शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट ज्वारी गरिबांच्या माथी!

By admin | Updated: February 11, 2017 02:43 IST

वर्षभरापासून पडून असलेल्या ज्वारीचे वाटप.

संतोष येलकर अकोला, दि. १0- शासकीय धान्य गोदामांमध्ये गत वर्षभरापासून पडून असलेल्या ज्वारीला भोंगे लागल्याने, पीठ झालेल्या आणि टोकरलेल्या ज्वारीचे जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुरवठा विभागामार्फत टोकरलेली ज्वारी जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारल्या जात असल्याची बाब समोर आली आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सातही तालुक्यांत हमी दराने ज्वारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बाश्रीटाकळी या पाच खरेदी केंद्रांवर १ हजार ५७0 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आलेली ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारी गत डिसेंबर २0१५ मध्ये जिल्हय़ातील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली. वर्षभराचा कालावधी उलटून गेला; मात्र शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेली ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश शासनामार्फत पुरवठा विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या हजारो क्विंटल ज्वारीच्या पोत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात सोंड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने, पोत्यांमधील ज्वारीचे दाणे टोकरले असून, हजारो क्विंटल ज्वारीचे पीठ झाले आहे. वर्षभरापूर्वी शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आलेली ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश गत १ डिसेंबर रोजी शासनामार्फत देण्यात आला. भारतीय खाद्य निगममार्फत (एफसीआय) जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील ज्वारीची तपासणी करण्यात आल्यानंतर, वर्षभरापासून शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या ज्वारीचे वितरण जिल्हा पुरवठा विभागामार्फत २ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांना करण्यात येत आहे. १ रुपया प्रतिकिलो दराने रास्तभाव दुकानांमधून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना पीठ झालेल्या आणि टोकरलेल्या ज्वारीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी पीठ झालेल्या आणि टोकरलेली ज्वारी मारली जात आहे.१९ हजार क्विंटल ज्वारी वितरित!राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हय़ातील प्राधान्य गट आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ज्वारी वितरित करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत २ फेब्रुवारीपर्यंत जिल्हय़ातील रास्त भाव दुकानांना १९ हजार ४१0 क्विंटल ज्वारीचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांसाठी १५ हजार क्विंटल आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांसाठी ४ हजार ४१0 क्विंटल ज्वारी वितरित करण्यात आली.