शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

औरंगाबादचा धान्य अडत बाजार उद्या उघडणार

By admin | Updated: July 20, 2016 19:30 IST

तब्बल १३ दिवसांपासून बंद असलेल्या जाधववाडी कृउबा येथील धान्याचा अडत बाजार अखेर उद्या गुरुवार २१ रोजी सुरु होणार आहे. शेतकऱ्यांकडून अडत वसूल न करण्याचा राज्यशासनाच्या

१३ दिवसानंतर बेमुदत बंद मागे : शेतकऱ्यांकडून अडत वसूल न करण्याच्या अध्यादेशाचे व्यापारी पालन करणार

औरंगाबाद- तब्बल १३ दिवसांपासून बंद असलेल्या जाधववाडी कृउबा येथील धान्याचा अडत बाजार अखेर उद्या गुरुवार २१ रोजी सुरु होणार आहे. शेतकऱ्यांकडून अडत वसूल न करण्याचा राज्यशासनाच्या अध्यादेशाचे पालन करण्याचे अडत्यांनी ठरविले आहे. मात्र, खरेदीदाराकडून किती अडत घ्यायची यावर अडत्यांमध्ये मतभेद अजूनही कायम आहे. धान्याची हर्राशी झाल्यावर अडते शेतकऱ्यांकडून ३ टक्के अडत वसूल केली जात असत. मात्र, अन्य राज्यात ही अडत खरेदीदाराकडून वसूल केली जाते. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी राज्यसरकारने अध्यादेश काढून. कृउबा समितीअंतर्गत शेतकऱ्यांनी धान्य,कडधान्य विकल्यास त्यावरील अडत त्यांच्या ऐवजी खरेदीदाराकडून अडत वसूल करावी,असे आदेशात म्हटले होते. मात्र, यास विरोध करीत अन्य बाजार समितीप्रमाणे येथील अडत्यांनी बेमुदत बंद पुकारला होता. बंदला १३ दिवसपूर्ण झाले तरीही सरकार मात्र, आपल्या अध्यादेशावर ठाम होते. यामुळे अखेर अडत्यांना अध्यादेश मान्य करावाच लागला. बुधवारी याबाबत जाधववाडीतील मार्केट यार्डात अडत्यांची बैठक झाली. यात राज्यातील अन्य बाजार समितीमधील अडत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मोबाईलवर मते जाणून घेण्यात आली. खरेदीदाराकडून किती आडत घ्यायची यावर मात्र, अडत्यांमध्ये मतभेद असल्याचे आढळून आले. कोणी ३ टक्के तर कोणी अडीच टक्के अडत घ्यावी असे मत मांडत होते. अडत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. मात्र, यावर सहमती झाली नाही. शेतीमालाची रक्कम २० ऐवजी ९ दिवसात खरेदीदाराने अडत्याला द्यावी, यासंदर्भातही चर्चा सुरु होती. यासंदर्भात औरंगाबाद मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, आता राज्यसरकारच्या अध्यादेशाप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांकडून अडत वसूल करणार नाही. मात्र, खरेदीदाराकडून किती आडत घ्यावी, यासंदर्भात अडते व खरेदीदार यांची बैठकी घेऊन त्यात ठरवू. सचिव दिलीप गांधी यांनी सांगितले की, बेमुदत बंद मागे घेतला असून गुरुवारपासून जाधववाडीतील धान्याचा अडत बाजाराला सुरुवात होणार आहे.