शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

‘आॅटो हब’ नागपुरातच व्हावा

By admin | Updated: December 24, 2014 00:48 IST

रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला ‘आॅटो हब’ नागपुरात स्थापन व्हावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. ही मागणी सर्वप्रथम लोकमत

विजय दर्डा यांच्या मागणीचे समर्थन : इंटकची २८ पासून जनजागृती मोहीमनागपूर : प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला ‘आॅटो हब’ नागपुरात स्थापन व्हावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. ही मागणी सर्वप्रथम लोकमत समूहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी देशभरातील आॅटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित उद्योजक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दर्डा यांच्या मागणीचे समर्थन इंटकचे संघटन सचिव राजेश निंबाळकर यांनी केले असून या मुद्यावर इंटकचे कार्यकर्ते २८ डिसेंबरपासून विशेष जनजागृती अभियान राबविणार आहेत.निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील सातही विभागात सुरू असलेल्या आॅटोमोबाईल उद्योगांची माहिती एमआयडीसीचे अधिकारी आणि विविध कामगार संघटनांकडून जाणून घेतली. विदर्भात सहायक कंपन्या नसल्याचे कारण पुढे करून देशातील नामांकित आॅटोमोबाईल उद्योजकांनी अन्य ठिकाणी उद्योग स्थापन केले आहेत. सध्या पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बारामती, ठाणे या जिल्ह्यांमध्ये हजारो युवकांना रोजगार देणारे मोठे उद्योग सुरू आहेत. या उद्योगांवर आधारित सुरू असलेल्या सहायक उद्योगांमध्ये पुणे येथे ४६, नाशिक ९३, कोल्हापूर १३७, औरंगाबाद ५०, बारामती १२, ठाणे येथे ३० आॅटो निर्मिती उद्योग गेल्या २० ते २५ वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू आहेत. याउलट विदर्भात ट्रॅक्टर कंपनी आणि अशोक लेलँड ट्रकच्या सहायक युनिटसह केवळ सहा उद्योग सुरू असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शासनाची असमतोल भूमिकागेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाची असमतोल भूमिका आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष केल्याचे सपशेल दिसून येते. रोजगाराचा अधिकार मिळाला पाहिजे. विदर्भात हजारो शिक्षित तरुण बेरोजगार आहेत. त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास खुंटला आहे. शिक्षित तरुण पुणे येथे नोकरीसाठी गेल्याने टेक्निकल अपग्रेडेशन थांबले आहे. नागपूर शहर सोडून अन्य ठिकाणी जाण्याची इच्छा नसलेले इंजिनिअर्स शैक्षणिक पेशात आहेत. त्यांना १० ते १५ हजारांच्या जवळपास पगार मिळतो. विदर्भात मोठ्या आॅटो इंडस्ट्री आणि त्यावर आधारित सहायक कंपन्या असत्या तर येथील तरुण या उद्योगांमध्ये मोठ्या हुद्यावर असते आणि विदर्भाचा विकास झाला असता. १५ ते २० वर्षांत अनेक आॅटो कारखाने निघाले. आम्हाला काहीच माहिती नाही. या वेदना आहेत. नागपूर देशाचे मध्यवर्ती शहरनागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि देशाचे मध्यवर्ती शहर आहे. येथे जागेची उपलब्धता आणि प्रस्तावित उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक घटक आहेत. नागपूर हे रस्ते, रेल्वे आणि विमानमार्गे जोडले आहे. त्यानंतरही उद्योजक नवे उद्योग वा विस्तारीकरण प्रकल्प नागपुरात स्थापन करण्यास उत्सुक नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असून, त्यांना विदर्भाची माहिती आहे. त्यामुळेच विदर्भात आॅटो हब स्थापन व्हावे, अशी अपेक्षा त्यांच्यापासून आहे. नेत्यांनी ताकदीचे आश्वासन द्यावेऔद्योगिक शांतता, राजकीय आणि शासकीय पाठिंब्याचे जो नेता आश्वासन देतो, तिथेच उद्योग सुरू होतात, असा अनुभव असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. नेत्यांमध्ये इच्छाशक्ती असावी, पोकळ आश्वासनांना बगल देताना ताकदीचे आश्वासन देण्याची नेत्यांची भूमिका असावी, तरच विदर्भाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल.