शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजुरांची वणवण कायम

By admin | Updated: April 16, 2016 02:26 IST

निसर्गाची अवकृपा आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आष्टी तालुक्यातील मजुरांवर पुन्हा स्थलांतराची वेळ आली आहे. ऊसतोडीसाठी गेलेले कडा परिसरातील मजूर गावी

- नितीन कांबळे, आष्टी (जि.बीड)

निसर्गाची अवकृपा आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आष्टी तालुक्यातील मजुरांवर पुन्हा स्थलांतराची वेळ आली आहे. ऊसतोडीसाठी गेलेले कडा परिसरातील मजूर गावी आल्यानंतर आठ दिवस होत नाही तोच काहीही काम न मिळाल्याने त्यांना अहमदनगर येथे जाऊन काम शोधण्याची वेळ आली आहे. कारखान्याच्या गळीत हंगामात तालुक्यातून ६० हजार मजुरांचे स्थलांतर झाले होते. हंगाम पूर्ण झाल्याने १५ दिवसांपासून हे मजूर गावी परतू लागले आहेत. गावी परतूनही मजुरीचा प्रश्न कायम आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मजुरांना अहमदनगरमधील एमआयडीसी तसेच व्यापाऱ्यांकडे काम करण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय स्तरावरील कामे प्रक्रियेत रखडली आहेत. तालुक्यात एम.आर.जी. एस अंतर्गत २२५ कामे सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत; मात्र मजुरांची संख्या पाहता कामांची संख्या अत्यल्प आहे. आष्टी तालुक्यात १२१ ग्रामपंचायती असून, तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखाच्ंया घरात आहे. तब्बल सहा महिने ऊसतोडणीसाठी परराज्यात गेलेले मजूर परतले खरे, मात्र पुन्हा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यावर पुन्हा भटकंतीची वेळ आल्याचे नवनाथ झांजे यांनी सांगितले. तालुक्यात मजुरांची संख्या वाढली असून त्या तुलनेत कामांची संख्या मात्र अपुरी आहे. अधिकारी मात्र यंत्राद्वारेच कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत.दिवस उजाडताच आमच्या गावातून १०० ते १२५ मजूर नगरला जातात. गावात हताश होऊन बसण्यापेक्षा हाताला मिळेल ते काम आम्ही करीत आहोत. मजुरांची संख्या वाढल्याने दोनशे पन्नास रुपयांचा रोजगार २०० रुपयांवर आला आहे. - साहेबराव गरूड, मजूर, कडा (बीड)कारखान्यावर गेल्यावर कामाची तरी शाश्वती असते; मात्र गावात येऊन पुन्हा तोच प्रश्न समोर येत आहे. उपासमार काय असते हे आम्ही अनुभवायला लागलो आहोत. प्रशासनाने कामांसंदर्भात ठोस पावले उचलावीत, अन्यथा जगणे मुश्किल होणार आहे. - चंद्रकला कांबळे,महिला कामगार, घाटापिंप्रीतालुक्यातील विविध गावात २२५ कामे एम.आर.ए.जी.एस.अंतर्गत सुरू झाली आहेत. त्यावर २,९०० मजूर काम करीत आहेत. तसेच एप्रिल महिन्याच्या अखेरीस इतर ठिकाणीही कामे सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला आहे. - रामेश्वर गोरे, तहसीलदार