शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

बालमहोत्सव सुरू

By admin | Updated: November 14, 2016 04:55 IST

दोन वर्षांपासून बंद असलेला ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ यंदा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला किमान सव्वा लाख

संदीप आडनाईक / कोल्हापूरदोन वर्षांपासून बंद असलेला ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ यंदा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला किमान सव्वा लाख रुपयाचा निधी मंजूर केला असून, तशी आर्थिक तरतूदही केली आहे. बालगृहातील मुला-मुलींसाठी यंदा राज्य सरकारने ही बालदिनानिमित्त आनंदाची भेट दिली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त तत्कालीन आघाडी सरकारने २0१२पासून बालगृहातील मुला-मुलींसाठी ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ सुरू केला होता. हा सोहळा म्हणजे खेळ, करमणूक आणि व्यक्तिमत्त्व विकासाची एक पर्वणीच होती. मात्र, आर्थिक तरतुदीअभावी २0१४ पासून विद्यमान सरकारने तो बंद केला होता. कोल्हापुरातील ‘आभास फाउंडेशन’ या संस्थेने गेली दोन वर्षे सातत्याने याबाबत पाठपुरावा केला. ३६ जिल्ह्यांतील बालमहोत्सवासाठी ४0 लाख ७0 हजार २00 रुपयांचा निधी मंजूर केला आहे, तशी तरतूदही केली आहे. राज्यात ९९४ बालगृहे व ६0 निरीक्षण गृहामध्ये ९0 हजार मुले आहेत. त्यांना त्याचा लाभ होईल.पाच लाखांचा निधी सव्वा लाखांवर२0१२ मध्ये महिला व बाल विकास विभागाने ही योजना सुरू करताना प्रत्येक जिल्ह्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली होती. २0१२ आणि २0१३ या दोन वर्षांत बालमहोत्सवावर हा निधी खर्चही झाला होता, परंतु नवीन सरकारने सत्तेवर येताच २0१४ पासून आर्थिक तरतूद नसल्याचे कारण देत, महोत्सवच बंद केला होता. यंदा मात्र, पाच लाख रुपयांच्या अनुदानात कपात करून, अवघ्या सव्वा लाख रुपयांवर बोळवण करण्यात आली आहे. महोत्सव नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतो.