शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

औरंगाबादकरांनी अनुभवली नेपाळ दुर्घटनेची दाहकता

By admin | Updated: April 27, 2015 02:02 IST

नेपाळ व भारताला शनिवारी सकाळी प्रचंड हादरा देणाऱ्या विनाशकारी भूकंपाची दाहकता औरंगाबादेतील जैन समाजबांधवांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली.

अमिताभ श्रीवास्तव, औरंगाबादनेपाळ व भारताला शनिवारी सकाळी प्रचंड हादरा देणाऱ्या विनाशकारी भूकंपाची दाहकता औरंगाबादेतील जैन समाजबांधवांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली. शहरातील ५ जण आणि जामनेर (जि. जळगाव) येथील १ असे एकूण ६ भाविक नेपाळची राजधानी काठमांडूत सुरक्षित आहेत. नेपाळहून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेतील व्यापारी आणि जैन समाजाचे पद्मराज सुराणा, उत्तम सुराणा, जतनराज सुराणा, लालचंद सिपानी व त्यांची पत्नी बिमलादेवी सिपानी व जामनेरचे प्रदीप कुचेरिया तेरापंथी जैनाचार्य महाश्रमणजी मसा यांच्या प्रवचनात सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेले होते. तेथील बालमंदिर शाळेच्या परिसरात हे प्रवचन सुरू आहे. महाराजांचे प्रवचन संपले आणि मंगलपाठानंतर ते सभागृहातून बाहेर निघत असतानाच अचानक जमिनीचा थरकाप झाला आणि क्षणार्धात सर्व मंडप उद्ध्वस्त झाला. तेरापंथी जैन समाजाचे माजी अध्यक्ष असलेल्या पद्मराज सुराणा यांनी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांना सांगितले की, भारतीय प्रमाणवेळेनुसार पावणेबारा वाजेच्या सुमारास महाराज सुरक्षित बाहेर पडले व जबरदस्त भूकंप येऊन मंडप उद्ध्वस्त झाला. महाराज सुरक्षित बाहेर पडले; परंतु मंडप अंगावर पडून काही भाविक किरकोळ जखमी झाले. सुराणा म्हणाले की, औरंगाबादेतील सर्व भाविक आणि जामनेरचे त्यांचे नातेवाईक सुरक्षित आहेत. त्यांना साधे खरचटलेही नाही; परंतु ते म्हणाले, पावणेबारा वाजेपासून सुरू भूकंपाच्या धक्क्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत अधूनमधून हादरे बसत होते. शनिवारच्या प्रवचनासाठी भारतातून योगगुरू रामदेव आणि त्यांचे शिष्य बालकृष्णदेखील प्रवचनस्थळी आले होते. तेदेखील सुरक्षित मंडपातून बाहेर पडले आहेत.