शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

बारावीच्या फेरपरीक्षेत औरंगाबाद विभाग राज्यात अव्वल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:53 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेर परीक्षेत औरंगाबाद विभागीय मंडळाने राज्यात अव्वल राहण्याची यंदा हॅटट्रीक साधली आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद विभागीय मंडळांचा निकाल यंदा ३७ टक्के लागला विभागीय मंडळाने ११ ते २८ जुलै या कालावधीत ही परीक्षा घेतली होती.  मुलींचे उत्तिर्णतेचे प्रमाण १०.६३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

औरंगाबाद, दि. २१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेर परीक्षेत औरंगाबाद विभागीय मंडळाने राज्यात अव्वल राहण्याची यंदा हॅटट्रीक साधली आहे. औरंगाबाद विभागीय मंडळांचा निकाल यंदा ३७ टक्के लागला असून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आज सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आला. विभागीय मंडळाने ११ ते २८ जुलै या कालावधीत ही परीक्षा घेतली होती. 

औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमधून ७ हजार १३८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याही परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तिर्णतेचे प्रमाण १०.६३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मुलांचे उत्तिर्णतेचे प्रमाण ३४.७६ टक्के, तर मुलींचे हे प्रमाण ४५.०९ टक्के एवढे आहे. या परीक्षेत उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपासून गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना २२ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येतील. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत हवी आहे, त्यांना निकालानंतर मंडळाकडे विहित नमुन्यात २२ आॅगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येईल.

बारावीच्या मुख्य परीक्षेचा निकाल यंदा ३० मे रोजी जाहीर झाला होता. बारावी बोर्ड परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नये म्हणून त्यांना सप्टेंबर- आॅक्टोबरऐवजी जुलैमध्येच उत्तीर्ण होण्याची संधी देण्याचा निर्णय मागील दोन वर्षांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला होता. यंदा जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेसाठी ७ हजार १३८ विद्यार्थी प्रवीष्ट झाले होते. यामध्ये विज्ञान शाखेचे १ हजार ३६२, वाणिज्य शाखेचे ६०२, कला शाखेचे ४ हजार ७०२ आणि एचएससी व्होकेशनलचे ४७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

विभागाचा निकालाचा गोषवारा

जिल्हा           प्रवीष्ठ विद्यार्थी     उत्तिर्ण विद्यार्थी     टक्केवारीऔरंगाबाद    ३००५                          ९७२                ३२.३५बीड                १३०५                           ५७३              ४३.९१परभणी          ७१८                            २६४               ३६.७७जालना          १४९८                           ६०७              ४०.५२हिंगोली          ६१२                             २२५              ३६.७६