शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

औरंगाबाद : कॅरीबॅगच्या कारवाईस व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 20:31 IST

मागील सहा महिन्यांपासून शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या घनकचरा विभागाकडून दररोज वेगवेगळ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक

मनपाकडून पोलीसात तक्रार : अंगुरीबाग येथे कारवाई दरम्यान तणाव

औरंगाबाद : मागील सहा महिन्यांपासून शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या घनकचरा विभागाकडून दररोज वेगवेगळ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी महापालिकेचे पथक अंगुरीबाग येथे पोहोचल्यावर परिसरातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला. २०० पेक्षा अधिक नागरिक-व्यापाऱ्यांच्या जमावाने मनपा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून मनपातर्फे रात्री सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.शासनाने पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. या पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. शहरातील विविध नाल्यांमध्येही कमी जाडीच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळत नाही. डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी शहरात कॅरीबॅगमुक्तीसाठी जोरदार मोहिम सुरू केली. शहरात कॅरीबॅग विकणाऱ्या आणि वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा असे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. मागील सहा ते सात महिन्यांपासून मनपाच्या घनकचरा विभागातर्फे ही कारवाई सुरू आहे.मंगळवारी सायंकाळी मनपाचे पथक अंगुरीबाग येथील कॅरीबॅग विकणाऱ्या दुकानदारांची झाडाझडती सुरू केली. यावेळी अचानक व्यापारी एकत्र झाले. त्यांनी मनपाच्या पथकाला पिटाळून लावले. यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळही करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे मनपाने कारवाईला तुर्त पुर्णविराम दिला. नंतर घनकचरा विभाग प्रमुख शिवाजी झनझन यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.