शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

औरंगाबाद : कॅरीबॅगच्या कारवाईस व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 20:31 IST

मागील सहा महिन्यांपासून शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या घनकचरा विभागाकडून दररोज वेगवेगळ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक

मनपाकडून पोलीसात तक्रार : अंगुरीबाग येथे कारवाई दरम्यान तणाव

औरंगाबाद : मागील सहा महिन्यांपासून शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या घनकचरा विभागाकडून दररोज वेगवेगळ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी महापालिकेचे पथक अंगुरीबाग येथे पोहोचल्यावर परिसरातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला. २०० पेक्षा अधिक नागरिक-व्यापाऱ्यांच्या जमावाने मनपा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून मनपातर्फे रात्री सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.शासनाने पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. या पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. शहरातील विविध नाल्यांमध्येही कमी जाडीच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळत नाही. डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी शहरात कॅरीबॅगमुक्तीसाठी जोरदार मोहिम सुरू केली. शहरात कॅरीबॅग विकणाऱ्या आणि वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा असे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. मागील सहा ते सात महिन्यांपासून मनपाच्या घनकचरा विभागातर्फे ही कारवाई सुरू आहे.मंगळवारी सायंकाळी मनपाचे पथक अंगुरीबाग येथील कॅरीबॅग विकणाऱ्या दुकानदारांची झाडाझडती सुरू केली. यावेळी अचानक व्यापारी एकत्र झाले. त्यांनी मनपाच्या पथकाला पिटाळून लावले. यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळही करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे मनपाने कारवाईला तुर्त पुर्णविराम दिला. नंतर घनकचरा विभाग प्रमुख शिवाजी झनझन यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.