शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आजम खानची जीभ हासडण्याची हिंमत भाजपमध्ये आहे ? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 21, 2016 07:52 IST

सामनाच्या अग्रलेखात समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री आजम खान यांना लक्ष्य करताना भाजपावर निशाणा साधला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २१ - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री आजम खान यांना लक्ष्य करताना भाजपावर निशाणा साधला आहे. ‘मला चहा बनवता येतो, चांगले कपडे घालता येतात आणि ड्रमही वाजवता येतो. त्यामुळे मी पंतप्रधान होऊ शकतो,’’ असे तोंडाचे डबडे वाजवून आजम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. 
 
एरवी मुंबईतील काही टिनपाट लोक ऊठसूट शिवसेनेवर टीका करीत आहेत. वातानुकूलित चेंबरमध्ये बसून शब्दांचे तोबरे सोडायला अक्कल लागत नाही, पण या टिनपाट लोकांनी आजम खान यांच्यासारख्यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवायला हवी. 
 
आजम खान मोदी यांची खिल्ली उडवीत आहेत व लखनौ-मुंबईचे भाजपवीर शिवसेनेवर टीका करण्यात जीवनाचे सार्थक मानीत आहेत. मोदींची खिल्ली उडवणा-या आजम खानची जीभ हासडून बाहेर काढण्याची हिंमत भाजप पदाधिकार्‍यांत आहे काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- आजम खान मोदी यांची खिल्ली उडवीत आहेत व लखनौ-मुंबईचे भाजपवीर शिवसेनेवर टीका करण्यात जीवनाचे सार्थक मानीत आहेत. मोदी यांनी चहा विकता विकता देशभक्ती केली. आजम खान यांनी उलटे केले. या देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, सर न्यायाधीश अनेकदा मुसलमान झाले व त्यांनी उत्तम काम केले. आजम खान यांनी हे सर्व लक्षात घेतलेले दिसत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला असे जरी असले तरी आजम खानची जीभ हासडून बाहेर काढण्याची हिंमत भाजप पदाधिकार्‍यांत आहे काय? 
 
- मुंबईतील काही टिनपाट लोक ऊठसूट शिवसेनेवर टीका करीत आहेत. वातानुकूलित चेंबरमध्ये बसून शब्दांचे तोबरे सोडायला अक्कल लागत नाही, पण या टिनपाट लोकांनी आजम खान यांच्यासारख्यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवायला हवी. आजम खान यांनी पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष केले आहे. ‘‘मला चहा बनवता येतो, चांगले कपडे घालता येतात आणि ड्रमही वाजवता येतो. त्यामुळे मी पंतप्रधान होऊ शकतो,’’ असे तोंडाचे डबडे वाजवून आजम खान यांनी पंतप्रधानांची खिल्ली उडवली आहे. देशाच्या पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे योग्य नाही, पण आजम खान यांच्यासारख्यांच्या डोक्यावर फरकॅप असली तरी टोपीखालच्या कवटीत मेंदू नाही 
 
- पंतप्रधान होण्यासाठीची योग्यता काय याचा पाढा आजम खान यांनी वाचला. पण देशभक्ती हा सर्वात मोठा गुण रक्तात भिनावा लागतो, जो मोदींच्या रक्तात आहे. आजम मियाँच्या रक्तात तो आहे काय ते सांगता येणार नाही. मुसलमानांचे नेतृत्व करायला हरकत नाही. कारण राजकारणात हीच त्यांची रोजीरोटी आहे, पण ऊठसूट मुसलमानांची माथी भडकवून आगी लावायच्या व त्यावर राजकीय ‘कबाब’ भाजून घ्यायचा हा अतिरेक आहे. आजम खान त्या प्रकारचे अतिरेकी आहेत. आजम खान कधी पाकिस्तानचे गोडवे गातात तर कधी हिंदुस्थानातील मुसलमान असुरक्षित असल्याची बांग ठोकत ‘युनो’ला साकडे घालतात. हा सरळ सरळ देशद्रोहच आहे.  
 
- पंतप्रधान मोदी हे चहावाले जरूर असतील, पण आजम खानप्रमाणे बिनडोक आणि धर्मांध नक्कीच नाहीत. एक चहा विकणारा सामान्य माणूस देशाचा पंतप्रधान होतो हा आपल्या लोकशाहीचा व सामान्य जनतेचा विजय आहे. पंतप्रधानांनी चांगले कपडे घालणे हा गुन्हा नाही. शिवाय देश तसा वेश या न्यायाने एखाद्या समुदायात सहभागी होत पंतप्रधानांनी त्यांच्या परंपरागत नाचगाण्यात सामील होणे किंवा वाद्य वाजवणे हादेखील टीकेचा विषय होऊ शकत नाही. पंडित नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी यांनी हे सर्व वेळोवेळी केले आहे. त्यामुळे आजम खान यांचा निशाणा साफ चुकला आहे. पंतप्रधान झालो तर प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात २५-२५ लाख जमा करीन, अशी कोपरखळी आजम खान यांनी मारली. ती भाजप पुढार्‍यांना झोंबणारी आहे. कारण सत्तेवर येताच सर्व काळाबाजारवाल्यांना धडा शिकवू, परदेशी बँकांतील लाखो कोटींचे काळे धन परत आणून जनतेच्या बँक खात्यात १५ लाख जमा करू, असे वचन मोदी यांनी दिले होते व आजम खानसारखे बेरकी त्यावरच प्रश्‍न विचारीत आहेत. 
 
- या प्रश्‍नाचे उत्तर शिवसेनेवर आंधळेपणाने टीका करणार्‍यांकडे नसावे. तसे ते असते तर छातीवरची बटणे तुटेपर्यंत दीर्घ श्‍वास घेऊन त्यांनी आजम खानला दम भरला असता, पण आजम खान मोदी यांची खिल्ली उडवीत आहेत व लखनौ-मुंबईचे भाजपवीर शिवसेनेवर टीका करण्यात जीवनाचे सार्थक मानीत आहेत. मोदी यांनी चहा विकता विकता देशभक्ती केली. आजम खान यांनी उलटे केले. त्यामुळे ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील खलनायक ठरत आहेत. आपण मुस्लिम आहोत हा एकच माझा कमकुवतपणा आहे असे त्यांनी सांगणे हा देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा अपमान आहे. या देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश अनेकदा मुसलमान झाले व त्यांनी उत्तम काम केले. आजम खान यांनी हे सर्व लक्षात घेतलेले दिसत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला असे जरी असले तरी आजम खानची जीभ हासडून बाहेर काढण्याची हिंमत भाजप पदाधिकार्‍यांत आहे काय?