शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांनी अनुभवली नेपाळ दुर्घटनेची दाहकता

By admin | Updated: April 27, 2015 02:02 IST

नेपाळ व भारताला शनिवारी सकाळी प्रचंड हादरा देणाऱ्या विनाशकारी भूकंपाची दाहकता औरंगाबादेतील जैन समाजबांधवांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली.

अमिताभ श्रीवास्तव, औरंगाबादनेपाळ व भारताला शनिवारी सकाळी प्रचंड हादरा देणाऱ्या विनाशकारी भूकंपाची दाहकता औरंगाबादेतील जैन समाजबांधवांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली. शहरातील ५ जण आणि जामनेर (जि. जळगाव) येथील १ असे एकूण ६ भाविक नेपाळची राजधानी काठमांडूत सुरक्षित आहेत. नेपाळहून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेतील व्यापारी आणि जैन समाजाचे पद्मराज सुराणा, उत्तम सुराणा, जतनराज सुराणा, लालचंद सिपानी व त्यांची पत्नी बिमलादेवी सिपानी व जामनेरचे प्रदीप कुचेरिया तेरापंथी जैनाचार्य महाश्रमणजी मसा यांच्या प्रवचनात सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेले होते. तेथील बालमंदिर शाळेच्या परिसरात हे प्रवचन सुरू आहे. महाराजांचे प्रवचन संपले आणि मंगलपाठानंतर ते सभागृहातून बाहेर निघत असतानाच अचानक जमिनीचा थरकाप झाला आणि क्षणार्धात सर्व मंडप उद्ध्वस्त झाला. तेरापंथी जैन समाजाचे माजी अध्यक्ष असलेल्या पद्मराज सुराणा यांनी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांना सांगितले की, भारतीय प्रमाणवेळेनुसार पावणेबारा वाजेच्या सुमारास महाराज सुरक्षित बाहेर पडले व जबरदस्त भूकंप येऊन मंडप उद्ध्वस्त झाला. महाराज सुरक्षित बाहेर पडले; परंतु मंडप अंगावर पडून काही भाविक किरकोळ जखमी झाले. सुराणा म्हणाले की, औरंगाबादेतील सर्व भाविक आणि जामनेरचे त्यांचे नातेवाईक सुरक्षित आहेत. त्यांना साधे खरचटलेही नाही; परंतु ते म्हणाले, पावणेबारा वाजेपासून सुरू भूकंपाच्या धक्क्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत अधूनमधून हादरे बसत होते. शनिवारच्या प्रवचनासाठी भारतातून योगगुरू रामदेव आणि त्यांचे शिष्य बालकृष्णदेखील प्रवचनस्थळी आले होते. तेदेखील सुरक्षित मंडपातून बाहेर पडले आहेत.