शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

औरंगाबाद ते अजिंठा हा रस्ता द्विपदरीच!

By admin | Updated: April 20, 2017 05:22 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या प्लॅनमधील बहुतांश रस्ते दोन ते तीन पदरी करण्यात येणार आहेत

विकास राऊत , औरंगाबाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या प्लॅनमधील बहुतांश रस्ते दोन ते तीन पदरी करण्यात येणार आहेत. महत्त्वाच्या अशा औरंगाबाद ते अजिंठ्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाऐवजी द्विपदरीकरण करण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ते काम वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.चीनचे उपराष्ट्रपती २०१५मध्ये अजिंठा लेण्यांना भेटीसाठी आले असता औरंगाबाद ते अजिंठा या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी आणि खड्ड्यांमुळे त्यांनी बांधकाम विभागाचे वाभाडे काढले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर विभागाची बदनामी झाल्यावर तत्कालीन अतिरिक्त सचिव आनंद कुलकर्णी यांनी १० नोव्हेंबर २०१५ रोजी त्या रस्त्याची जळगावपर्यंत पाहणी करून लागलीच २५ कोटींच्या डागडुजीची घोषणा केली. डिसेंबर २०१५मध्ये ते काम सुरू झाले; पण अजून ते पूर्ण झालेले नाही.यादरम्यान नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबर २०१५ रोजी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या पॅकेजमध्ये औरंगाबाद ते सिल्लोडमार्गे अजिंठा ते पहूरमार्गे जामनेर ते बोधवड मुक्ताईनगर ते पिंप्रीमार्गे बऱ्हाणपूर ते इंदौर या रस्त्यासाठी ४ हजार १० कोटी रुपयांची तरतूद असल्याचे समोर आले. दीड वर्षात या ४०१ कि़मी. रस्त्याचे दोन टप्प्यांत वर्गीकरण करून अर्धे काम बांधकाम विभागाकडे आणि अर्धे काम रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग केले. मुळात हा नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आणि आता तो द्विपदरी करण्यावर भर देण्यात आला आहे. चौपदरी रस्ता करण्यासाठी १४ मीटर रुंदी लागते. आता होऊ घातलेले रस्ते १० मीटरमध्ये तीन किंवा द्विपदरी असतील. हा नवीन फंडा शोधून काढण्यात आला आहे. या रस्त्यांची कामे झाली तरी ते अपघाताला आमंत्रण देणारेच असतील. टेेंडर एका संस्थेने आणि डीपीआर एका संस्थेने तयार केल्याने या कामांचे काय होणार हे सांगणे अवघड असल्याचे पीडब्ल्यूडीच्या सेवानिवृत्त अधीक्षक अभियंत्यांनी लोकमतला सांगितले.६ लाख पर्यटक अजिंठ्याला भेट देतात जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे औरंगाबादमार्गे दरवर्षी अंदाजे ६ लाख पर्यटक भेट देतात.सार्वजनिक वाहतूक व खासगी वाहनांसह अजिंठा लेणीपर्यंत रोज किमान १० हजार वाहने या रस्त्यावर असणे शक्य आहे. परंतु बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीने केलेल्या पाहणीनुसार १० हजार वाहनांपेक्षा कमी वाहतूक असल्याने हा रस्ता चौपदरीऐवजी द्विपदरी करण्याचा निर्णय झाला आहे. दोन तासांत औरंगाबादपासून अजिंठ्यापर्यंतचे ९० कि़मी.चे अंतर पार करण्यासाठी रस्ता चौपदरी होणे आवश्यक आहे.वेरूळ-अजिंठा लेण्यांमुळे जळगाव रोडचे चौपदरी होणे गरजेचे होते. याशिवाय वैजापूर, शिर्डी तसेच मंठा, जिंतूर, वाटूर फाट्यापर्यंतचा रस्ता चौपदरी होणे आवश्यक आहे. हे रस्ते झाले तरी मराठवाड्याच्या पर्यटन आणि इतर दळणवळणाला थोडा लाभ होईल.