शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

लोकाभिमुख पोलीस दलासाठी प्रयत्न

By admin | Updated: June 14, 2016 03:07 IST

पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. पोलीस मित्र अ‍ॅपद्वारे दोन लाख नागरिकांशी पोलीस दल जोडले गेले

पुणे : पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. पोलीस मित्र अ‍ॅपद्वारे दोन लाख नागरिकांशी पोलीस दल जोडले गेले आहे. दीड लाख पोलिसांना त्यांची मोठी मदत मिळत असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.प्रवीण दीक्षित यांनी सोमवारी पुणे येथील ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. ते म्हणाले, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर सारख्या दुर्गम भागातील नागरिकही पोलिसांच्या कामात सहभाग घेत आहेत. केवळ पुरुषच नाही, तर महिलाही पोलिसांना गस्त घालण्यामध्ये मदत करीत आहेत. विशेषत: मुंब्रा, भिवंडीसारख्या शहरांमध्येही महिलांचा मिळणारा सहभाग विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला सुरक्षेसाठी प्रतिसाद अ‍ॅप सुरू करण्यात आले असून, त्याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करताना त्यांनी ग्रामीण भागामधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. पोलिसांची गस्त आगामी काळात वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘आरएफआयडी’ या यंत्रणेचा वापर गस्तीसाठी करण्यात येत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक शहरामधील संवेदनशील ठिकाणे, विशेष व्यक्तींची निवासस्थाने, बॅँका, एटीएम सेंटर्स, मॉल्स, महत्त्वाची ठिकाणे अशा ठिकाणांचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ काढून तेथे एक मशिन बसवले आहे. या मशिनमध्ये एक रेडिओ फ्रिक्वेन्सी चीप बसवण्यात आली आहे. गस्तीवरील पोलीस गस्ती पॉइंट्सवर गेल्यावर तेथे बायोमॅट्रिक पद्धतीने पंच केला जातो. त्यामुळे नियंत्रण कक्षाला कोणता पोलीस किती वाजता कुठे गस्त घालून गेला, याचा तपशील मिळतो. (प्रतिनिधी)‘व्हायरल’ झालेले छायाचित्र खरे नाहीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे गप्पा मारत बसलेले असताना काही अंतरावर पोलीस महासंचालक उभे असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर होते. हे छायाचित्र बनावट असल्याचे प्रवीण दीक्षित यांनी स्पष्ट केले. गणवेशावर तलवार लावलेली असेल, तर आम्ही कोणत्याही खोलीत जात नाहीत. परेड असेल तेव्हाच तलवार लावली जाते. त्यामुळे हे छायाचित्र बनावट असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.गुन्ह्यांचे प्रमाण घटलेराज्यातील गुन्ह्यांचा आलेख खाली आला असून, सोनसाखळी चोरी, जबरी चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये ४३ टक्क्यांनी घट झाली असून, खुनाचे गुन्हेही घटले आहेत. लोकांनी पुढे येऊन काम केल्यास ‘कोअर पोलिसींग’चा समाजाला फायदा होईल. शासनानेच सर्व गोष्टी कराव्यात, या मानसिकतेमधून बाहेर येण्याची गरज असून, लोकांनी सुरक्षेबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे.राज्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. एकूण मर्यादेच्या ३० टक्केही रस्ते वाहनांसाठी मोकळे नसतात. रस्ते तसेच पदपथांवरची अतिक्रमणे दूर करण्याची, तसेच रस्त्यांची रुंदी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे दीक्षित म्हणाले.सीसीटीव्हींचा अधिकाधिक वापर हा गुन्हे उघडकीस आणण्यासाठी उपयोगाचा ठरत आहे. मुंबई रेल्वेकडे दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण ८५ टक्के आहे. त्यांनी रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्हींचा पुरावा म्हणून वापर करायला सुरुवात केल्याने जाबजबाब लवकर पूर्ण होतात. महिला तक्रारदारांना पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात यावे लागत नाही. महिलांबाबतच्या गुन्ह्यांच्याबाबतीत शक्य असेल तेथे २४ तासांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सिंधुदुर्ग, सोलापूर, गडचिरोली, यवतमाळ अशा ग्रामीण भागांतही लवकर आरोपपत्र गेल्याने आरोपींना तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षा झाल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर ‘सुमोटो’ कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.