शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न- उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 24, 2016 10:02 IST

फक्त चार शाळकरी मुलांनी ४ बंदूकधार पाहिले आणि सर्व 'प्रौढ' मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती

ऑनलाइन लोकमत,मुंबई, दि. 24 -  काळ्या वेषातील ४ अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचे लक्ष मूळ विषयावरून विचलित करण्यासाठी चार संशयित अतिरेक्यांची अदृश्य भुताटकी निर्माण केली की काय असे लोकांना वाटू लागल्याचे मत सामन्याच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. चार सशस्त्र बंदूकधार्‍यांना फक्त चार शाळकरी मुलांनी पाहिले आणि सर्व 'प्रौढ' मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती असे तरी कसे म्हणता येईल?, असाही खोचक सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. यानिमित्ताने सर्व यंत्रणा कामास लागल्या. दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीम झाली. उरणच्या शालेय विद्यार्थ्यांनी चार बंदूकधारी पाहिले व हे चार बंदूकधारी नंतर अदृश्य झाले. आता हे चार बंदूकधारी आहेत ते जमिनीत गडप झाले नाहीतर हवेत विरून गेले. कारण नौदल, हवाई दल, पोलीस यंत्रणेने जंग जंग पछाडूनही हे चार बंदूकधारी हाती लागलेले नाही, असं सामन्याच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी मत मांडलं आहे. काय म्हटले आहे अग्रलेखात-दिल्लीहून ह्यएनएसजीह्णच्या आठ तुकड्या उरणमध्ये दाखल झाल्या आहेत. एकंदरीत काय तर संपूर्ण उरण शहरास व आजूबाजूच्या गावांस पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. सरकारने अतिसावधान असायलाच हवे. राष्ट्राच्या व जनतेच्या सुरक्षेसाठी हे सर्व आवश्यक आहे, पण उरणमध्ये घुसलेले चार संशयास्पद लोक हे खरोखरच बंदूकधारी दहशतवादी असावेत का? यावर तपास यंत्रणांनी चिंतन करण्याची गरज आहे. उरणमध्ये इतका कडेकोट बंदोबस्त आहे की, तिथे आता मुंगीही शिरणार नाही व बाहेरचे पाखरूही फडफडणार नाही. त्यामुळे आता शिरलेले चार संशयास्पद बहुधा आतल्या आतच गुदमरून ह्यअल्लाह्णस प्यारे होतील. २६-११च्या वेळी जी सतर्कता दाखवायला हवी होती ती उरणच्या बाबतीत दाखवली जात आहे. पठाणकोट व उरीच्या लष्करी तळांबाबत जी गफलत झाली (असे संरक्षणमंत्री कबूल करतात) ती उरणच्या बाबतीत होणार नाही.-चार संशयास्पद अतिरेक्यांची अफवा पसरवून पोलीस यंत्रणेस गुंतवून ठेवायचे आणि दुसर्‍याच एखाद्या जागी घातपात घडवायचे असे कारस्थान तर कोणी रचत नाही ना हेसुद्धा पाहावे लागेल. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात परिस्थिती इतकी नाजूक आहे की, लहानशा अफवेनेसुद्धा राजशकट कोलमडून पडेल अशी भीती वाटावी. लोकांची मने कमालीची अस्थिर बनली आहेत. देशाचे जवान, लष्करी तळे जिथे सुरक्षित नाहीत तिथे आम्हा पामरांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्‍न लोकांच्या मनात आलाच असेल तर ते चुकीचे ठरू नये.-'मराठा' मोर्च्यांची धडक बसत असल्याने अनेकांच्या खुर्च्या हलू लागल्या आहेत. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल काय अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे चार काळ्या वेषातील अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचे लक्ष मूळ विषयावरून विचलित करण्यासाठी चार संशयित अतिरेक्यांची अदृश्य भुताटकी निर्माण केली की काय असेही लोकांना वाटू लागले. चार सशस्त्र बंदूकधार्‍यांना फक्त चार शाळकरी मुलांनी पाहिले व सर्व ह्यप्रौढह्ण मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती असे तरी कसे म्हणता येईल?