शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाजांच्या संपत्तीचा लिलाव

By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST

घोटाळेबाजांकडून गिळंकृत करण्यात आलेली पीडित गुंतवणूकदारांची रक्कम त्यांना लवकरात लवकर परत मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो पीडित गुंतवणूकदारांच्या

गुंतवणूकदारांना दिलासा - मुख्यमंत्र्यांचे निर्देशनरेश डोंगरे - नागपूरघोटाळेबाजांकडून गिळंकृत करण्यात आलेली पीडित गुंतवणूकदारांची रक्कम त्यांना लवकरात लवकर परत मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो पीडित गुंतवणूकदारांच्या जिव्हाळ्याचा हा विषय सोमवारी रामगिरीवर चर्चेला घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित वरिष्ठांना दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. अलीकडे राज्यात आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. वर्षभराच्या कालावधीत नागपुरात सुमारे दोन हजार कोटींच्या घोटाळ्यांची पाच प्रकरणे उघड झाली. जयंत झामरे, समीर जोशी, राजेश जोशी, प्रशांत वासनकर आणि अमोल ढाकें हे त्यातील आरोपी आहेत. तत्पूर्वी प्रमोद अग्रवाल आणि हरिभाऊ मंचलवारही गाजले. १०० कोटींपासून तो हजार कोटी रुपयांपर्यंतच्या फसवणुकीची ही प्रकरणे आहेत. या सर्व घोटाळेबाजांची फसवणूक करण्याची पद्धत एकसारखीच आहे. आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून दलालामार्फत ठेवीदारांची रक्कम घ्यायची. त्यांना पोस्टडेड चेक, प्रॉमिसरी नोट द्यायची आणि विशिष्ट कालावधीनंतर गाशा गुंडाळायचा. उपरोक्त सर्वांनी नागपुरात वेगवेगळ्या कंपन्या थाटून अशा पद्धतीने हजारो ठेवीदारांना गंडा घातला आहे. रक्कम परत मिळत नसल्यामुळे पीडित ठेवीदार पोलिसांकडे तक्रार दाखल करतात. पोलीस गुन्हे दाखल करून आरोपींनाअटक करतात. प्रकरण कोर्टात जाते. तारखा सुरू होतात अन् ठेवीदारांच्या वाट्याला प्रचंड मनस्ताप येतो. त्याची रक्कम परत मिळण्याची आशा दिवसागणिक लुप्त होते. मानसिक धक्क्यामुळे काही गुंतवणूकदारांचा मृत्यू होतो. अनेकांची अवस्था वेड्यागत होते. हे सर्व लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी ठगबाजांना चाप बसवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. गुंतवणूकदारांचे हितआज मुख्यमंत्र्यांनी रामगिरीवर वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत घोटाळेबाजांची जप्त केलेली संपत्ती तातडीने लिलाव करून त्यातून आलेली रक्कम पीडित गुंतवणूकदारांना तातडीने कशी परत करता येईल, त्याबाबत चर्चा करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा तातडीने लिलाव करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी यांना देण्याचे ठरले. या अधिकाऱ्यांना दुसऱ्या कोणत्याच कामात न गुंतवता, केवळ जप्त संपत्तीच्या लिलावाच्या प्रक्रियेचीच जबाबदारी सोपवावी, असाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे हजारो गुंतवणूकदारांना तातडीने न्याय मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.(प्रतिनिधी)