शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढतेच

By admin | Updated: March 21, 2016 03:04 IST

राज्यात गेल्या काही वर्षांपासून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा आलेख सातत्याने वाढत राहिला आहे. पाच वर्षांमध्ये तब्बल १५ हजार ४३८ घटना घडल्या आहे.

जमीर काझी, मुंबईराज्यात गेल्या काही वर्षांपासून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा आलेख सातत्याने वाढत राहिला आहे. पाच वर्षांमध्ये तब्बल १५ हजार ४३८ घटना घडल्या आहे. त्यापैकी ६४० गुन्ह्यांतील मारेकऱ्यांचा अद्याप पोलिसांना शोध घेता आलेला नाही. यामध्ये कर्तव्य बजावत असताना पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण जास्त आहे.या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांत सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तब्बल ५७२ हल्ले झाले आहेत. उन्हाळी अधिवेशनासाठी गृह विभागाने बनविलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. कर्तव्य बजावत असताना बेकायदेशीर अथवा गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी लागते. त्यामुळे नाराज झालेले नागरिक, जमावाच्या रोषाला अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. मारहाणीबरोबरच त्यांना चेहऱ्याला काळे फासणे, अंगावर शाई फेकणे असे प्रकारही होतात. त्याला अटकाव करण्यासाठी भारतीय दंड विधान कलमान्वये (आयपीसी) कारवाई केली जाते. अनेकवेळा खटले मागे घेतले जातात किंवा आरोपपत्रामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या जात असल्याने न्यायालयात तो टिकत नाही, हे वास्तव आहे. २०१४मध्ये राज्यात सरकारी अधिकारी आणि पोलिसांना मारहाणीचे ३०८१ गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यापैकी २९५९ घटनांचा तपास पोलिसांकडून करण्यात आला. तर गेल्या वर्षात मारहाणीचे ३३४८ घटना घडल्या आहेत. पैकी १४९ प्रकरणांत आरोपींना पकडता आलेले नाही. या वर्षी २८ फेबु्रवारीपर्यंत मारहाणीच्या तब्बल ५७२ घटना घडलेल्या आहेत. अद्याप २४ गुन्ह्यांतील आरोपींचा शोध लावता आलेला नाही. शिवजयंतीच्या दिवशी सहायक फौजदाराला बेदम मारहाण करून धिंड काढणे, ठाण्यात महिला कॉन्स्टेबलला मारहाण, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक डम्परचालकाकडून नासधूस, गोरेगावमध्ये टॅ्रफिक हवालदाराला ड्युटी बजाविताना मारहाणीची घटना घडली. तर दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमधील कॉन्स्टेबल चाटे यांना मारहाण झाली असताना वरिष्ठांकडून त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याने त्यांनी आत्महत्या केली. मारहाण, कामकाजात अडथळा आणल्यास संबंधितांविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ३३३ व ३३४ अन्वये गुन्हा दाखल केला जातो. न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांना गुन्ह्याच्या तीव्रतेप्रमाणे २ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा व दंडाची तरतूद आहे. मात्र या प्रकरणी शिक्षा झाल्याची प्रकरणे अत्यल्प असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.