शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी तांबे यांच्या पदवीबाबत संशय कायम

By admin | Updated: September 29, 2016 01:02 IST

आयुर्वेदाचार्य म्हणून ओळखले जाणारे बालाजी तांबे यांची वैद्यकीय पदवीच सापडत नसल्याचे वृत्त प्रकाशित होताच, तांबे यांनी आपल्या पदवीची झेरॉक्स प्रत ‘महाराष्ट्र कौन्सिल

अहमदनगर : आयुर्वेदाचार्य म्हणून ओळखले जाणारे बालाजी तांबे यांची वैद्यकीय पदवीच सापडत नसल्याचे वृत्त प्रकाशित होताच, तांबे यांनी आपल्या पदवीची झेरॉक्स प्रत ‘महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीन’कडे (एमसीआयएम) पाठविली आहे. उत्तर प्रदेशातील हिंदी साहित्य संमेलन या संस्थेनेही ही पदवी खरी असल्याचे पत्र लगोलग धाडले आहे. मात्र, ही कागदपत्रे वैध आहेत का? असा पेच आता ‘एमसीआयएम’ समोर आहे. १९६५ साली उत्तर प्रदेशातील प्रयाग येथील हिंदी साहित्य संमेलन या संस्थेतून आपण ‘वैद्यविशारद’ झाल्याचे तांबे सांगतात. या पदवीच्या आधारे त्यांनी १९८७ साली ‘एमसीआयएम’कडे वैद्यकीय व्यवसायासाठी नोंदणी केली. मात्र, या नोंदणीचे १९९१ नंतर नूतनीकरणच झालेले नसतानाही ते डॉक्टर म्हणून सेवा करत आहेत. दरम्यानच्या काळात तांबे यांची पदवीच गायब झाली. आपली पदवी हरवल्याचे ते स्वत: सांगतात, तर ‘एमसीआयएम’च्या दप्तरीही त्यांची पदवी सापडत नाही. कौन्सिलने वारंवार मागणी केल्यानंतरही तांबे यांनी ती सादर केलेली नाही. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणली. या वृत्तानंतर तांबे यांनी पदवीची झेरॉक्स प्रत पाठविली, तसेच प्रयागच्या संस्थेनेही ही पदवी खरी असल्याचे पत्र दिले असल्याचे ‘एमसीआयएम’चे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सांगितले. मात्र, ही कागदपत्रे वैध आहेत का, याबाबत ‘एमसीआयएम’ काहीही खात्री देत नाही. वकिलांचा सल्ला घेऊन कागदपत्रांची खातरजमा करणार असल्याचे ते म्हणाले. तांबे यांनी उत्तर प्रदेशातील बोर्डाकडे आपली नोंदणी केली आहे का? याची तपासणी करण्यासाठीही डॉक्टरांचा ‘एमसीआयएम’वर दबाव वाढत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, ‘एमसीआयएम’च्या २९ सप्टेंबरच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्याची मागणी प्रबंधकांकडे केली आहे. नोंदणीचे नूतनीकरण न करताच तांबे वैद्यकीय व्यवसाय कसा करतात? असा प्रश्न बोऱ्हाडे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकात बालाजी तांबे यांनी गर्भलिंगनिदान कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध, तसेच पुस्तकाचे प्रकाशक अभिजित पवार यांच्याविरुद्ध संगमनेर (जि. नगर) न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. तांबे यांनी याविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागितल्यानंतर, न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. मात्र, या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. तसा निर्णय झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांनी सांगितले.