शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

लोकाभिमुख पोलीस दलासाठी प्रयत्न

By admin | Updated: June 14, 2016 03:07 IST

पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. पोलीस मित्र अ‍ॅपद्वारे दोन लाख नागरिकांशी पोलीस दल जोडले गेले

पुणे : पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. पोलीस मित्र अ‍ॅपद्वारे दोन लाख नागरिकांशी पोलीस दल जोडले गेले आहे. दीड लाख पोलिसांना त्यांची मोठी मदत मिळत असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.प्रवीण दीक्षित यांनी सोमवारी पुणे येथील ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. ते म्हणाले, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर सारख्या दुर्गम भागातील नागरिकही पोलिसांच्या कामात सहभाग घेत आहेत. केवळ पुरुषच नाही, तर महिलाही पोलिसांना गस्त घालण्यामध्ये मदत करीत आहेत. विशेषत: मुंब्रा, भिवंडीसारख्या शहरांमध्येही महिलांचा मिळणारा सहभाग विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला सुरक्षेसाठी प्रतिसाद अ‍ॅप सुरू करण्यात आले असून, त्याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करताना त्यांनी ग्रामीण भागामधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. पोलिसांची गस्त आगामी काळात वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘आरएफआयडी’ या यंत्रणेचा वापर गस्तीसाठी करण्यात येत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक शहरामधील संवेदनशील ठिकाणे, विशेष व्यक्तींची निवासस्थाने, बॅँका, एटीएम सेंटर्स, मॉल्स, महत्त्वाची ठिकाणे अशा ठिकाणांचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ काढून तेथे एक मशिन बसवले आहे. या मशिनमध्ये एक रेडिओ फ्रिक्वेन्सी चीप बसवण्यात आली आहे. गस्तीवरील पोलीस गस्ती पॉइंट्सवर गेल्यावर तेथे बायोमॅट्रिक पद्धतीने पंच केला जातो. त्यामुळे नियंत्रण कक्षाला कोणता पोलीस किती वाजता कुठे गस्त घालून गेला, याचा तपशील मिळतो. (प्रतिनिधी)‘व्हायरल’ झालेले छायाचित्र खरे नाहीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे गप्पा मारत बसलेले असताना काही अंतरावर पोलीस महासंचालक उभे असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर होते. हे छायाचित्र बनावट असल्याचे प्रवीण दीक्षित यांनी स्पष्ट केले. गणवेशावर तलवार लावलेली असेल, तर आम्ही कोणत्याही खोलीत जात नाहीत. परेड असेल तेव्हाच तलवार लावली जाते. त्यामुळे हे छायाचित्र बनावट असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.गुन्ह्यांचे प्रमाण घटलेराज्यातील गुन्ह्यांचा आलेख खाली आला असून, सोनसाखळी चोरी, जबरी चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये ४३ टक्क्यांनी घट झाली असून, खुनाचे गुन्हेही घटले आहेत. लोकांनी पुढे येऊन काम केल्यास ‘कोअर पोलिसींग’चा समाजाला फायदा होईल. शासनानेच सर्व गोष्टी कराव्यात, या मानसिकतेमधून बाहेर येण्याची गरज असून, लोकांनी सुरक्षेबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे.राज्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. एकूण मर्यादेच्या ३० टक्केही रस्ते वाहनांसाठी मोकळे नसतात. रस्ते तसेच पदपथांवरची अतिक्रमणे दूर करण्याची, तसेच रस्त्यांची रुंदी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे दीक्षित म्हणाले.सीसीटीव्हींचा अधिकाधिक वापर हा गुन्हे उघडकीस आणण्यासाठी उपयोगाचा ठरत आहे. मुंबई रेल्वेकडे दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण ८५ टक्के आहे. त्यांनी रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्हींचा पुरावा म्हणून वापर करायला सुरुवात केल्याने जाबजबाब लवकर पूर्ण होतात. महिला तक्रारदारांना पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात यावे लागत नाही. महिलांबाबतच्या गुन्ह्यांच्याबाबतीत शक्य असेल तेथे २४ तासांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सिंधुदुर्ग, सोलापूर, गडचिरोली, यवतमाळ अशा ग्रामीण भागांतही लवकर आरोपपत्र गेल्याने आरोपींना तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षा झाल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर ‘सुमोटो’ कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.