शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विमानोड्डाण २०१९मध्ये

By admin | Updated: December 19, 2014 05:04 IST

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमधील पर्यावरण, जमीन संपादन, नफ्याचे वाटप असे सर्व अडथळे दूर झाले असून नियोजित वेळापत्रकानुसार २०१९ साली येथून पहिल्या विमानाचे उड्डाण होईल

नागपूर : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमधील पर्यावरण, जमीन संपादन, नफ्याचे वाटप असे सर्व अडथळे दूर झाले असून नियोजित वेळापत्रकानुसार २०१९ साली येथून पहिल्या विमानाचे उड्डाण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत व्यक्त केला.संजय दत्त, भाई जगताप आदी सदस्यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेत सुनील तटकरे, किरण पावसकर, जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विमानतळ असून त्याची किंमत १४ हजार ५७३ कोटी रुपये आहे. २२६८ हेक्टर जमिनीवर उभ्या राहणाऱ्या या विमानतळावरून दरवर्षी ६० दशलक्ष प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. पर्यावरणाबाबतच्या सर्व मंजुरी मिळाली असून देशातील सर्वात महागडे पॅकेज जमीन संपादनाकरिता दिलेले आहे. प्रति हेक्टर १४ कोटी रुपये प्रकल्पग्रस्तांना मिळालेले आहेत. ज्यांच्या जमिनी या प्रकल्पाकरिता संपादित केल्या जाणार आहेत. त्यांच्यापैकी ९१ टक्के लोकांची संमतीपत्रे मिळाल्याने विमानतळाच्या कोअर क्षेत्राकरिता लागणाऱ्या ६७१ हेक्टर जमिनीपैकी ५९२ हेक्टर जमीन संपादन करण्यातील अडथळे संपुष्टात आले आहेत. ज्यांनी प्रकल्पाच्या जमीन संपादनाला विरोध केला त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.विमानतळाच्या नफ्याचे वाटप करताना शेअर टील धोरण स्वीकारले असल्याने प्रवासी करात ३० टक्के सवलत देणे शक्य आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, ३१ जानेवारी पर्यंत यासंदर्भातील कंपन्यांचे प्रस्ताव प्राप्त होतील. त्यामुळे २०१९ साली पहिले विमान उड्डाण शक्य आहे. या प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्यांकरिता पुष्पकनगर व अन्य एक अशी दोन नगरे उभारण्यात येणार आहेत. मुंबईपेक्षा मोठे असे ६०० चौ.कि. क्षेत्रफळावर नवीन शहर उभे राहणार आहे. वेगवेगळ्या नागरी सुविधांकरिता जमीन संपादन न करता अहमदाबाद पॅटर्नच्या धर्तीवर लँड पुलिंगची योजना लागू केली आहे. त्यामुळे लोकांच्या जमिनीची किंमत वाढत असल्याने तसेच त्यांना टीडीआरचा लाभ होत असल्याने लोक सहभागी होत आहेत. येथील आर्थिक उलाढालींचा लाभ स्थानिकांना व सरकारला होणार आहे. विमानतळ व त्या परिसरातील पूरक उद्योगांत स्थानिकांना रोजगार मिळावा याकरिता सिडकोने कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रकल्पात सिडकोचा सहभाग २६ टक्के असल्याने सरकारचे नियंत्रण राहणार असून भविष्यात करारनामे करताना नियमांचा अंतर्भाव केला जाणार आहे, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)