शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

विमानवारीसाठी साहित्यिक ‘प्रचंड आशावादी’

By admin | Updated: November 14, 2014 00:51 IST

गेले काही वर्ष विश्व साहित्य संमेलन झालेच नाही. त्यामुळे विदेशात विमानाने जाण्याची साहित्यिकांची संधी हुकली. यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या घुमान येथे होणार आहे. साहित्यिकांचा वेळ वाचावा

कमी खर्चात घुमानला जाणार विमान : कंपनीशी बोलणी सुरू राजेश पाणूरकर - नागपूरगेले काही वर्ष विश्व साहित्य संमेलन झालेच नाही. त्यामुळे विदेशात विमानाने जाण्याची साहित्यिकांची संधी हुकली. यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या घुमान येथे होणार आहे. साहित्यिकांचा वेळ वाचावा आणि कमी खर्चात साहित्यिकांना जास्तीतजास्त संख्येने घुमानच्या साहित्य संमेलनात सहभागी होता यावे म्हणून भोपाळ, नागपूर, पुणे येथून विशेष विमाने सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी पुण्यातून एक विशेष विमान घुमानसाठी निश्चित करण्यात आले आहे. नागपूर आणि भोपाळ येथूनही घुमानसाठी थेट विशेष विमान सोडण्यात यावे म्हणून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे घुमानच्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून भोपाळ आणि नागपूर येथूनही विशेष विमानाची सोय करण्यात येईल, याबाबत साहित्यिक ‘प्रचंड आशावादी’ आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीने नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. रसिक आणि कलांवर प्रेम करणाऱ्या शरद पवार यांनी संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी पुण्यातून एक विमान घुमानसाठी विशेषत्त्वाने निश्चित केले आहे. यामुळे पुणे आणि परिसरातील साहित्यिक, रसिक तसेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी थेट विमानाने घुमानला पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या आयोजन समितीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या गिरीश गांधी यांनीही नागपुरातून विशेष विमान घुमानसाठी सोडण्याची तयारी चालविली आहे.विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी, विदर्भातील रसिक यांना घुमानला विमानाने कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचता यावे. हा उद्देश यामागे आहे. त्यासाठी विमान कंपन्यांशी गिरीश गांधी यांची बोलणी सुरू असून यासंदर्भात योजना करण्यासाठी गिरीशभाऊ थेट दिल्लीत पोहोचले आहेत. संमेलनाचे आयोजक भारत देसडला, संजय नहार यांची दिल्लीत भेट घेऊन गिरीश गांधी यांनी नागपुरातून संमेलनासाठी विशेष विमान सोडण्यात यावे, यासाठी प्रभावी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश यावे म्हणून सारेच साहित्यिक आणि संमेलनाला जाऊ इच्छिणारे रसिक प्रार्थना करीत आहेत. भोपाळ येथूनही मराठी रसिक या संमेलनाला जाण्यासाठी इच्छूक असून रसिकांची संख्या पाहता भोपाळमधूनही विशेष विमानाची सोय करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळले. एकूणच घुमानच्या साहित्य संमेलनाला जाण्यासाठी यंदा चांगलाच उत्साह असून संत नामदेवांच्या नगरीत साहित्यिक रसिकांचे स्वागत करण्यासाठी आयोजकही उत्सुक आहेत.