शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन मोर्चाने नगर दणाणले

By admin | Updated: October 24, 2016 21:50 IST

अ‍ॅट्रासिटी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करावी, तसेच मराठा, मुस्लीम, ख्रिश्चनांना आरक्षण दिले जावे यांसह एकवीस मागण्यांसाठी सोमवारी अहमदनगर शहरात विराट बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 24 : अ‍ॅट्रासिटी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करावी, तसेच मराठा, मुस्लीम, ख्रिश्चनांना आरक्षण दिले जावे यांसह एकवीस मागण्यांसाठी सोमवारी अहमदनगर शहरात विराट बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. निळा, पिवळा, भगवा, लाल असे विविध झेंडे व घोषणांनी शहर दणाणून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा-दलित वाद लावला, असा गंभीर आरोप ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी या मोर्चाला संबोधित करताना केला. या मोर्चासाठी सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागांतून जनसमुदाय नगर शहरात येत होता. विविध रंगांचे झेंडे हातात घेऊन मोर्चेकरी वाडिया पार्कवर दाखल झाले. ‘एकच गर्व, बहुजन सर्व’, ‘एकच साहेब, बाबासाहेब’, ‘तुम भी देखो आँखे से, हम थी आये लाखोंसे’, अशा घोषणा दिल्या जात होत्या. दुपारी दीडच्या सुमारास वाडिया पार्कचे क्रीडांगण भरले होते. भर उन्हात महिला, मुले आणि तरुणांची मोठी गर्दी होती. दलित, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, धनगर, मुस्लीम, वंजारी अशा विविध समाजांचे नेते-कार्यकर्ते मोर्चासाठी एक झाले होते. वाडिया पार्कमध्ये वामन मेश्राम, मोर्चाचे निमंत्रक विजय वाकचौरे, अशोक गायकवाड, प्रा. किसन चव्हाण, अ‍ॅड. अरुण जाधव, माजी आमदार पांडुरंग अभंग आदी नेत्यांची भाषणे झाली. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या रक्षणासाठी एकी कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जे लोक दलितांचा वापर करुन खोट्या अ‍ॅट्रॉसिटी दाखल करायला लावतात त्यांच्याविरुद्धही अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानेच गुन्हा दाखल व्हावा, भटक्या विमुक्तांनाही अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याचे संरक्षण द्यावे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, शेतमालाला हमी भाव देण्यात यावा आदी मागण्या मोर्चात करण्यात आल्या. वाडिया पार्कनंतर मोर्चा चांदणी चौकात आला. तेथे राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. शिर्डी येथील हत्या झालेला दलित युवक सागर शेजवळ व खर्डा येथे हत्या झालेला नितीन आगे याच्या कुटुंबीयांच्या हस्ते जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.बहुजन मोर्चामुळे शहरातील बहुतांश शाळांनी प्रथम सत्रांच्या परीक्षेचा पेपर रद्द करून सुटी जाहीर केली होती. शासकीय कार्यालयांत शुकशुकाट होता. बाजारात गर्दी नसल्याने दिवाळी खरेदीवर परिणाम झाला. विविध संघटनांनी मोर्चेकऱ्यांसाठी पाणी, चहा, नाश्त्याची व्यवस्था केली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. शहरातून जाणारी वाहतूक बाहेरुन वळविण्यात आली होती.