शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करणार - बबनराव लोणीकर

By admin | Updated: June 30, 2016 15:16 IST

राज्यातील ५ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून ३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे, असे बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ३० -  समृध्दीचा मार्ग स्वच्छतेच्या वाटेवरुन जातो. महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश यापूर्वीच दिला आहे. त्यांची ही शिकवण पूढे नेण्याचा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील ५ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून ३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे, असे पाणीपुरवठा  व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. स्वच्छतेच्या संदेशाच्या वारक-यांनी साºया देशभर प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
 पंढरपूर नगरपारिषदेच्या वतीने आयोजित शहर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले उपस्थित होत्या.
 लोणीकर म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात लाखो वारकरी-भाविक येतात. या वारक-यांनी समाजाला नेहमी समता, बंधुता, सहिष्णुतेचे संदेश दिले आहेत. आता वारक-यांनी पंढरपुरातून स्वच्छतेचा संदेश संपूर्ण देशभर न्यावा व तेथे रुजवावा. पंढरपूरच्या यात्रेसाठी राज्य शासनाकडून २ कोटी रुपये दिले जात आहे परंतु यापूढे आणखी निधी  देण्याचा प्रयत्न असेल. या माध्यमातून स्वच्छतेची कामे चांगल्या प्रकारे होतील. केवळा राज्य शासनाच्या प्रयत्ननातून पंढरपुरात स्वच्छता होणार नाही, त्यासाठी शहरवासीयांनी पंढरपूर स्वच्छतेसाठी आपले योगदान देण्याची आवश्यकता आहे असेही लोणीकर म्हणाले.