शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बाराशे कोटींचा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 03:46 IST

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ‘गंगाखेड शुगर’ कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व संचालक मंडळाने ३० हजार शेतकºयांच्या खोट्या सह्या व बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल बाराशे कोटींचे कर्ज लाटले आहे.

मुंबई : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ‘गंगाखेड शुगर’ कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व संचालक मंडळाने ३० हजार शेतकºयांच्या खोट्या सह्या व बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल बाराशे कोटींचे कर्ज लाटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही संबंधितांना अटक होत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला.दरम्यान, यावर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर या प्रश्नावरील चर्चेदरम्यान समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने, तसेच न्यायालयीन आदेशाचा सरकारी निवेदनात उल्लेख करण्यात आला नसल्याने, ही लक्षवेधी राखून ठेवण्यात आली.‘गंगाखेड शूगर’चे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी शेतकºयांच्या नावे परस्पर कर्ज लाटल्याचा मुद्दा मुंडे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीेद्वारे उपस्थित केला. गुट्टे यांनी अडीच एकराच्या सातबारावर ५०२ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची गंभीर बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली. २०१२ मध्ये मृत पावलेल्या २२५ शेतकºयांच्या नावे परस्पर कर्ज काढले आहे, तसेच हे कर्ज संबंधित शेतकºयांच्या खात्यांऐवजी गंगाखेड शुगरच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. यात बँकांचे अधिकारीही सहभागी आहेत. मागील दहा महिन्यांपासून आपण स्वत: या भ्रष्टाचार प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे अन्वेषण आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, सरकारकडून आपल्या पत्रांची कोणतीही दखल घेण्यात आली, उलट गुट्टे यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला, परंतु २२ दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या संदर्भात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलेले निवेदन सत्य दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. परभणी, मराठवाडा आणि विदर्भापर्यंत या घोटाळ्याची व्याप्ती आहे.