शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आचऱ्याच्या ऐतिहासिक गावपळणीकडे लक्ष

By admin | Updated: November 18, 2014 23:23 IST

गावपळण हीदेखील तीन वर्षांनी पाळली जाणारी अशीच एक आगळीवेगळी गूढरम्य प्रथा.

आचरा : मालवण तालुक्यातील संस्थानी थाटाच्या इनामदार श्री देव रामेश्वराला इनाम मिळालेल्या आचरा गावामध्ये आजही विविध प्रथा, परंपरा, रूढी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजऱ्या केल्या जातात. गावपळण हीदेखील तीन वर्षांनी पाळली जाणारी अशीच एक आगळीवेगळी गूढरम्य प्रथा. सन २०१२ मध्ये झालेल्या गावपळणीनंतर यावर्षी गावपळणीचे वर्ष असल्याने इनामदार श्री देव रामेश्वराचा यावर्षी कौल (हुकूम) झाल्यास ही गावपळण होण्याची शक्यता आहे. तीन वर्षांनी देवदिवाळीच्या दिवशी गावपळण होणार की नाही, असा कौल रामेश्वर संस्थानच्या गावकऱ्यांकडून घेतला जाणार असल्याने त्या दिवसाकडे आचरावासीयांची नजर लागून राहिली आहे.गावपळण का साजरी केली जाते याविषयी अनेक तर्कवितर्क किंवा कथाकल्पना असल्या तरी आधुनिक काळातदेखील आचरावासीय इनामदार श्री देव रामेश्वराचा झालेला हा आदेश शिरसावद्य मानून तितक्याच श्रद्धेने आपल्याला दैनंदिन कामकाजाच्या व्यापातून मिळणाऱ्या हक्काच्या सुट्टीचा आनंद अत्यंत मनमुरादपणे लुटतात. गावपळण म्हणजे तीन दिवस तीन रात्र गावामध्ये कोणीही वास्तव्य करून राहू नये. चूल आणि मूल असा संसाराचा रामरगाडा हाकणारी घरातील स्त्रीदेखील आपल्याला यानिमित्ताने मिळणारा चेंज अनुभवायला उत्सुक झालेली असते. गावाच्या वेशीबाहेर आपला राहता राजमहाल सोडून तंबू, झोपड्यांमधून मोकळ््या आसमंताखाली सहजीवनाचा मिळणारा आनंद आचरावासीय अत्यंत हौसेने लुटतात. गावाचा एकोपा वाढायला गावपळणीसारखी प्रथा निश्चितच लाखमोलाची ठरते. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात थोड्या कालावधीकरिता मिळणारे तणावरहित जीवन आचरेवासीयांच्या मनाला निश्चितच उभारी देणारे ठरते. वैज्ञानिक बाजूने विचार करता आचरा गावचे वातावरण या तीन दिवसांच्या कालावधीत पूर्णत: शुद्ध होऊन जाते. अनादीकाळामध्ये दूरदर्शी ठेवून आखलेली गावपळणसारखी प्रथा निश्चितच अनुकरणीय असून आचरावासीयांच्या कौतुकाचा विषय आहे. (वार्ताहर)आचरा येथे गावपळण या धार्मिक कार्यक्रमामध्ये ग्रामस्थ नदीकाठी तीन दिवस वास्तव्य करून राहतात.