शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विद्यापीठातील तलाव, चर तुडुंब

By admin | Updated: July 9, 2016 17:23 IST

शहर परिसरात झालेल्या दमदार पावसाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ परिसरातील तलाव, चर आणि नाले तुडुंब भरले असून ख-या अर्थाने विद्यापीठ ‘जलयुक्त’ झाले आहे

ऑनलाइन लोकमत - 
 
जलयुक्त परिसर: दहा कोटी लिटर पाणी साठवणार
औरंगाबाद, दि. 09 - शहर परिसरात झालेल्या दमदार पावसाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ परिसरातील तलाव, चर आणि नाले तुडुंब भरले असून ख-या अर्थाने विद्यापीठ ‘जलयुक्त’ झाले आहे. 
 
मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने जानेवारी महिन्यापासूनच ‘जलयुक्त विद्यापीठ’ अशी घोषणा देऊन त्या दिशेने काम सुरू केले होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, कार्यकारी अभियंता आर. डी. काळे यांनी पुढाकार घेऊन काम सुरू केले. सुरुवातीला ‘कमवा- शिका’ योजनेतील तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी श्रमदान करून नाले खोलीकरण आणि इतर कामे केली. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यात पाच पोकलेन आणि वीस ट्रॅक्टरच्या सहाय्याने विद्यापीठ परिसरातील नाले खोलीकरण तसेच रुंदीकरणाचे काम करण्यात आले. आवश्यक तेथे बांध घालून पाणी अडविण्याची सोय करण्यात आली. चार बंधा-यांची क्षमता वाढविण्यात आली. विहिरींतील गाळ काढण्यात आला. लेणी परिसर ते गोगाबाबा टेकडीच्या पायथ्यापर्यंत सुमारे दीड किलोमीटर  सहा फूट रुंद आणि पाच फूट खोल चर खोदण्यात आली.  गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या तसेच मंगळवारच्या मुसळधार पावसाने ही चर पूर्णत: भरून गेली आहे. याशिवाय विद्यापीठ परिसरातील चारही बंधारे तुडुंब भरले आहेत. एप्रिल- मे महिन्यात केलेल्या उत्तम कामाचा परिणाम यंदाच्या पावसाळ्यात दिसून आला. नालेही तुडुंब भरले असून बंधाºयावरून पाणी ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. बंधाºयांची क्षमता वाढविल्याने तसेच विहिरीतील गाळ काढल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण झाली आहे. 
 
या कामासाठी विद्यापीठाने आपल्या निधीतून १० लाख रुपये खर्च केले. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी शासनाकडून २५ लाख रुपयांचा निधी दिला. आणखी २५ लाखांचा निधी विद्यापीठाला मिळणार आहे. जलसंधारणाचे काम उत्तम चालत असल्याचे पाहून डॉ. दांगट यांनी दोनवेळा या कामाला भेट दिली. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि कर्मचारी संघटना यांचीही साथ लाभली.