शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

औरंगाबाद बायपासचा तिढा सुटला

By admin | Updated: July 20, 2015 00:48 IST

साडेचारशे किलोमीटर लांबीच्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या औरंगाबाद बायपाससाठी ‘वाल्मी’ने आपली ७.६ हेक्टर जमीन देण्यास मान्यता दर्शविल्याने

औरंगाबाद : साडेचारशे किलोमीटर लांबीच्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या औरंगाबाद बायपाससाठी ‘वाल्मी’ने आपली ७.६ हेक्टर जमीन देण्यास मान्यता दर्शविल्याने बायपासचा तिढा सुटला आहे. औरंगाबादला वळसा घेऊन जाणारा बायपास ५२.५० कि.मी.चा असणार आहे. त्यासाठी २०० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. मार्च २०१६ पर्यंत महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. महामार्गासाठी ‘वॉटर अ‍ॅण्ड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट’ची (वाल्मी) ९.६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार होती. महामार्ग ‘वाल्मी’ परिसरातून जाणार असल्याने संस्था दोन भागांत विभागली जाणार होती तसेच काही निवासस्थाने व ५० लहान-मोठी बांधकामे, अशी १६६ बांधकामे पाडावी लागणार होती. त्यामुळे ‘वाल्मी’ने जागा देण्यास विरोध केला होता. त्यामुळे तीन वर्षे महामार्गाचे काम रखडले. अखेर २६ जुनला विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होऊन ‘वाल्मी’ने ७.६ हेक्टर जमीन सोडण्यास मान्यता दिली. बायपासचे तीन भाग करण्यात आले. औरंगाबाद बायपास- निपाणी ते माळीवाडा हा ३४.२०० कि.मी.चा असणार आहे. दौलताबाद बायपास- माळीवाडा ते कसाबखेडापर्यंत १० कि.मी.चा व वेरूळ बायपास- कसाबखेडा ते वेरूळ हा ७.८०० कि.मी.चा असणार आहे. (प्रतिनिधी)