शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

विमानवारीसाठी साहित्यिक ‘प्रचंड आशावादी’

By admin | Updated: November 14, 2014 00:51 IST

गेले काही वर्ष विश्व साहित्य संमेलन झालेच नाही. त्यामुळे विदेशात विमानाने जाण्याची साहित्यिकांची संधी हुकली. यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या घुमान येथे होणार आहे. साहित्यिकांचा वेळ वाचावा

कमी खर्चात घुमानला जाणार विमान : कंपनीशी बोलणी सुरू राजेश पाणूरकर - नागपूरगेले काही वर्ष विश्व साहित्य संमेलन झालेच नाही. त्यामुळे विदेशात विमानाने जाण्याची साहित्यिकांची संधी हुकली. यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या घुमान येथे होणार आहे. साहित्यिकांचा वेळ वाचावा आणि कमी खर्चात साहित्यिकांना जास्तीतजास्त संख्येने घुमानच्या साहित्य संमेलनात सहभागी होता यावे म्हणून भोपाळ, नागपूर, पुणे येथून विशेष विमाने सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी पुण्यातून एक विशेष विमान घुमानसाठी निश्चित करण्यात आले आहे. नागपूर आणि भोपाळ येथूनही घुमानसाठी थेट विशेष विमान सोडण्यात यावे म्हणून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे घुमानच्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून भोपाळ आणि नागपूर येथूनही विशेष विमानाची सोय करण्यात येईल, याबाबत साहित्यिक ‘प्रचंड आशावादी’ आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीने नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. रसिक आणि कलांवर प्रेम करणाऱ्या शरद पवार यांनी संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी पुण्यातून एक विमान घुमानसाठी विशेषत्त्वाने निश्चित केले आहे. यामुळे पुणे आणि परिसरातील साहित्यिक, रसिक तसेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी थेट विमानाने घुमानला पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या आयोजन समितीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या गिरीश गांधी यांनीही नागपुरातून विशेष विमान घुमानसाठी सोडण्याची तयारी चालविली आहे.विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी, विदर्भातील रसिक यांना घुमानला विमानाने कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचता यावे. हा उद्देश यामागे आहे. त्यासाठी विमान कंपन्यांशी गिरीश गांधी यांची बोलणी सुरू असून यासंदर्भात योजना करण्यासाठी गिरीशभाऊ थेट दिल्लीत पोहोचले आहेत. संमेलनाचे आयोजक भारत देसडला, संजय नहार यांची दिल्लीत भेट घेऊन गिरीश गांधी यांनी नागपुरातून संमेलनासाठी विशेष विमान सोडण्यात यावे, यासाठी प्रभावी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश यावे म्हणून सारेच साहित्यिक आणि संमेलनाला जाऊ इच्छिणारे रसिक प्रार्थना करीत आहेत. भोपाळ येथूनही मराठी रसिक या संमेलनाला जाण्यासाठी इच्छूक असून रसिकांची संख्या पाहता भोपाळमधूनही विशेष विमानाची सोय करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळले. एकूणच घुमानच्या साहित्य संमेलनाला जाण्यासाठी यंदा चांगलाच उत्साह असून संत नामदेवांच्या नगरीत साहित्यिक रसिकांचे स्वागत करण्यासाठी आयोजकही उत्सुक आहेत.