शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

अंजली दमानियांचे उपोषण मागे

By admin | Updated: June 5, 2016 00:49 IST

एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरच अंजली दमानिया यांनी उपोषण मागे घेतले.

मुंबई : एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरच अंजली दमानिया यांनी उपोषण मागे घेतले. तत्पूर्वी दुपारी खडसेंच्या राजीनाम्याचे वृत्त समजल्यानंतर आंदोलकांनी ढोल-ताशे वाजवून आनंद व्यक्त केला. दमानिया गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसल्या होत्या. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यावर अंजली दमानिया यांनी आपले मत व्यक्त करताना, निवृत्त न्यायाधीशांमार्फत समिती नेमून खडसेंविरुद्धच्या आरोपांची चौकशी ठरावीक निकालमर्यादेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून लिखित आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेऊ, असे सांगितले होते. ‘आरोपांची सखोल चौकशी निर्धारित मुदतीत पूर्ण होण्याची आवश्यकता आहे, अन्यथा ६-८ महिन्यांनंतर त्यांना एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.’ असेही त्या म्हणाल्या होत्या. अखेर संध्याकाळी आश्वासन मिळाल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले. खडसे यांच्याशी संबंधित भूखंडविक्रीची आणखी तीन प्रकरणे उघड करून, कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप पत्रकारांशी बोलताना केला. (प्रतिनिधी)आणखी तीन प्रकरणे :- ठाणे जिल्ह्यातील जव्हार वाडा तालुक्यातील आमगाव येथील ६३५ एकर इनामी जमीन वनविभागाची होती. त्याला ‘डी फॉरेस्ट’ दर्शवत सेझ लागू करून, महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणला (एमआयडीसी) विकण्याचा प्रयत्न होता. त्याच्या खरेदीसाठी निरज कोचर यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, प्रांत, त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी, कोकण विभागाचे अप्पर आयुक्त (अपील) यांनी सुनावणी घेऊन फेटाळून लावत भूखंड ‘शासन जमा’ असल्याचा शेरा दिला. त्यानंतर, आठ महिन्यांत खडसे यांनी आपल्यासमोर सुनावणी घेऊन भूखंड खरेदीला मान्यता दिली. बाजारभावानुसार एक एकरमागे सरासरी दोन कोटींच्या हिशोबाने या जमिनीची किंमत १,२७० कोटी इतकी होते. चार शासकीय अधिकाऱ्यांनी व्यवहार फेटाळून लावला असताना, खडसे यांनी त्याला मान्यता देण्यामागील हेतू काय, हे स्पष्ट करावे आणि तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असताना, त्यांनी कोचरच्या विराज प्रापर्टीज कंपनीच्या व्यवहाराला कडाडून विरोध केला होता. मात्र, महसूलमंत्री झाल्यानंतर याबाबतचे त्यांचे ‘मतपरिवर्तन’ कसे झाले, हे स्पष्ट करण्याची मागणी दमानिया यांनी केली.- पालघर जिल्ह्यातील मान तालुक्यातील मौज गावातील शासनाच्या १०३ एकर २८ गुंठे भूखंडाच्या व्यवहारही अशाच पद्धतीने करण्यात आला आहे. - लोणावळा येथील अ‍ॅम्बी व्हॅली येथील हिल स्टेशन म्हणून जाहीर केलेली ८९ एकर ३६ गुंठे जमिनीचा व्यवहार विशेष मान्यता देऊन करण्यात आला.