शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

दुष्काळाचे इष्टापत्तीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करु - मुख्यमंत्री

By admin | Updated: August 23, 2015 17:04 IST

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा छावणी व पाण्याचे नियोजन केले असून या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. २३ - मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा छावणी व पाण्याचे नियोजन केले असून या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दुष्काळी भागात रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. 

रविवारी औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी घोषणांचा पाऊसच पाडला. केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी ५५६ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून भविष्यात आणखी निधी मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेणार असून या बैठकीत दिर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करु असे त्यांनी सांगितले. शेतक-यांना अत्यल्प दरात गहू देण्यासोबतच मनरेगाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांना रोजगार उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. चारा छावणी व पिण्याच्या पाण्याचे नियोजन सुरु असून मराठवाड्यातील धरणांमध्ये वरील धरणांमधून कधी पाणी सोडता येईल याचेही नियोजन सुरु असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. जिल्हाधिका-यांनी ग्रामसभा घेऊन दुष्काळी योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतक-यांना होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी सरकारी यंत्रणांना दिले आहे.