शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: January 19, 2016 03:51 IST

उच्च न्यायालयाने वारंवार आदेश दिल्यानंतर अखेरीस राज्य सरकारने प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : उच्च न्यायालयाने वारंवार आदेश दिल्यानंतर अखेरीस राज्य सरकारने प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही कारवाई करण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळांच्या (एमएसआरटीसी) अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. सरकारने असा शासन निर्णय काढला आहे, अशी माहिती सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. या अवैध वाहतुकीसाठी प्रवाशांना तिकीट विकणाऱ्या एजन्सींवरही कारवाई करावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली.राज्य सरकारच्या अनेक विभागांकडून कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने गेल्या वर्षी एमएसआरटीसीने ज्येष्ठ नागरिक, अपंग, शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, खेळाडू व अन्य जणांना तिकिटामध्ये सवलत न देण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वीच दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी एस.टी. नुकसानीत आहे आणि या नुकसानीस प्रवाशांची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस असल्याची माहिती एमएसआरटीसीने खंडपीठास दिली. या अवैध वाहतुकीस चाप लावण्यास आरटीओ अपयशी ठरल्याचेही एमएसआरटीसीने खंडपीठाला सांगितले होते. त्यावर राज्य सरकारने १४ जानेवारी रोजी शासन निर्णय काढत प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग आणि एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. सरकारने वेगवेगळ्या श्रेणीतील नागरिकांना सवलत देण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी) > ‘खासगी बसेसचे तिकीट विकणाऱ्यांचे काय? तेही एकप्रकारे अवैध वाहतुकीचे समर्थन करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे,’ असे खंडपीठाने म्हटले. त्यावर अ‍ॅड. वग्यानी यांनी एजन्सींवरही योग्य ती कारवाई करू, असे म्हटले. बसस्टॅण्डच्या २०० मीटर परिसरातून खासगी बसेस चालवणाऱ्या बसेसची जिल्हानिहाय आकडेवारी सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला देत या याचिकेवरील पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी ठेवली.