शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
3
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
4
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
5
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
6
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
7
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
8
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
9
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
12
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
13
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
14
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
15
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
16
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
17
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
18
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
19
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
20
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?

अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न- उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 24, 2016 10:02 IST

फक्त चार शाळकरी मुलांनी ४ बंदूकधार पाहिले आणि सर्व 'प्रौढ' मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती

ऑनलाइन लोकमत,मुंबई, दि. 24 -  काळ्या वेषातील ४ अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचे लक्ष मूळ विषयावरून विचलित करण्यासाठी चार संशयित अतिरेक्यांची अदृश्य भुताटकी निर्माण केली की काय असे लोकांना वाटू लागल्याचे मत सामन्याच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. चार सशस्त्र बंदूकधार्‍यांना फक्त चार शाळकरी मुलांनी पाहिले आणि सर्व 'प्रौढ' मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती असे तरी कसे म्हणता येईल?, असाही खोचक सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. यानिमित्ताने सर्व यंत्रणा कामास लागल्या. दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीम झाली. उरणच्या शालेय विद्यार्थ्यांनी चार बंदूकधारी पाहिले व हे चार बंदूकधारी नंतर अदृश्य झाले. आता हे चार बंदूकधारी आहेत ते जमिनीत गडप झाले नाहीतर हवेत विरून गेले. कारण नौदल, हवाई दल, पोलीस यंत्रणेने जंग जंग पछाडूनही हे चार बंदूकधारी हाती लागलेले नाही, असं सामन्याच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी मत मांडलं आहे. काय म्हटले आहे अग्रलेखात-दिल्लीहून ह्यएनएसजीह्णच्या आठ तुकड्या उरणमध्ये दाखल झाल्या आहेत. एकंदरीत काय तर संपूर्ण उरण शहरास व आजूबाजूच्या गावांस पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. सरकारने अतिसावधान असायलाच हवे. राष्ट्राच्या व जनतेच्या सुरक्षेसाठी हे सर्व आवश्यक आहे, पण उरणमध्ये घुसलेले चार संशयास्पद लोक हे खरोखरच बंदूकधारी दहशतवादी असावेत का? यावर तपास यंत्रणांनी चिंतन करण्याची गरज आहे. उरणमध्ये इतका कडेकोट बंदोबस्त आहे की, तिथे आता मुंगीही शिरणार नाही व बाहेरचे पाखरूही फडफडणार नाही. त्यामुळे आता शिरलेले चार संशयास्पद बहुधा आतल्या आतच गुदमरून ह्यअल्लाह्णस प्यारे होतील. २६-११च्या वेळी जी सतर्कता दाखवायला हवी होती ती उरणच्या बाबतीत दाखवली जात आहे. पठाणकोट व उरीच्या लष्करी तळांबाबत जी गफलत झाली (असे संरक्षणमंत्री कबूल करतात) ती उरणच्या बाबतीत होणार नाही.-चार संशयास्पद अतिरेक्यांची अफवा पसरवून पोलीस यंत्रणेस गुंतवून ठेवायचे आणि दुसर्‍याच एखाद्या जागी घातपात घडवायचे असे कारस्थान तर कोणी रचत नाही ना हेसुद्धा पाहावे लागेल. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात परिस्थिती इतकी नाजूक आहे की, लहानशा अफवेनेसुद्धा राजशकट कोलमडून पडेल अशी भीती वाटावी. लोकांची मने कमालीची अस्थिर बनली आहेत. देशाचे जवान, लष्करी तळे जिथे सुरक्षित नाहीत तिथे आम्हा पामरांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्‍न लोकांच्या मनात आलाच असेल तर ते चुकीचे ठरू नये.-'मराठा' मोर्च्यांची धडक बसत असल्याने अनेकांच्या खुर्च्या हलू लागल्या आहेत. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल काय अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे चार काळ्या वेषातील अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचे लक्ष मूळ विषयावरून विचलित करण्यासाठी चार संशयित अतिरेक्यांची अदृश्य भुताटकी निर्माण केली की काय असेही लोकांना वाटू लागले. चार सशस्त्र बंदूकधार्‍यांना फक्त चार शाळकरी मुलांनी पाहिले व सर्व ह्यप्रौढह्ण मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती असे तरी कसे म्हणता येईल?