शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

ऐन उन्हाळ्यात तरणतलावांना टाळे

By admin | Updated: April 5, 2017 02:29 IST

मुंबईत उष्णतेचा पारा चढला असल्याने, तरणतलावात पोहण्यास जाणाऱ्याची संख्या अधिक असते.

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना खास आकर्षण असते, ते तरण तलावांचे. मुंबईत उष्णतेचा पारा चढला असल्याने, तरणतलावात पोहण्यास जाणाऱ्याची संख्या अधिक असते. मात्र, दादर, मुलुंड, अंधेरी, कांदिवली, चेंबूर येथील महापालिकेच्या मालकीचे ५ तरणतलाव विविध कारणांमुळे सध्या बंद आहेत. त्यामुळे या उन्हाळ्यात मुलांना पोहण्याची हौस भागविता येणार नाही.दोन वर्षांपूर्वी मुंबईत अपुरा पाऊस झाल्याने, पालिकेने सावधगिरी म्हणून २० टक्के पाणीकपात जाहीर केली होती, तसेच या काळात सर्व तरणतलावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, वर्षभर तरणतलाव बंद राहिल्याने, त्यांच्या पाणी फिल्टर यंत्रणेत बिघाड झाला आहे. दादरचा महात्मा गांधी तरणतलाव, मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहातील तरणतलाव व शहाजीराजे संकुलातील तरण तलाव हे तलाव बंद पडले आहेत. (प्रतिनिधी)>लवकरच सुरू करणारयाचे तीव्र पडसाद महापालिकेच्या महासभेत उमटले. नगरसेवकांनी तीव्र नाराजी करीत, तत्काळ तरणतलाव उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी सुुरू करण्याची सूचना केला. त्यानुसार, लवकरच हे सर्व तरणतलाव सुरू करण्याचे आदेश देणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. >या कारणांमुळे तरणतलावांना टाळेदादर येथील तरणतलावात पाण्याचा दर्जा खराब झाल्याने, मुलुंड येथील तरणतलावातील क्लोरिनेशन यंत्रणा बिघडल्याने, तर अंधेरी येथील तरणतलावातील फिल्टरमध्ये वाळू गेल्याने, गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. दुरुस्तीनिमित्त कांदिवली व चेंबूर येथील तरणतलाव काही वर्षांपासून बंद आहेत.