शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपावर २६१ कोटींचा बोजा

By admin | Updated: September 2, 2016 19:31 IST

सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढणाºया कंपनीला वर्क ऑर्डर देण्याशिवाय मनपाकडे आता कोणताच पर्याय उरलेला नाही

- ऑनलाइन लोकमत
एलईडी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात महापालिकेची पुर्नविलोकन याचिका खारीज
औरंगाबाद, दि. 2 - शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब लावण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. महापालिकेची पुर्नविलोकन याचिका शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावली. या ऐतिहासीक तथा धक्कादायक निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर तब्बल २६१ कोटींचा बोजा पडणार हे निश्चित. सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढणाºया कंपनीला वर्क ऑर्डर देण्याशिवाय मनपाकडे आता कोणताच पर्याय उरलेला नाही. 
 
मागील सहा महिन्यांपासून मनपावर एलईडी दिव्यांचे संकट घोंघावत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केला. चार वर्षांपूर्वी मनपाने शहरातील सर्व ४० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे बसविण्यासाठी निविदा मागविली. निविदा प्रक्रियेचा वाद औरंगाबाद खंडपीठात पोहोचला. न्यायालयाने मनपाच्या बाजूने निर्णय दिला. कंत्राटदाराने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मागील काही दिवसांपासून मनपाचे अधिकारी दिल्लीच्या वाºया करीत होते. शेवटी शुक्रवारी पुन्हा मनपाचा या प्रकरणात दारूण पराभव झाला.
 
न्यायालयाने मनपाला बजावले की, कंत्राटदाराला त्वरीत वर्क आॅर्डर द्यावी. जाहिरात फलकाचे हक्क काढून घ्यावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मनपातील अधिकाºयांनी वर्क आॅर्डरही तयार केली असून, फक्त कंत्रादाराला ती देण्याची औपचारिकता बाकी आहे. 
 
असा पडणार मनपावर बोजा 
मनपाने ४ वर्षांपूर्वी ११२ कोटींची निविदा काढली. यामध्ये ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. हा ठेका इलेक्ट्रॉन लाईटिंग सिस्टम प्रा. लि. तथा पेरॉगॉन केबल इंडिया (जॉर्इंट व्हेंचर) या कंपनीला मिळाला. कंपनीने ९६ महिन्यांमध्ये ८६ कोटी रुपये खर्च करून ४० हजार पथदिवे लावावेत असे ठरले. यामध्ये खराब जंग्शन बॉक्स, पायाभूत सोयी-सुविधा तयार करण्यासाठी २५ कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. एकूण ११२ कोटी रुपये मनपा अदा करेल. दरमहिन्याला मनपाने कंपनीला २ कोटी ७२ लाख रुपये देण्याचेही निविदा प्रक्रियेत म्हटले होते. कंत्राटदाराने आठ वर्षे प्रत्येक पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती करावी. यासाठी प्रत्येक पथदिव्यामागे मनपा ९५ रुपये देईल, असेही निविदेत म्हटले आहे. ४० हजार पथदिव्यांसाठी दरवर्षी मनपाला वेगळी रक्कम द्यावी लागले. एकूण मनपावर २६१ कोटींचा बोजा या निमित्ताने पडणार आहे. 
 
केंद्रेकर यांचा विरोध
११२ कोटी रुपयांची निविदा केंद्रेकर यांनी चक्क ३८ कोटींवर आणली होती. मनपाने जेव्हा निविदा काढली होती, तेव्हा बाजारात एका एलईडी दिव्याची किंमत ४०० ते ५०० रुपये होती. जानेवारी २०१६ मध्ये हेच दर चक्क १५० ते २०० रुपयांपर्यंत आले. मनपाचा या निविदेमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी निविदेची चिरफाड करीत ठेका ३८ कोटींवर आणला होता. कायदेशीर बाबींमध्ये ही पद्धत तग धरू शकली नाही.