शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे वाभाडे काढणा-या आझम खानला हाकला - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 7, 2015 09:04 IST

दादरी कांडानंतर भारतातील मुस्लिमांच्या दुर्दशेकडे 'युनो'ने लक्ष घालण्याची मागणी करत घरातले भांडण चव्हाट्यावर नेत हिंदुस्थानचे वाभाडे काढणा-या आझम खानची हकालपट्टी करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - दादरी हत्याप्रकरणानंतर हिंदुस्थानातील मुसलमानांच्या दुर्दशेकडे 'युनो'ने ( संयुक्त राष्ट्र संघ) लक्ष घालावे अशी मागणी करत देशाची इज्जत आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर नेणारे आझम खान हे एकप्रकारे देशद्रोही असून मुलायम सिंग यादव यांच्या धमन्यांत कणभर जरी राष्ट्रभक्ती असेल तर त्यांनी आझम खानची हकालपट्टी केली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आझम खानवर टीका केली आहे. 'सामना' या शिवेसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून त्यांनी आझम खान यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 
आझम खानला देशातील कुठल्याही घटानात्मक पदावर राहण्याचा अधिकार नसून निवडणूक आयोगाने त्यास निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे अशी मागणीही उद्धव यांनी केली आहे. दादरी येथे एका माणसाच्या मृत्यूनंतर सर्व  बेगडी निधर्मी पक्ष व पुढारी नक्राश्रू ढाळत आहेत, मात्र मक्केतील चेंगराचेंगरीत हजारांवर मुस्लिम चिरडून मेले, त्यात शंभरेक भारतीयांचा समावेश आहे, पण त्या घटनेबाबत एकाही राजकीय पुढा-याने साधा उसासाही सोडला नाही. कारण त्यांच्या मरणाचा 'व्होट बँकेशी' संबंध नाही, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे.
दादरी प्रकरणावरून भाजपावर होणा-या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला आहे. ' या सर्व प्रकरणात भाजपाला हिंदुत्ववादी म्हणून झोडपणे सर्वार्थाने चूक आहे. सत्तेत असलेला भाजप शत-प्रतिशत निधर्मी म्हणूनच कारभार करीत आहे. मुसलमानांनी अर्ध्या रात्री दरवाजा ठोठवावा, आपण त्यांच्या मदतीस धावून जाऊ, असे वचन पंतप्रधान मोदी यांनीच दिले आहे. त्यामुळे अशा ‘निधर्मी’ राजवटीत मुसलमानांवर अत्याचार होतात म्हणून थेट ‘युनो’कडे धाव घेणे हा देशाचा व पंतप्रधान मोदींचा अपमान आहे' असे त्यांनी लेखात म्हटले आहे.
या लेखात उद्धव यांनी उत्तर प्रदेश सरकारवरही टीका केली आहे.  जिथे ही घटना घडली ती दादरी ही उत्तर प्रदेशात येते, त्यामुळे उत्तर प्रदेशचे सरकार निकामी व षंढ आहे असे म्हणावे लागेल. असे कुचकामी सरकार असल्यामुळे उत्तर प्रदेशची कायदा-सुव्यवस्था ढासळून तेथे अराजक निर्माण झाले आहे आणि त्यातूनच दादरीसारख्या घटना घडवून दोन धर्मांत तणाव निर्माण होत आहे. दादरी प्रकरण इतके झोंबले असेल तर आझम खान यांनी प्रथम मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता व मुख्यमंत्री अखिलेश यादवांचा राजीनामा मागायला हवा,अशी मागणी उद्धव यांनी केली आहे.