शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या पोलिस कॉन्स्टेबलने सर केले ' एव्हरेस्ट शिखर'

By admin | Updated: May 20, 2016 00:50 IST

रफिक शेख या पोलिस कॉन्स्टेबलने अथक प्रयत्नांनंतर एव्हरेस्ट शिखर सर केले असून अशी कामगिरी करणारा तो मराठवाड्यातले पहिला एव्हरेस्टवीर ठरले.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १८ - माणसाच्या मनात जिद्द असेल तर कितीही अडचणी आल्या तरी त्या पार करून तो आपलं ध्येय गाठतोच, असं म्हणतात. औरंगाबादमधील पोलिस कॉन्स्टेबल रफिक शेखने हे म्हणणे खरे करून दाखवले आहे. जिद्दीच्या जोरावर त्याने जगातील सर्वात उंच असलेले 'एव्हरेस्ट शिखर' सर करून दाखवले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पोलिस कॉन्स्टेबल आहे. 
 
औरंगाबादचा रहिवासी असलेल्या रफिकने लहानपणापासूनच जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर चढाई करायची, असे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू केले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील नायगाव या खेड्यातील शेतकरी कुटूंबात जन्मलेला शेख रफिक हा ग्रामीण पोलिस मुख्यालयात हवालदार म्हणून कार्यरत आहे़. लहानपणापासमन जगातील उंच शिखर माउंट एव्हरेस्ट चढण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते़ घरची परिस्थिती तशी बेताचीच, एव्हरेस्टचा खर्च पेलणार की नाही हे अस्पष्ट असतानाही त्याने जाण्याचा निर्णय घेतला़. मागील दोन वेळा दानशूर व्यक्तींनी मदत केल्यामुळे रफिक या दिशेने झेपावला़ परंतु, दोन्ही वेळेस निसर्गाची अपकृपा झाल्याने त्याला माघारी यावे लागले़. २०१४ व २०१५ साली सर्व क्षमतेने सज्ज असूनही भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे रफीकला माघारी फिरावे लागले होते. पहिल्या वर्षी हिमस्खलन, दुसऱ्या वर्षी विनाशकारी भूकंप, यामुळे एव्हरेस्टच्या दिशेने कूच केलेली असतानाही रफिकला मोहिमेत अपयश आले, मात्र तरीही त्याने जिद्द न सोडता यावर्षी पुन्हा स्वप्नाच्या दिशेने झेप घेतली. आपले गावातील घर विकून एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. ४ एप्रिल रोजी एव्हरेस्ट मोहिमेवर निघालेल्या रफिकने आज, १९ मे रोजी हे शिखर सर करून आपले स्वप्न पूर्ण केलेच. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर रफिकने आज सकाळी एव्हरेस्टला गवसणी घातली. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर रफिकने आज सकाळी एव्हरेस्टला गवसणी घातली. एव्हरेस्ट सर करणारा तो महाराष्ट्र पोलिस दलातला पहिलाच जवान ठरला आहे.  
 

दोन वेळेस हुलकावणी

दोन वर्षांपूर्वी बेस कॅम्पपर्यंत पोहोचलेल्या रफिकच्या चढाईला सुरूवात होते न होते तोच हिमस्खलन झाले त्यात १६ शेरपा मृत्युमुखी पडले. एव्हरेस्ट मोहिमेच्या इतिहासातील ती पहिलीच सर्वात मोठी मनुष्यहानी होती. त्यामुळे नेपाळ सरकारने वर्षभरातील सर्व मोहिमा रद्द केल्या. तेव्हा रफिकलाही माघारी फिरावे लागले. पुढच्या वर्षी पुन्हा जय्यत तयारीनिशी रफिक या मोहिमेवर गेला. मात्र २४ एप्रिल २०१५ ला काठमांडू येथे झालेल्या भूकंपामुळे सागरमाथा हादरला व बेस कँपवर हिमकडा (आईस वॉल) कोसळून झालेल्या अपघातामुळे त्याला पुन्हा परतावे लागले. पहिल्या दोन्ही वेळी कर्ज काढून, वेगवेगळ्या लोकांची मदत घेऊन त्याने मोहीम आखली. पण दोन्ही वेळा प्रत्येकी १५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले

 

घर काढले होते विक्रीला

नैसर्गिक आपत्तींमुळे सलग दोन वर्षे मोहिमेवरून परत यावे लागलेल्या रफिकला जिद्द पूर्ण करण्यासाठी यापूर्वी ३० लाखांची झळ सोसावी लागली होती़. तिस-या वर्षीही एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय कायम होतं. मोहिमेसाठी निधी उभा कसा करायचा म्हणून त्याने नायगाव (ता़ औरंगाबाद) येथील त्याचे घर विकण्याची तयारी केली होती़. दानशूर मंडळींनी तसेच पोलीस प्रशासनाने केलेल्या मदतीमुळे त्याने जिद्द सोडली नव्हती़. अखेर आज त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले.