शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या फेरपरीक्षेत औरंगाबाद विभाग राज्यात अव्वल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:53 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेर परीक्षेत औरंगाबाद विभागीय मंडळाने राज्यात अव्वल राहण्याची यंदा हॅटट्रीक साधली आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद विभागीय मंडळांचा निकाल यंदा ३७ टक्के लागला विभागीय मंडळाने ११ ते २८ जुलै या कालावधीत ही परीक्षा घेतली होती.  मुलींचे उत्तिर्णतेचे प्रमाण १०.६३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

औरंगाबाद, दि. २१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेर परीक्षेत औरंगाबाद विभागीय मंडळाने राज्यात अव्वल राहण्याची यंदा हॅटट्रीक साधली आहे. औरंगाबाद विभागीय मंडळांचा निकाल यंदा ३७ टक्के लागला असून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आज सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आला. विभागीय मंडळाने ११ ते २८ जुलै या कालावधीत ही परीक्षा घेतली होती. 

औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमधून ७ हजार १३८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याही परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तिर्णतेचे प्रमाण १०.६३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मुलांचे उत्तिर्णतेचे प्रमाण ३४.७६ टक्के, तर मुलींचे हे प्रमाण ४५.०९ टक्के एवढे आहे. या परीक्षेत उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपासून गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना २२ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येतील. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत हवी आहे, त्यांना निकालानंतर मंडळाकडे विहित नमुन्यात २२ आॅगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येईल.

बारावीच्या मुख्य परीक्षेचा निकाल यंदा ३० मे रोजी जाहीर झाला होता. बारावी बोर्ड परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नये म्हणून त्यांना सप्टेंबर- आॅक्टोबरऐवजी जुलैमध्येच उत्तीर्ण होण्याची संधी देण्याचा निर्णय मागील दोन वर्षांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला होता. यंदा जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेसाठी ७ हजार १३८ विद्यार्थी प्रवीष्ट झाले होते. यामध्ये विज्ञान शाखेचे १ हजार ३६२, वाणिज्य शाखेचे ६०२, कला शाखेचे ४ हजार ७०२ आणि एचएससी व्होकेशनलचे ४७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

विभागाचा निकालाचा गोषवारा

जिल्हा           प्रवीष्ठ विद्यार्थी     उत्तिर्ण विद्यार्थी     टक्केवारीऔरंगाबाद    ३००५                          ९७२                ३२.३५बीड                १३०५                           ५७३              ४३.९१परभणी          ७१८                            २६४               ३६.७७जालना          १४९८                           ६०७              ४०.५२हिंगोली          ६१२                             २२५              ३६.७६