अखेर बीड जिल्ह्यात तेवढ्याच वृक्षांचे पुर्नरोपण केल्यानंतर २००७ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली़ चार वर्षांत या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ विलंबाने वाढविला खर्च १९९३ मध्ये चितळे समितीने मध्य वैतरणा धरणाची शिफारस केली़ २००९ मध्ये धरणाचे काम सुरु झाले़ जवहारलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण अभियान अंतर्गत या प्रकल्पाला निम्मा निधी मिळाला़ या प्रकल्पाचा खर्च १२०० कोटी अपेक्षित होता़

मात्र अनेक वर्षांच्या दिरंगाईमुळे हा खर्च दोन हजार कोटींवर पोहोचला़ धरणाचे वैशिष्ट जलदगतीने पूर्ण होणारे जगातील हे ९ वे आरसीसी धरण आहे़ या धरणाची उंची १०२़४ मीटर एवढी आहे़ भाकरा नंगाल धरणानंतर आरसीसी पद्धतीने बांधण्यात आलेले मध्य वैतरणा हे देशातील दुसरे मोठे धरण आहे़