शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सरासरी ८१% मतदान

By admin | Updated: December 20, 2015 01:44 IST

राज्यातील २६ जिल्ह्यांमधील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच इतर ग्रामपंचायतींच्या ८८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले.

मुंबई : राज्यातील २६ जिल्ह्यांमधील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच इतर ग्रामपंचायतींच्या ८८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. प्राथमिक अंदाजानुसार, सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी दिली.राज्य निवडणूक आयोगाने २६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने उर्वरित २२० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी रविवारी होणार आहे व निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल, असे सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मतदान झालेल्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतीठाणे- ३, रायगड- ७, रत्नागिरी- ३३, सिंधुदुर्ग- २, नाशिक- १०, धुळे- १, जळगाव- ६, नंदुरबार- ८२, अहमदनगर- ४, पुणे- ४, सोलापूर- ११, सातारा- ७, कोल्हापूर- ३, औरंगाबाद- ३, नांदेड- ७, परभणी- ४, उस्मानाबाद- २, जालना- ४, लातूर- १, हिंगोली- ३, यवतमाळ- १, वाशीम- ३, बुलढाणा- ३, चंद्रपूर- ७, भंडारा- ४ आणि गडचिरोली- ५. एकूण- २२०.