शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजुरांची वणवण कायम

By admin | Updated: April 16, 2016 02:26 IST

निसर्गाची अवकृपा आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आष्टी तालुक्यातील मजुरांवर पुन्हा स्थलांतराची वेळ आली आहे. ऊसतोडीसाठी गेलेले कडा परिसरातील मजूर गावी

- नितीन कांबळे, आष्टी (जि.बीड)

निसर्गाची अवकृपा आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आष्टी तालुक्यातील मजुरांवर पुन्हा स्थलांतराची वेळ आली आहे. ऊसतोडीसाठी गेलेले कडा परिसरातील मजूर गावी आल्यानंतर आठ दिवस होत नाही तोच काहीही काम न मिळाल्याने त्यांना अहमदनगर येथे जाऊन काम शोधण्याची वेळ आली आहे. कारखान्याच्या गळीत हंगामात तालुक्यातून ६० हजार मजुरांचे स्थलांतर झाले होते. हंगाम पूर्ण झाल्याने १५ दिवसांपासून हे मजूर गावी परतू लागले आहेत. गावी परतूनही मजुरीचा प्रश्न कायम आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मजुरांना अहमदनगरमधील एमआयडीसी तसेच व्यापाऱ्यांकडे काम करण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय स्तरावरील कामे प्रक्रियेत रखडली आहेत. तालुक्यात एम.आर.जी. एस अंतर्गत २२५ कामे सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत; मात्र मजुरांची संख्या पाहता कामांची संख्या अत्यल्प आहे. आष्टी तालुक्यात १२१ ग्रामपंचायती असून, तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखाच्ंया घरात आहे. तब्बल सहा महिने ऊसतोडणीसाठी परराज्यात गेलेले मजूर परतले खरे, मात्र पुन्हा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यावर पुन्हा भटकंतीची वेळ आल्याचे नवनाथ झांजे यांनी सांगितले. तालुक्यात मजुरांची संख्या वाढली असून त्या तुलनेत कामांची संख्या मात्र अपुरी आहे. अधिकारी मात्र यंत्राद्वारेच कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत.दिवस उजाडताच आमच्या गावातून १०० ते १२५ मजूर नगरला जातात. गावात हताश होऊन बसण्यापेक्षा हाताला मिळेल ते काम आम्ही करीत आहोत. मजुरांची संख्या वाढल्याने दोनशे पन्नास रुपयांचा रोजगार २०० रुपयांवर आला आहे. - साहेबराव गरूड, मजूर, कडा (बीड)कारखान्यावर गेल्यावर कामाची तरी शाश्वती असते; मात्र गावात येऊन पुन्हा तोच प्रश्न समोर येत आहे. उपासमार काय असते हे आम्ही अनुभवायला लागलो आहोत. प्रशासनाने कामांसंदर्भात ठोस पावले उचलावीत, अन्यथा जगणे मुश्किल होणार आहे. - चंद्रकला कांबळे,महिला कामगार, घाटापिंप्रीतालुक्यातील विविध गावात २२५ कामे एम.आर.ए.जी.एस.अंतर्गत सुरू झाली आहेत. त्यावर २,९०० मजूर काम करीत आहेत. तसेच एप्रिल महिन्याच्या अखेरीस इतर ठिकाणीही कामे सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला आहे. - रामेश्वर गोरे, तहसीलदार