शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अतिरिक्त पाणीवापराबाबत प्रयत्नशील

By admin | Updated: April 17, 2016 02:03 IST

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याची गरज भागवून उरलेल्या पाण्याचा वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे टाटा पॉवर कंपनीने कळविले आहे.

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याची गरज भागवून उरलेल्या पाण्याचा वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे टाटा पॉवर कंपनीने कळविले आहे. ‘टाटांच्या सहा धरणातील पाणी दुष्काळी भागाला द्या,’ असे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावर कंपनीने आपले स्पष्टीकरण दिले आहे. टाटा पॉवर जलाशयातील पाणी विविध गरजांसाठी वापरले जाते. कात्रज, कोलाड, रोहा, मुळशी, पौड विभाग येथील सिंचन गरजा भागविण्यासाठी आणि पाताळगंगा, रासायनी, रोहा, बदलापूर या क्षेत्रातील औद्योगिक गरजा भागविण्यासाठी सहाही धरणांतील पाण्याचा उपयोग होतो. मुंबईला वीजपुरवठा करण्याच्या मुख्य उद्दीष्टासह इतर अनेक कामांसाठी या जलाशयांतील पाण्याचा वापर व्हायला लागला आहे. यंदा पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे गरज भागवून उरणारे पाण्याचा कसा योग्य वापर करता येईल यासाठी कंपनीचे अधिकारी पुणे तसेच रायगड जिल्ह्यातील सिंचन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समाजाच्या गरजा भागविण्यासाठी टाटा पॉवरने नेहमीच पुढाकार घेतला आहे. १९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्यानंतर निर्माण झालेली भीषण परिस्थिती तसेच देशात विविध ठिकाणी आलेले पूर, चक्रीवादळ आदी आपत्तींच्या वेळी टाटा पॉवरने मदतीचा हात पुढे केला होता. दुष्काळी परिस्थितीविषयी आम्ही तितकेच संवेदनशील आहोत, असेही नमूद केले आहे. (प्रतिनिधी)