शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

बहुजन मोर्चाने नगर दणाणले

By admin | Updated: October 24, 2016 21:50 IST

अ‍ॅट्रासिटी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करावी, तसेच मराठा, मुस्लीम, ख्रिश्चनांना आरक्षण दिले जावे यांसह एकवीस मागण्यांसाठी सोमवारी अहमदनगर शहरात विराट बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 24 : अ‍ॅट्रासिटी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करावी, तसेच मराठा, मुस्लीम, ख्रिश्चनांना आरक्षण दिले जावे यांसह एकवीस मागण्यांसाठी सोमवारी अहमदनगर शहरात विराट बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. निळा, पिवळा, भगवा, लाल असे विविध झेंडे व घोषणांनी शहर दणाणून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा-दलित वाद लावला, असा गंभीर आरोप ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी या मोर्चाला संबोधित करताना केला. या मोर्चासाठी सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागांतून जनसमुदाय नगर शहरात येत होता. विविध रंगांचे झेंडे हातात घेऊन मोर्चेकरी वाडिया पार्कवर दाखल झाले. ‘एकच गर्व, बहुजन सर्व’, ‘एकच साहेब, बाबासाहेब’, ‘तुम भी देखो आँखे से, हम थी आये लाखोंसे’, अशा घोषणा दिल्या जात होत्या. दुपारी दीडच्या सुमारास वाडिया पार्कचे क्रीडांगण भरले होते. भर उन्हात महिला, मुले आणि तरुणांची मोठी गर्दी होती. दलित, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, धनगर, मुस्लीम, वंजारी अशा विविध समाजांचे नेते-कार्यकर्ते मोर्चासाठी एक झाले होते. वाडिया पार्कमध्ये वामन मेश्राम, मोर्चाचे निमंत्रक विजय वाकचौरे, अशोक गायकवाड, प्रा. किसन चव्हाण, अ‍ॅड. अरुण जाधव, माजी आमदार पांडुरंग अभंग आदी नेत्यांची भाषणे झाली. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या रक्षणासाठी एकी कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जे लोक दलितांचा वापर करुन खोट्या अ‍ॅट्रॉसिटी दाखल करायला लावतात त्यांच्याविरुद्धही अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानेच गुन्हा दाखल व्हावा, भटक्या विमुक्तांनाही अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याचे संरक्षण द्यावे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, शेतमालाला हमी भाव देण्यात यावा आदी मागण्या मोर्चात करण्यात आल्या. वाडिया पार्कनंतर मोर्चा चांदणी चौकात आला. तेथे राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. शिर्डी येथील हत्या झालेला दलित युवक सागर शेजवळ व खर्डा येथे हत्या झालेला नितीन आगे याच्या कुटुंबीयांच्या हस्ते जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.बहुजन मोर्चामुळे शहरातील बहुतांश शाळांनी प्रथम सत्रांच्या परीक्षेचा पेपर रद्द करून सुटी जाहीर केली होती. शासकीय कार्यालयांत शुकशुकाट होता. बाजारात गर्दी नसल्याने दिवाळी खरेदीवर परिणाम झाला. विविध संघटनांनी मोर्चेकऱ्यांसाठी पाणी, चहा, नाश्त्याची व्यवस्था केली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. शहरातून जाणारी वाहतूक बाहेरुन वळविण्यात आली होती.