शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढतेच

By admin | Updated: March 21, 2016 03:04 IST

राज्यात गेल्या काही वर्षांपासून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा आलेख सातत्याने वाढत राहिला आहे. पाच वर्षांमध्ये तब्बल १५ हजार ४३८ घटना घडल्या आहे.

जमीर काझी, मुंबईराज्यात गेल्या काही वर्षांपासून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा आलेख सातत्याने वाढत राहिला आहे. पाच वर्षांमध्ये तब्बल १५ हजार ४३८ घटना घडल्या आहे. त्यापैकी ६४० गुन्ह्यांतील मारेकऱ्यांचा अद्याप पोलिसांना शोध घेता आलेला नाही. यामध्ये कर्तव्य बजावत असताना पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण जास्त आहे.या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांत सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तब्बल ५७२ हल्ले झाले आहेत. उन्हाळी अधिवेशनासाठी गृह विभागाने बनविलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. कर्तव्य बजावत असताना बेकायदेशीर अथवा गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी लागते. त्यामुळे नाराज झालेले नागरिक, जमावाच्या रोषाला अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. मारहाणीबरोबरच त्यांना चेहऱ्याला काळे फासणे, अंगावर शाई फेकणे असे प्रकारही होतात. त्याला अटकाव करण्यासाठी भारतीय दंड विधान कलमान्वये (आयपीसी) कारवाई केली जाते. अनेकवेळा खटले मागे घेतले जातात किंवा आरोपपत्रामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या जात असल्याने न्यायालयात तो टिकत नाही, हे वास्तव आहे. २०१४मध्ये राज्यात सरकारी अधिकारी आणि पोलिसांना मारहाणीचे ३०८१ गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यापैकी २९५९ घटनांचा तपास पोलिसांकडून करण्यात आला. तर गेल्या वर्षात मारहाणीचे ३३४८ घटना घडल्या आहेत. पैकी १४९ प्रकरणांत आरोपींना पकडता आलेले नाही. या वर्षी २८ फेबु्रवारीपर्यंत मारहाणीच्या तब्बल ५७२ घटना घडलेल्या आहेत. अद्याप २४ गुन्ह्यांतील आरोपींचा शोध लावता आलेला नाही. शिवजयंतीच्या दिवशी सहायक फौजदाराला बेदम मारहाण करून धिंड काढणे, ठाण्यात महिला कॉन्स्टेबलला मारहाण, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक डम्परचालकाकडून नासधूस, गोरेगावमध्ये टॅ्रफिक हवालदाराला ड्युटी बजाविताना मारहाणीची घटना घडली. तर दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमधील कॉन्स्टेबल चाटे यांना मारहाण झाली असताना वरिष्ठांकडून त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याने त्यांनी आत्महत्या केली. मारहाण, कामकाजात अडथळा आणल्यास संबंधितांविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ३३३ व ३३४ अन्वये गुन्हा दाखल केला जातो. न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांना गुन्ह्याच्या तीव्रतेप्रमाणे २ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा व दंडाची तरतूद आहे. मात्र या प्रकरणी शिक्षा झाल्याची प्रकरणे अत्यल्प असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.