शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बबनराव लोणीकरांना उपचारांची गरज - अशोक चव्हाण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 04:14 IST

राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय नेत्यांबाबत ते बेताल वक्तव्ये करीत आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी करण्याऐवजी त्यांनी तातडीने मानसिक उपचार घ्यावेत, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली.

मुंबई : राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय नेत्यांबाबत ते बेताल वक्तव्ये करीत आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी करण्याऐवजी त्यांनी तातडीने मानसिक उपचार घ्यावेत, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली.राहुल गांधी यांच्या खासगी आयुष्याबाबत हीन पातळीवर येऊन बेताल वक्तव्य करणा-या लोणीकरांचा तीव्र निषेध करून, अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून मिरविणा-या लोणीकरांनी विरोधकांच्या सभा उधळून लावा, त्यांचे पुतळे जाळा, त्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून आणा, अशी चिथावणीखोर आणि हिंसक भाषा वापरली आहे. त्यांच्या वक्तव्यातून भाजपाच्या सुसंस्कृतपणाचा बुरखा फाटला आहे, असे चव्हाण म्हणाले.सरकारच्या चुकीच्या धोरणांवर, निर्णयांवर टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. विरोधी पक्षांना संविधानाने हा अधिकार दिला आहे, परंतु भाजपाला संविधानही मान्य नाही आणि लोकशाहीवरही विश्वास नाही. त्यांना हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करायचा आहे. त्यामुळेच विरोधकांना मारहाण करा, तोडफोड करा, त्यांच्या सभा उधळून लावा, अशा पद्धतीच्या धमक्या भाजपाचे मंत्री देत आहेत. भाजपावाल्यांच्या या धमक्यांना काँग्रेस भीक घालत नाही. भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आणि कामावर प्रहार करण्याचे काम आम्ही यापुढेही जारी ठेवू. यापूर्वीही भाजपा नेत्यांनी शेतकरी आणि विरोधी पक्षांबाबत बेताल वक्तव्ये केली आहेत. सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपा नेते अशी बडबड करीत आहेत. त्यांची ही सत्तेची नशा उतरविल्याशिवाय जनता शांत राहणार नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Mumbaiमुंबई