शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व

By admin | Updated: October 4, 2015 01:48 IST

ज्येष्ठ लेखक यशवंत पाध्ये यांच्या निधनाला ३० सप्टेंबर रोजी १ वर्ष झाले. १९७२ सालापासून शेवटपर्यंत त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख....

- मंदाकिनी भटज्येष्ठ लेखक यशवंत पाध्ये यांच्या निधनाला ३० सप्टेंबर रोजी १ वर्ष झाले. १९७२ सालापासून शेवटपर्यंत त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख.... यशवंतरावांचा आणि माझा परिचय झाला १९४२मध्ये. मी लेखनिक या नात्याने काही काम आहे का या भावनेतून त्यांना पत्र लिहिले होते; आणि ८ दिवसांतच मला बोलावले गेले. आमचे जुजबी बोलणे झाले आणि कामाला सुरुवात झाली, ती अगदी शेवटचे ‘पंचायतन’ या जुलै २०१४च्या पुस्तकापर्यंत! एवढ्या अवधीत जवळजवळ सव्वा ते दीड लाख पृष्ठांचे काम मी पार पाडले. १९८०पर्यंत झेरॉक्स हा प्रकार फारसा नव्हता. त्यामुळे कधीकधी एकेका लेखाच्या पाच-पाच प्रती याप्रमाणे पन्नास पृष्ठे एका दिवसात ते माझ्याकडून लिहून घेत असत. नंतर झेरॉक्सचा जमाना आला आणि एकाच लेखाच्या अनेक प्रती लिहून घेणे बंद झाले. पण लेखांची संख्या वाढली. त्यांच्या लिखाणामुळे त्यांनी साहित्याच्या बँकेत मात्र ‘बँक बॅलन्स’ अफाट कमावला होता. शेवटचे त्यांचे पुस्तक होते पाच संतांची ओळख करून देणारे ‘पंचायतन’!साहित्य क्षेत्रात यशवंतराव प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांना गुरूस्थानी मानत. यशवंतरावांनी आरंभी लेखन केले ते बरेचसे राजकीय, वैचारिक, चरित्रात्मक आणि मुलाखती स्वरूपातले! प्रत्येक लेख हा मागील लेखापेक्षा सरस असायचा. त्या लेखात अनेक बारकावे सहजपणे दाखवलेले असायचे! एकामागून एक जवळजवळ ४०-४५ पुस्तकांतून व्यक्तिचित्रण, राजकारण, धार्मिक, ऐतिहासिक, चिंतनात्मक, सामाजिक, बाल साहित्य असे विषय हाताळले गेले. जीवन समर्थपणे जगणारा लेखक, पत्रकार, स्तंभलेखक, समाजसेवक असा हा आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘यशवंत’ झाला. त्यांनी गर्व, मोठेपणा, अहंकार याला कधीही जवळ येऊ दिलं नाही. त्यांचे हे गुण ‘अर्थप्राप्ती’पेक्षा ‘गुणप्राप्ती’ देऊन गेले. यशवंतराव हे व्यक्तिमत्त्वच असं होतं की ते आपण विसरूच शकणार नाही.