शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
4
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
5
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
6
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
7
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
8
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
9
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
10
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
11
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
12
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
13
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
14
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
15
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
16
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
17
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
18
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
19
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
20
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

रॅडिकोविरुद्ध गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ

By admin | Updated: June 27, 2015 02:09 IST

सार्वजनिक नदी, नाल्यात केमिकल कालविणे हा गंभीर गुन्हा आहे. तो गुन्हा शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रॅडिको कंपनीने गेली अनेक वर्षे राजरोसपणे केला.

औरंगाबाद : सार्वजनिक नदी, नाल्यात केमिकल कालविणे हा गंभीर गुन्हा आहे. तो गुन्हा शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रॅडिको कंपनीने गेली अनेक वर्षे राजरोसपणे केला. मात्र, केवळ या कंपनीत राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा पालवे यांचे पती चारुदत्त पालवे यांची भागीदारी असल्यानेच या राजकीय दबावापोटीच कंपनीविरुद्ध गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. रॅडिकोविरुद्ध सर्व पुरावे, अहवाल असतानाही मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? असा प्रश्न पोलीस, महसूल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर उभा राहिला आहे. त्यामुळेच या तिन्ही विभागांनी आतापर्यंत केवळ कागदी घोडे नाचविण्याचेच काम केल्याचे समोर आले आहे. पोलिसांची कागदोपत्री कारवाईरॅडिको कंपनी आपले घातक रसायन थेट कुंभेफळच्या नाल्यामार्गे सुखनात सोडत असल्याची तक्रार ३१ मार्च रोजी मराठवाडा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने करमाड ठाण्यात केली. मध्यरात्री सहायक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सहायक फौजदार आर. डी. चव्हाण व सहकाऱ्यांना तपासणीसाठी पाठविले. पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तेव्हा रॅडिको नाल्यात विष सोडत असल्याचे आढळून आले. त्यानंतर ९ एप्रिल रोजी सहायक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रॅडिको कंपनी ही आपले घातक रसायन नाल्यास सोडत असून, नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कंपनीविरुद्ध सीआरपीसी कलम १३३ (ख) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल बनविला आणि तो औरंगाबादच्या तहसीलदारांकडे पाठवून देत कागदोपत्री कारवाईची केवळ औपचारिकता पार पाडली. पोलिसांचा असाही भेदभाववास्तविक पाहता ग्रामीणचे सहायक अधीक्षक पोद्दार यांनी तहसीलदारांना अहवाल पाठविण्याऐवजी स्वत: ही फिर्यादी होऊन या कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविता आला असता. मात्र, त्यांनी तसे केले नाही. दुसरीकडे रॅडिकोप्रमाणेच शहरातील खाम नदीत एका कंपनीचे घातक केमिकल मिसळण्यात येत होते. औरंगाबाद शहर पोलिसांना याची कुणकुण लागताच पोलिसांनी छापा मारून केमिकल ओतणाऱ्या आठ जणांना अटक केली. त्यातील अनेक आरोपी गेल्या चार महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. खाम नदीत जसे विष कालविण्यात येत होते, त्याच प्रकारचा गुन्हा रॅडिकोकडून होत आहे. मग का गुन्हा नोंदविला नाही?, असा प्रश्न उपस्थित होतो.