शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अतिरिक्त पाणीवापराबाबत प्रयत्नशील

By admin | Updated: April 17, 2016 02:03 IST

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याची गरज भागवून उरलेल्या पाण्याचा वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे टाटा पॉवर कंपनीने कळविले आहे.

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याची गरज भागवून उरलेल्या पाण्याचा वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे टाटा पॉवर कंपनीने कळविले आहे. ‘टाटांच्या सहा धरणातील पाणी दुष्काळी भागाला द्या,’ असे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावर कंपनीने आपले स्पष्टीकरण दिले आहे. टाटा पॉवर जलाशयातील पाणी विविध गरजांसाठी वापरले जाते. कात्रज, कोलाड, रोहा, मुळशी, पौड विभाग येथील सिंचन गरजा भागविण्यासाठी आणि पाताळगंगा, रासायनी, रोहा, बदलापूर या क्षेत्रातील औद्योगिक गरजा भागविण्यासाठी सहाही धरणांतील पाण्याचा उपयोग होतो. मुंबईला वीजपुरवठा करण्याच्या मुख्य उद्दीष्टासह इतर अनेक कामांसाठी या जलाशयांतील पाण्याचा वापर व्हायला लागला आहे. यंदा पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे गरज भागवून उरणारे पाण्याचा कसा योग्य वापर करता येईल यासाठी कंपनीचे अधिकारी पुणे तसेच रायगड जिल्ह्यातील सिंचन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समाजाच्या गरजा भागविण्यासाठी टाटा पॉवरने नेहमीच पुढाकार घेतला आहे. १९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्यानंतर निर्माण झालेली भीषण परिस्थिती तसेच देशात विविध ठिकाणी आलेले पूर, चक्रीवादळ आदी आपत्तींच्या वेळी टाटा पॉवरने मदतीचा हात पुढे केला होता. दुष्काळी परिस्थितीविषयी आम्ही तितकेच संवेदनशील आहोत, असेही नमूद केले आहे. (प्रतिनिधी)