शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतमाता की जय’वरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 4, 2016 03:11 IST

आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात ४५ मिनिटे राज्यातील दुष्काळ आणि विकास कामांबद्दल बोललो. तर अवघी ५ मिनिटे ‘भारतमाता की जय’ आणि शनी शिंगणापूर वादाबद्दल मत मांडले.

मुंबई : आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात ४५ मिनिटे राज्यातील दुष्काळ आणि विकास कामांबद्दल बोललो. तर अवघी ५ मिनिटे ‘भारतमाता की जय’ आणि शनी शिंगणापूर वादाबद्दल मत मांडले. मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.नाशिक येथील जाहीरसभेत शनिवारी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यानी टिष्ट्वटरच्या माध्यमातून खुलासा केला. ‘भारतमाता की जय’च्या वक्तव्यावरून माध्यमातील काही घटक विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या घोषणेचा आणि धर्माचा काही एक संबंध नाही. १७ मार्च रोजी माहीम येथील दर्ग्यात पाचशेहून अधिक मौलवींनी तिरंगा फडकाविला आणि भारतमाता की जयच्या घोषणा दिल्या. हजरत मकदूम फतेह अली माहिमींच्या ६०३व्या उरूसात मान्यवर मौलवींनी केलेल्या या ध्वजारोहणाबद्दल अभिमान वाटतो आणि त्यांना आम्ही सलाम करतो, असेही आपण भाषणात म्हटले होते. मात्र हा सारा भाग माध्यमांनी वगळल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.‘भारतमाता की जय’ ही निव्वळ एखादी घोषणा नाही; हीच घोषणा देत लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्ययुद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली. आजही हजारो जवान याचा घोष करत स्वत:चे सर्वस्व देशासाठी अर्पण करतात, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कोणी ‘जय हिंद’ म्हणो अथवा ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंदुस्थान’ म्हणो, कोणती घोषणा दिली जाते हा अजिबात वादाचा मुद्दा नाही. मात्र जर कोणी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नसेल, म्हणणार नाही अशी भूमिका घेत असेल तर त्याला माझा तीव्र आक्षेप आहे. लांगुलचालनालाही काही मर्यादा घालावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.‘भारतमाता की जय’ला विरोध करणाऱ्यांचा हेतू शुद्ध नाही. समाजात दुही माजवायची आहे, समाजात तेढ निर्माण करायची आहे, अशीच मंडळी घोषणेच्या नावाखाली वाद निर्माण करीत आहेत आणि कोणत्याही स्थितीत अशा लोकांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे मुख्यमत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)