शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

औरंगाबाद ते अजिंठा हा रस्ता द्विपदरीच!

By admin | Updated: April 20, 2017 05:22 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या प्लॅनमधील बहुतांश रस्ते दोन ते तीन पदरी करण्यात येणार आहेत

विकास राऊत , औरंगाबाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या प्लॅनमधील बहुतांश रस्ते दोन ते तीन पदरी करण्यात येणार आहेत. महत्त्वाच्या अशा औरंगाबाद ते अजिंठ्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाऐवजी द्विपदरीकरण करण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ते काम वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.चीनचे उपराष्ट्रपती २०१५मध्ये अजिंठा लेण्यांना भेटीसाठी आले असता औरंगाबाद ते अजिंठा या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी आणि खड्ड्यांमुळे त्यांनी बांधकाम विभागाचे वाभाडे काढले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर विभागाची बदनामी झाल्यावर तत्कालीन अतिरिक्त सचिव आनंद कुलकर्णी यांनी १० नोव्हेंबर २०१५ रोजी त्या रस्त्याची जळगावपर्यंत पाहणी करून लागलीच २५ कोटींच्या डागडुजीची घोषणा केली. डिसेंबर २०१५मध्ये ते काम सुरू झाले; पण अजून ते पूर्ण झालेले नाही.यादरम्यान नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबर २०१५ रोजी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या पॅकेजमध्ये औरंगाबाद ते सिल्लोडमार्गे अजिंठा ते पहूरमार्गे जामनेर ते बोधवड मुक्ताईनगर ते पिंप्रीमार्गे बऱ्हाणपूर ते इंदौर या रस्त्यासाठी ४ हजार १० कोटी रुपयांची तरतूद असल्याचे समोर आले. दीड वर्षात या ४०१ कि़मी. रस्त्याचे दोन टप्प्यांत वर्गीकरण करून अर्धे काम बांधकाम विभागाकडे आणि अर्धे काम रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग केले. मुळात हा नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आणि आता तो द्विपदरी करण्यावर भर देण्यात आला आहे. चौपदरी रस्ता करण्यासाठी १४ मीटर रुंदी लागते. आता होऊ घातलेले रस्ते १० मीटरमध्ये तीन किंवा द्विपदरी असतील. हा नवीन फंडा शोधून काढण्यात आला आहे. या रस्त्यांची कामे झाली तरी ते अपघाताला आमंत्रण देणारेच असतील. टेेंडर एका संस्थेने आणि डीपीआर एका संस्थेने तयार केल्याने या कामांचे काय होणार हे सांगणे अवघड असल्याचे पीडब्ल्यूडीच्या सेवानिवृत्त अधीक्षक अभियंत्यांनी लोकमतला सांगितले.६ लाख पर्यटक अजिंठ्याला भेट देतात जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे औरंगाबादमार्गे दरवर्षी अंदाजे ६ लाख पर्यटक भेट देतात.सार्वजनिक वाहतूक व खासगी वाहनांसह अजिंठा लेणीपर्यंत रोज किमान १० हजार वाहने या रस्त्यावर असणे शक्य आहे. परंतु बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीने केलेल्या पाहणीनुसार १० हजार वाहनांपेक्षा कमी वाहतूक असल्याने हा रस्ता चौपदरीऐवजी द्विपदरी करण्याचा निर्णय झाला आहे. दोन तासांत औरंगाबादपासून अजिंठ्यापर्यंतचे ९० कि़मी.चे अंतर पार करण्यासाठी रस्ता चौपदरी होणे आवश्यक आहे.वेरूळ-अजिंठा लेण्यांमुळे जळगाव रोडचे चौपदरी होणे गरजेचे होते. याशिवाय वैजापूर, शिर्डी तसेच मंठा, जिंतूर, वाटूर फाट्यापर्यंतचा रस्ता चौपदरी होणे आवश्यक आहे. हे रस्ते झाले तरी मराठवाड्याच्या पर्यटन आणि इतर दळणवळणाला थोडा लाभ होईल.