शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब म्हणजे मैत्रीला जागणारा नेता!

By admin | Updated: April 23, 2016 03:57 IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात मैत्रीला, दिलेल्या शब्दाला फार महत्त्व होते, त्यासाठी प्रसंगी ते स्वत:चे, पक्षाचे नुकसानही सहन करीत

पुणे : बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात मैत्रीला, दिलेल्या शब्दाला फार महत्त्व होते, त्यासाठी प्रसंगी ते स्वत:चे, पक्षाचे नुकसानही सहन करीत. शब्द दिला म्हणून सार्वत्रिक निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करणारे बाळासाहेब हे एकमेव राजकीय नेते असतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आपल्या मैत्रीला उजाळा दिला. महापालिकेने सारसबागेसमोर तयार केलेल्या बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचे उद््घाटन शुक्रवारी सकाळी पवार यांच्या हस्ते झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, संजय राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, विजय चौगुले आदी या वेळी उपस्थित होते.पवार यांनी बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. ते म्हणाले, ‘‘सुप्रियाच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी मी बाळासाहेबांना विचारले, तुमचा उमेदवार कोण? तर ते चिडले, अंगाखांद्यावर खेळलेल्या मुलीच्या विरोधात उमेदवार द्यायचा का? असे म्हणाले व सुप्रियाची पहिलीच निवडणूक बिनविरोध केली.’’ कुंचल्याने माझ्या वाढलेल्या वजनावर त्यांनी अनेक वार केले, मात्र मैत्रीत त्याचा दुरावा कधीच येऊ दिला नाही. दिलखुलास असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य दिले. व्यंगचित्रकार म्हणून त्यांचे स्थान अजोड होते. ते जपण्याचा प्रयत्न महापालिकेने कलादालन उभारून केला, हे स्तुत्य आहे, असे पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्रात प्रथमच असे दालन तयार झाल्याबद्दल कौतुक केले. मी बाळासाहेबांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आहे. मी सरकारमध्ये राहून विरोध करतो अशी टीका होत असते, पण बाळासाहेबांनी दिलेल्या ठिणग्या आहेत, त्या उडणारच असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)च्पुणे : उत्तराखंड प्रकरणात राष्ट्रपतींची विनाकारण बदनामी झाली, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. च्राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला न्यायालयाने फटकारल्यानंतर आता मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही केंद्र सरकारवर, पर्यायाने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत खडे बोल भाजपाला सुनावले. ठाकरे म्हणाले, की चांगली कामे असली तर लोक स्वत:हून सत्ता देतात, तिथे घाई कामाची नाही. हे प्रकरण न्यायालयाचा अवमान, राष्ट्रपतींचा अवमान इतक्यापुरतेच मर्यादित नाही; त्याकडे गंभीरपणे पाहायला हवे. न्यायालयाचा निकाल आता आला आहे व त्यातून अनेक गोष्टी सुचित होत आहेत. त्या जगाला समजल्या. आपल्या राष्ट्रपतींचा आपणच वापर करतो आहोत, असे जगाला समजणे चुकीचे आहे.च्केंद्र सरकारने यात विनाकारण घाई केली. सत्ता हवीच असेल तर त्यासाठी चांगली कामे करायला हवीत, त्यातून लोक आपोआप सत्ता देतील. मात्र सत्तेसाठी अशी घाई करणे योग्य नाही. आपण काय करतो आहोत, त्याचे परिणाम काय होतील याचे भान तरी ठेवलेच पाहिजे अन्यथा असा प्रकार होतो, असे ठाकरे म्हणाले.