शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांवर हल्ला करणारे अटकेत

By admin | Updated: March 2, 2017 02:59 IST

अनधिकृत इमारत सील करण्याचे काम सुरू असताना त्याचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी दिघा येथे घडला

नवी मुंबई : अनधिकृत इमारत सील करण्याचे काम सुरू असताना त्याचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी दिघा येथे घडला होता. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अद्यापही २५ ते ३० जण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. परंतु घटनेवेळी उपस्थित पोलिसांकडे मदत मागूनही ती वेळेवर न मिळाल्यानेच आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप जखमी महिला पत्रकाराने केला आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर दिघा येथील चार अनधिकृत इमारतींवर मंगळवारी जप्तीची कारवाई सुरू होती. प्रत्यक्षात मात्र त्याठिकाणच्या रहिवाशांनी केलेल्या विरोधामुळे केवळ दोनच इमारतींना सील ठोकण्यात आले असून उर्वरित दोन इमारतींवर पुढील दोन दिवसांत जप्तीची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, दुर्गामाता व अवधूत धाया या दोन इमारतींवर जप्तीची कारवाई सुरू असताना, वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार स्वाती नाईक ह्या लगतच्या इमारतीच्या छतावरून कॅमेरामन संदीप भारती यांच्यासह चित्रीकरण करत होत्या. त्यांना पाहताच उपस्थित जमावापैकी एका गटाने त्यांच्यावर दगडफेक करण्याला सुरवात केली. यामुळे स्वाती नाईक व संदीप भारती यांनी इमारतीबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, काही जण इमारतीमध्ये घुसून त्यांचा शोध घेवू लागले. पर्यायी दोघा पत्रकारांनी त्याच इमारतीमधील एका घरात लपून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी २५ ते ३० जणांचा जमाव येत असल्याची माहिती कारवाईच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला दिली. परंतु त्यांनी मदतीऐवजी ‘तुम्ही त्याठिकाणी गेलाच कशाला’ असा उलट प्रश्न करत प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. अखेर त्या जमावाने पत्रकार लपलेल्या घराचा शोध घेवून तिथल्या सामानाची तोडफोड करत दोघांनाही गंभीर मारहाण केली. यामध्ये संदीप भारती हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर स्वाती नाईक यांनाही दुखापत झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी मंगळवारी रात्री तिघांना अटक केली आहे. अल्लाउद्दीन अन्सारी, मनीष भागणे व नारायण पवार अशी त्यांची नावे आहेत. ते अमृतधाम इमारतीमधील रहिवासी असून या इमारतीवर देखील जप्तीची कारवाई होणार आहे. त्यांना हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्यामागे राजकीय हात असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी सर्व पत्रकारांनी केली आली आहे. शिवाय जमावाकडून पत्रकारांवर झालेला हल्ला यशस्वी होण्याला पोलीस कारणीभूत असल्याचाही आरोप होत आहे. तर घटनेनंतरही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अथवा उपआयुक्त यांच्यापैकी कोणीच साधी चौकशी देखील केली नसल्याचीही खंत स्वाती नाईक यांनी व्यक्त केली आहे. यावरून दोघा पत्रकारांवर जीवघेणा हल्ला होवूनही पोलिसांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)