शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

कुख्यात अकीलने दिली होती एटीएसला धमकी

By admin | Updated: November 1, 2016 02:43 IST

अकील युसुफ खिलजी याने औरंगाबाद येथे एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) अधिकाऱ्यांना ‘जेलमधून बाहेर पडताच पाहून घेऊ’ अशी धमकी दिली होती.

यवतमाळ : भोपाळ जेल ब्रेकनंतर एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेला अकील युसुफ खिलजी याने औरंगाबाद येथे एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) अधिकाऱ्यांना ‘जेलमधून बाहेर पडताच पाहून घेऊ’ अशी धमकी दिली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मध्य प्रदेशातील भोपाळचे कारागृह फोडून आणि एका कर्मचाऱ्याचा खून करून प्रतिबंधित सिमी संघटनेचे आठ कार्यकर्ते पळाले. मात्र पोलिसांनी सकाळी भोपाळपासून आठ ते दहा किलोमीटरवर त्यांचे एन्काऊंटर केले. त्यात आठजण मारले गेले. त्यात काही दिवसांपूर्वी औरंगाबाद व अकोला एटीएसने संयुक्तपणे अटक केलेल्या अकील युसुफ खिलजी (खंडवा, मध्य प्रदेश) याचाही समावेश आहे. तर मोहम्मद सलिक ऊर्फ सल्लू अब्दुल हकीम (खंडवा) हा सन २०१२ पासून एटीएसला वॉन्टेड होता. अकील सुमारे अडीच महिने एटीएसच्या ताब्यात होता. त्यावेळी त्याने एटीएसच्या औरंगाबाद कार्यालयात उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जेलमधून सुटताच पाहून घेण्याची धमकी दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष असे, २००८ पासून फरार असलेला सलिक औरंगाबाद, बुलडाण्यातूनही पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता. सोमवारी मात्र चकमकीत मारला गेला. खंडव्यातही केले होते जेल ब्रेकभोपाळपूर्वी मध्य प्रदेशातील खंडवा येथे ३० सप्टेंबर २०१३ ला जेल ब्रेक करण्यात आले होते. यात आठ जणांचा समावेश होता. यातील एक जण सोलापूरचा तर एक गुजरातचा आहे. त्या आठमधीलच दोघे रविवारी रात्री भोपाळ जेल ब्रेक करून पळून जात असताना सोमवारी सकाळी मध्य प्रदेश पोलिसांशी झालेल्या एन्काऊंटरमध्ये मारले गेले. जेल ब्रेकनंतर यातील आरोपींनी खंडवा एटीएसचे पोलीस कर्मचारी सीताराम यादव यांचा खून केला होता, हे विशेष. ‘टीप’ अकीलची, सापडले होते दुसरेच २६ मार्च २०१२ रोजी एटीएसला औरंगाबादमध्ये अकील खिलजी (भोपाळ जेल ब्रेकचा आरोपी) येणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार दुपारी १ वाजता एटीएसचे पथक अकीलची माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता तेथे फायरिंग झाले. तेथे अकील आलाच नाही. मात्र त्याचा मुलगा खलील खिलजी, अबरार व इजहार कुरेशी हे तेथे आले होते. तेथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारीत इजहार कुरेशी मारला गेला. खलील हा सध्या नाशिक कारागृहात असल्याची माहिती आहे. तर अबरारला त्याचवेळी पकडण्यात आले होते. अबरार हा इंदोरचा असून अहमदाबादच्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी आहे. तो सध्या गुजरात कारागृहात असल्याचे सांगितले जाते. एटीएसने २७ मार्च २०१२ ला अकील खिलजी याला बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीपासून २० किलोमीटर अंतरावर तर जफर हुसेन कुरेशी याला १२ किलोमीटर अंतरावर पकडले होते. जफर हा सध्या नागपूर कारागृहात आहे. त्यावेळी याच टोळीतील अन्वर खत्री यालाही पकडण्यात आले होते. तोही सध्या नागपूर कारागृहात आहे. सलीकने दिला होता गुंगारा भोपाळ जेल ब्रेकनंतर सोमवारी एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला मोहम्मद सलीक हा त्यावेळी औरंगाबादमधून फरार होण्यात यशस्वी झाला होता. वास्तविक तो २००८ पासून एका खुनाच्या गुन्ह्यात अकील खिलजी याच्यासोबत फरार झाला होता. दरम्यान सलीकला त्याचे अन्य दोन साथीदार अमजद ऊर्फ ड्रायव्हर ऊर्फ पप्पू शेख रमजान (खंडवा) व जाकीर हुसेन उर्फ सादीक बद्रूल हुसेन (खंडवा) यांच्यासह १७ नोव्हेंबर २०१५ ला ओडिशामधील राऊरकेला येथे अटक करण्यात आली होती. त्यांना ताब्यात घेण्यासाठी अकोला एटीएस, तेलंगणा, मध्य प्रदेश पोलीस प्रयत्नरत होते. मात्र मध्य प्रदेश पोलिसांना सर्वप्रथम त्यांचा ताबा देण्यात आला. कारण तेथे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. याच टोळीने खंडवा जेल ब्रेकनंतर १ फेब्रुवारी २०१४ ला तेलंगणा येथे बँकेत ४५ लाखांचा दरोडा टाकला होता. त्यामुळे तेलंगणा पोलीस त्यांच्या मागावर होते. बॉम्ब बनविण्याचेही प्रशिक्षण मध्य प्रदेशातील सिमी कार्यकर्त्यांच्या याच टोळीतील गुड्डू ऊर्फ शेख मेहबूब शेख इस्माईल हा आपल्या पाच साथीदारांसह उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे राहत होता. तेथे तो बॉम्ब बनवित असताना गंभीररीत्या भाजला होता. या घटनेनंतर तो साथीदारांसह तेथून फरार झाला. अमरावती परिक्षेत्राला मिळाला होता अलर्टभोपाळ जेल ब्रेकनंतर अमरावती परिक्षेत्र पोलिसांना अलर्ट करण्यात आले होते. जेल ब्रेकमधील अनेक आरोपी अमरावती जिल्ह्यातील धारणीला लागून असलेल्या खंडवा येथील असल्याने ते मेळघाटच्या घनदाट जंगलात आश्रय घेण्याची शक्यता होती. त्यामुळेच अमरावती ग्रामीण, अकोला, बुलडाणा पोलिसांना अलर्ट करण्यात आले होते. सतर्कता म्हणून एटीएसची अकोला व अमरावती येथील टीम सकाळीच मेळघाटकडे रवानाही झाली होती.(जिल्हा प्रतिनिधी)