शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

आयुक्यांनी केल्या बदल्या

By admin | Updated: April 7, 2017 03:11 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील प्रभाग अधिकाऱ्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी काढला

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेतील प्रभाग अधिकाऱ्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी काढला. यातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात बदल करुन काही जणांवर अतिरीक्त पदभार सोपविण्यात आला आहे.काशिमिरा हायवे पट्टा, हाटकेश, महाजनवाडी, पेणकरपाडा, घोडबंदर या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली असताना त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या. या प्रभाग कार्यालयाचे अधिकारी संजय दोंदे यांच्या या कारभारात दुटप्पीपणाची कारवाई केली जात असल्याच्या तक्रारींसह त्यांची भूमाफिया यांच्या समवेत झालेल्या चर्चेचे संवाद रेकॉर्डिंग करुन पिडीतांनी आयुक्तांना तक्रारींसोबत दिले होते. अखेर आयुक्तांनी त्याची दखल घेत दोंदे यांची प्रभाग कार्यालय सहा मधून उचलबांगडी केली. त्यांना जाहिरात विभागासह घनकचरा प्रकल्पातील दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्याचे वजनकाट्याद्वारे मोजमाप तसेच कचरा गाड्यांच्या दैनंदिन फेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. याच प्रभाग कार्यालयात सहायक अधिकारी म्हणून असलेले प्रकाश कुळकर्णी यांना याच प्रभागातंर्गत मुख्य शहरातील बेकायदा बांधकामांसह इतर महत्वाच्या प्रशासकीय कारभाराचे क्षेत्र सोपविण्यात आले आहे. तर उर्वरित काशिमिरा हायवे पट्टा, हाटकेश, महाजनवाडी, पेणकरपाडा, घोडबंदर आदी क्षेत्रातील बेकायदा बांधकामांसह दैनंदिन प्रशासकीय कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जाधव यांची प्रभाग कार्यालय तीनमधून उचलबांगडी करुन त्यांना प्रभाग कार्यालय सहामध्ये बदली करण्यात आली आहे. स्थानिक संस्था कर विभागप्रमुख तसेच वाहनविभागाचे प्रमुख अधिकारी सुदाम गोडसे यांची प्रभाग कार्यालय तीनमध्ये बदली झाली आहे. त्यांच्याकडील वाहन विभागाचा अतिरीक्त कार्यभार लेखापरीक्षण विभागातील सहायक मुख्य लेखापरीक्षक चिंतामण शिंदे यांच्याकडे दिला आहे. (प्रतिनिधी)>दोंदे, जाधवांचा भोंगळ कारभारस्थानिक संस्था कर विभागाच्या प्रमुखपदी परिवहन विभागातील लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले जनार्दन भासे यांची बदली करण्यात आली आहे. दोंदे, जाधव यांच्यासह इतर प्रभाग अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारावर अंकुश ठेवून त्यांची मार्च महिन्यातच बदली करण्याचे आदेश आयुक्तांनी आस्थापना विभागाला दिले होते.