शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब म्हणजे मैत्रीला जागणारा नेता!

By admin | Updated: April 23, 2016 03:57 IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात मैत्रीला, दिलेल्या शब्दाला फार महत्त्व होते, त्यासाठी प्रसंगी ते स्वत:चे, पक्षाचे नुकसानही सहन करीत

पुणे : बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात मैत्रीला, दिलेल्या शब्दाला फार महत्त्व होते, त्यासाठी प्रसंगी ते स्वत:चे, पक्षाचे नुकसानही सहन करीत. शब्द दिला म्हणून सार्वत्रिक निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करणारे बाळासाहेब हे एकमेव राजकीय नेते असतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आपल्या मैत्रीला उजाळा दिला. महापालिकेने सारसबागेसमोर तयार केलेल्या बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचे उद््घाटन शुक्रवारी सकाळी पवार यांच्या हस्ते झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, संजय राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, विजय चौगुले आदी या वेळी उपस्थित होते.पवार यांनी बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. ते म्हणाले, ‘‘सुप्रियाच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी मी बाळासाहेबांना विचारले, तुमचा उमेदवार कोण? तर ते चिडले, अंगाखांद्यावर खेळलेल्या मुलीच्या विरोधात उमेदवार द्यायचा का? असे म्हणाले व सुप्रियाची पहिलीच निवडणूक बिनविरोध केली.’’ कुंचल्याने माझ्या वाढलेल्या वजनावर त्यांनी अनेक वार केले, मात्र मैत्रीत त्याचा दुरावा कधीच येऊ दिला नाही. दिलखुलास असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य दिले. व्यंगचित्रकार म्हणून त्यांचे स्थान अजोड होते. ते जपण्याचा प्रयत्न महापालिकेने कलादालन उभारून केला, हे स्तुत्य आहे, असे पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्रात प्रथमच असे दालन तयार झाल्याबद्दल कौतुक केले. मी बाळासाहेबांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आहे. मी सरकारमध्ये राहून विरोध करतो अशी टीका होत असते, पण बाळासाहेबांनी दिलेल्या ठिणग्या आहेत, त्या उडणारच असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)च्पुणे : उत्तराखंड प्रकरणात राष्ट्रपतींची विनाकारण बदनामी झाली, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. च्राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला न्यायालयाने फटकारल्यानंतर आता मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही केंद्र सरकारवर, पर्यायाने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत खडे बोल भाजपाला सुनावले. ठाकरे म्हणाले, की चांगली कामे असली तर लोक स्वत:हून सत्ता देतात, तिथे घाई कामाची नाही. हे प्रकरण न्यायालयाचा अवमान, राष्ट्रपतींचा अवमान इतक्यापुरतेच मर्यादित नाही; त्याकडे गंभीरपणे पाहायला हवे. न्यायालयाचा निकाल आता आला आहे व त्यातून अनेक गोष्टी सुचित होत आहेत. त्या जगाला समजल्या. आपल्या राष्ट्रपतींचा आपणच वापर करतो आहोत, असे जगाला समजणे चुकीचे आहे.च्केंद्र सरकारने यात विनाकारण घाई केली. सत्ता हवीच असेल तर त्यासाठी चांगली कामे करायला हवीत, त्यातून लोक आपोआप सत्ता देतील. मात्र सत्तेसाठी अशी घाई करणे योग्य नाही. आपण काय करतो आहोत, त्याचे परिणाम काय होतील याचे भान तरी ठेवलेच पाहिजे अन्यथा असा प्रकार होतो, असे ठाकरे म्हणाले.