शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

पत्रकारांवर हल्ला करणारे अटकेत

By admin | Updated: March 2, 2017 02:59 IST

अनधिकृत इमारत सील करण्याचे काम सुरू असताना त्याचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी दिघा येथे घडला

नवी मुंबई : अनधिकृत इमारत सील करण्याचे काम सुरू असताना त्याचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी दिघा येथे घडला होता. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अद्यापही २५ ते ३० जण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. परंतु घटनेवेळी उपस्थित पोलिसांकडे मदत मागूनही ती वेळेवर न मिळाल्यानेच आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप जखमी महिला पत्रकाराने केला आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर दिघा येथील चार अनधिकृत इमारतींवर मंगळवारी जप्तीची कारवाई सुरू होती. प्रत्यक्षात मात्र त्याठिकाणच्या रहिवाशांनी केलेल्या विरोधामुळे केवळ दोनच इमारतींना सील ठोकण्यात आले असून उर्वरित दोन इमारतींवर पुढील दोन दिवसांत जप्तीची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, दुर्गामाता व अवधूत धाया या दोन इमारतींवर जप्तीची कारवाई सुरू असताना, वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार स्वाती नाईक ह्या लगतच्या इमारतीच्या छतावरून कॅमेरामन संदीप भारती यांच्यासह चित्रीकरण करत होत्या. त्यांना पाहताच उपस्थित जमावापैकी एका गटाने त्यांच्यावर दगडफेक करण्याला सुरवात केली. यामुळे स्वाती नाईक व संदीप भारती यांनी इमारतीबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, काही जण इमारतीमध्ये घुसून त्यांचा शोध घेवू लागले. पर्यायी दोघा पत्रकारांनी त्याच इमारतीमधील एका घरात लपून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी २५ ते ३० जणांचा जमाव येत असल्याची माहिती कारवाईच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला दिली. परंतु त्यांनी मदतीऐवजी ‘तुम्ही त्याठिकाणी गेलाच कशाला’ असा उलट प्रश्न करत प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. अखेर त्या जमावाने पत्रकार लपलेल्या घराचा शोध घेवून तिथल्या सामानाची तोडफोड करत दोघांनाही गंभीर मारहाण केली. यामध्ये संदीप भारती हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर स्वाती नाईक यांनाही दुखापत झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी मंगळवारी रात्री तिघांना अटक केली आहे. अल्लाउद्दीन अन्सारी, मनीष भागणे व नारायण पवार अशी त्यांची नावे आहेत. ते अमृतधाम इमारतीमधील रहिवासी असून या इमारतीवर देखील जप्तीची कारवाई होणार आहे. त्यांना हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्यामागे राजकीय हात असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी सर्व पत्रकारांनी केली आली आहे. शिवाय जमावाकडून पत्रकारांवर झालेला हल्ला यशस्वी होण्याला पोलीस कारणीभूत असल्याचाही आरोप होत आहे. तर घटनेनंतरही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अथवा उपआयुक्त यांच्यापैकी कोणीच साधी चौकशी देखील केली नसल्याचीही खंत स्वाती नाईक यांनी व्यक्त केली आहे. यावरून दोघा पत्रकारांवर जीवघेणा हल्ला होवूनही पोलिसांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)