शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

महिला विकासासाठी सर्व स्तरातून प्रयत्न

By admin | Updated: January 16, 2017 05:35 IST

समाजाच्या प्रत्येक घटकाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचा सूर भटक्या विमुक्तांच्या संमेलनातील परिसंवादात उमटला.

नाशिक : जग आधुनिक तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना विमुक्त जाती, भटक्या जमातींमधील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक, आरोग्य, आहाराविषयीच्या ज्ञानाचा अभाव असून, महिलांच्या विकासासाठी शासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न होत असले तरी ते तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने समाजाच्या प्रत्येक घटकाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचा सूर भटक्या विमुक्तांच्या संमेलनातील परिसंवादात उमटला.संमेलनात दुसऱ्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील विधी अधिकारी अ‍ॅड. ज्योती भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात प्रा. सुनीता पाटील, ज्योती दुबे, वंदना उगले व कविता मानकर यांनी विचार मांडले. तळागाळातील महिलांपर्यंत शिक्षणासोबतच आरोग्य शिक्षण, आहार आदी विषयांची माहिती पोहोचण्याची गरज व्यक्त करण्यात आली. रघुनाथ राठोड यांनी सरकारने भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावा, भाऊसाहेब भारती यांनी समाजातील स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र विभाग असावा, प्रा. डी. के. गोसावी यांनी भटक्या विमुक्तांसाठी निवारा हक्क मान्य करावा, मधुकर गिरी यांनी समाजातील मुला-मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे, असे ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले. मनीषा राव, गुरुनाथ पेढारकर, सुंदर डांगे, डॉ. रामनाथ वाढे, दत्तात्रय बैरागी, निर्मिती वैद्य, प्रियंका सानप, पापालाल पवार, प्रीतेश बैरागी, भटके विमुक्त संघर्ष परिषद, संघर्ष वाहिनी संस्था यांना भटके विमुक्त भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अ‍ॅड. सुदाम सांगळे, पांडुरंग आंधळे व एन. एम. आव्हाड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)