शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यावर हल्ला

By admin | Updated: May 13, 2016 04:00 IST

आपल्या मुलीने भावकीतीलच एकाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला म्हणून मुलीकडच्यांनी केलेल्या हल्ल्यात जोडप्यासह पाच जखमी झाले. चार वर्षांपूर्वी लग्न केल्यानंतर हे जोडपे प्रथमच यात्रेसाठी गावात आले होते.

सातारा : आपल्या मुलीने भावकीतीलच एकाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला म्हणून मुलीकडच्यांनी केलेल्या हल्ल्यात जोडप्यासह पाच जखमी झाले. चार वर्षांपूर्वी लग्न केल्यानंतर हे जोडपे प्रथमच यात्रेसाठी गावात आले होते. सध्या गाजत असलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील कथानकासारखा थरार सातारा तालुक्यातील गजवडीत बुधवारी मध्यरात्री घडला.गजवडी (ता. सातारा) येथील विनायक कदम याने गावातीलच उषा हिच्याशी २०१२ मध्ये प्रेमविवाह केला. भावकीत लग्न झाल्याने उषाकडील मंडळी चिडून होती. लग्न झाल्यानंतर विनायक कधीच गावाला आला नाही. लग्नाला चार वर्षे झाली. मुलगाही झाला. आता सगळ्यांचाच राग मावळला असेल, अशी भावना घेऊन ग्रामदैवताच्या पायावर मुलाला घालण्यासाठी विनायक यंदा पहिल्यांदाच गावी आला. जत्रेनिमित्त गजवडीमध्ये अवघे गाव येथे जमा झाले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास विनायकच्या घराकडे हातात कुऱ्हाड, दांडकी, गज घेऊन मुलीकडची मंडळी येत असल्याचे विनायकचे वडील शंकर कदम यांनी पाहिले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने मुख्य लोखंडी दरवाजा आतून बंद करून घेतला. संतप्त झालेल्या या मंडळींनी दारावर पहार आणि दगड मारून तो तोडण्याचा प्रयत्न केला. पुढचे दार तुटत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मागच्या लाकडी दाराकडे मोर्चा वळविला. मागचे दार तोडल्यानंतर विनायकचे वडील पुढे धावले. त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार झाल्याने खोलीत रक्ताच्या चिळकांड्या उडल्या. ते गंभीर जखमी झाले. घरात असलेल्या विनायक आणि उषा यांच्यासह सर्वांना त्यांनी बेदम मारहाण केली. पोलिस पाटील अमन पटेल यांनी तातडीने तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. जखमी शंकर वामन कदम, पार्वती शंकर कदम, दिनकर वामन कदम, विनायक शंकर कदम आणि सुनंदा शंकर कदम यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.याप्रकरणी मुंबई पोलिसांत काम करणारा काका दिनकर नामदेव कदम, शंकर नामदेव कदम, लता शंकर कदम, अनिता दिनकर कदम, अश्विन शंकर कदम यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)