शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

औरंगाबादच्या पोलिस कॉन्स्टेबलने सर केले ' एव्हरेस्ट शिखर'

By admin | Updated: May 20, 2016 00:50 IST

रफिक शेख या पोलिस कॉन्स्टेबलने अथक प्रयत्नांनंतर एव्हरेस्ट शिखर सर केले असून अशी कामगिरी करणारा तो मराठवाड्यातले पहिला एव्हरेस्टवीर ठरले.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १८ - माणसाच्या मनात जिद्द असेल तर कितीही अडचणी आल्या तरी त्या पार करून तो आपलं ध्येय गाठतोच, असं म्हणतात. औरंगाबादमधील पोलिस कॉन्स्टेबल रफिक शेखने हे म्हणणे खरे करून दाखवले आहे. जिद्दीच्या जोरावर त्याने जगातील सर्वात उंच असलेले 'एव्हरेस्ट शिखर' सर करून दाखवले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पोलिस कॉन्स्टेबल आहे. 
 
औरंगाबादचा रहिवासी असलेल्या रफिकने लहानपणापासूनच जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर चढाई करायची, असे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू केले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील नायगाव या खेड्यातील शेतकरी कुटूंबात जन्मलेला शेख रफिक हा ग्रामीण पोलिस मुख्यालयात हवालदार म्हणून कार्यरत आहे़. लहानपणापासमन जगातील उंच शिखर माउंट एव्हरेस्ट चढण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते़ घरची परिस्थिती तशी बेताचीच, एव्हरेस्टचा खर्च पेलणार की नाही हे अस्पष्ट असतानाही त्याने जाण्याचा निर्णय घेतला़. मागील दोन वेळा दानशूर व्यक्तींनी मदत केल्यामुळे रफिक या दिशेने झेपावला़ परंतु, दोन्ही वेळेस निसर्गाची अपकृपा झाल्याने त्याला माघारी यावे लागले़. २०१४ व २०१५ साली सर्व क्षमतेने सज्ज असूनही भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे रफीकला माघारी फिरावे लागले होते. पहिल्या वर्षी हिमस्खलन, दुसऱ्या वर्षी विनाशकारी भूकंप, यामुळे एव्हरेस्टच्या दिशेने कूच केलेली असतानाही रफिकला मोहिमेत अपयश आले, मात्र तरीही त्याने जिद्द न सोडता यावर्षी पुन्हा स्वप्नाच्या दिशेने झेप घेतली. आपले गावातील घर विकून एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. ४ एप्रिल रोजी एव्हरेस्ट मोहिमेवर निघालेल्या रफिकने आज, १९ मे रोजी हे शिखर सर करून आपले स्वप्न पूर्ण केलेच. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर रफिकने आज सकाळी एव्हरेस्टला गवसणी घातली. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर रफिकने आज सकाळी एव्हरेस्टला गवसणी घातली. एव्हरेस्ट सर करणारा तो महाराष्ट्र पोलिस दलातला पहिलाच जवान ठरला आहे.  
 

दोन वेळेस हुलकावणी

दोन वर्षांपूर्वी बेस कॅम्पपर्यंत पोहोचलेल्या रफिकच्या चढाईला सुरूवात होते न होते तोच हिमस्खलन झाले त्यात १६ शेरपा मृत्युमुखी पडले. एव्हरेस्ट मोहिमेच्या इतिहासातील ती पहिलीच सर्वात मोठी मनुष्यहानी होती. त्यामुळे नेपाळ सरकारने वर्षभरातील सर्व मोहिमा रद्द केल्या. तेव्हा रफिकलाही माघारी फिरावे लागले. पुढच्या वर्षी पुन्हा जय्यत तयारीनिशी रफिक या मोहिमेवर गेला. मात्र २४ एप्रिल २०१५ ला काठमांडू येथे झालेल्या भूकंपामुळे सागरमाथा हादरला व बेस कँपवर हिमकडा (आईस वॉल) कोसळून झालेल्या अपघातामुळे त्याला पुन्हा परतावे लागले. पहिल्या दोन्ही वेळी कर्ज काढून, वेगवेगळ्या लोकांची मदत घेऊन त्याने मोहीम आखली. पण दोन्ही वेळा प्रत्येकी १५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले

 

घर काढले होते विक्रीला

नैसर्गिक आपत्तींमुळे सलग दोन वर्षे मोहिमेवरून परत यावे लागलेल्या रफिकला जिद्द पूर्ण करण्यासाठी यापूर्वी ३० लाखांची झळ सोसावी लागली होती़. तिस-या वर्षीही एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय कायम होतं. मोहिमेसाठी निधी उभा कसा करायचा म्हणून त्याने नायगाव (ता़ औरंगाबाद) येथील त्याचे घर विकण्याची तयारी केली होती़. दानशूर मंडळींनी तसेच पोलीस प्रशासनाने केलेल्या मदतीमुळे त्याने जिद्द सोडली नव्हती़. अखेर आज त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले.