शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅटो हब’ नागपुरातच व्हावा

By admin | Updated: December 24, 2014 00:48 IST

रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला ‘आॅटो हब’ नागपुरात स्थापन व्हावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. ही मागणी सर्वप्रथम लोकमत

विजय दर्डा यांच्या मागणीचे समर्थन : इंटकची २८ पासून जनजागृती मोहीमनागपूर : प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला ‘आॅटो हब’ नागपुरात स्थापन व्हावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. ही मागणी सर्वप्रथम लोकमत समूहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी देशभरातील आॅटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित उद्योजक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दर्डा यांच्या मागणीचे समर्थन इंटकचे संघटन सचिव राजेश निंबाळकर यांनी केले असून या मुद्यावर इंटकचे कार्यकर्ते २८ डिसेंबरपासून विशेष जनजागृती अभियान राबविणार आहेत.निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील सातही विभागात सुरू असलेल्या आॅटोमोबाईल उद्योगांची माहिती एमआयडीसीचे अधिकारी आणि विविध कामगार संघटनांकडून जाणून घेतली. विदर्भात सहायक कंपन्या नसल्याचे कारण पुढे करून देशातील नामांकित आॅटोमोबाईल उद्योजकांनी अन्य ठिकाणी उद्योग स्थापन केले आहेत. सध्या पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बारामती, ठाणे या जिल्ह्यांमध्ये हजारो युवकांना रोजगार देणारे मोठे उद्योग सुरू आहेत. या उद्योगांवर आधारित सुरू असलेल्या सहायक उद्योगांमध्ये पुणे येथे ४६, नाशिक ९३, कोल्हापूर १३७, औरंगाबाद ५०, बारामती १२, ठाणे येथे ३० आॅटो निर्मिती उद्योग गेल्या २० ते २५ वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू आहेत. याउलट विदर्भात ट्रॅक्टर कंपनी आणि अशोक लेलँड ट्रकच्या सहायक युनिटसह केवळ सहा उद्योग सुरू असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शासनाची असमतोल भूमिकागेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाची असमतोल भूमिका आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष केल्याचे सपशेल दिसून येते. रोजगाराचा अधिकार मिळाला पाहिजे. विदर्भात हजारो शिक्षित तरुण बेरोजगार आहेत. त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास खुंटला आहे. शिक्षित तरुण पुणे येथे नोकरीसाठी गेल्याने टेक्निकल अपग्रेडेशन थांबले आहे. नागपूर शहर सोडून अन्य ठिकाणी जाण्याची इच्छा नसलेले इंजिनिअर्स शैक्षणिक पेशात आहेत. त्यांना १० ते १५ हजारांच्या जवळपास पगार मिळतो. विदर्भात मोठ्या आॅटो इंडस्ट्री आणि त्यावर आधारित सहायक कंपन्या असत्या तर येथील तरुण या उद्योगांमध्ये मोठ्या हुद्यावर असते आणि विदर्भाचा विकास झाला असता. १५ ते २० वर्षांत अनेक आॅटो कारखाने निघाले. आम्हाला काहीच माहिती नाही. या वेदना आहेत. नागपूर देशाचे मध्यवर्ती शहरनागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि देशाचे मध्यवर्ती शहर आहे. येथे जागेची उपलब्धता आणि प्रस्तावित उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक घटक आहेत. नागपूर हे रस्ते, रेल्वे आणि विमानमार्गे जोडले आहे. त्यानंतरही उद्योजक नवे उद्योग वा विस्तारीकरण प्रकल्प नागपुरात स्थापन करण्यास उत्सुक नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असून, त्यांना विदर्भाची माहिती आहे. त्यामुळेच विदर्भात आॅटो हब स्थापन व्हावे, अशी अपेक्षा त्यांच्यापासून आहे. नेत्यांनी ताकदीचे आश्वासन द्यावेऔद्योगिक शांतता, राजकीय आणि शासकीय पाठिंब्याचे जो नेता आश्वासन देतो, तिथेच उद्योग सुरू होतात, असा अनुभव असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. नेत्यांमध्ये इच्छाशक्ती असावी, पोकळ आश्वासनांना बगल देताना ताकदीचे आश्वासन देण्याची नेत्यांची भूमिका असावी, तरच विदर्भाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल.