शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

एटीएस मुंबईला आणखी एक उपमहानिरीक्षकपद

By admin | Updated: March 9, 2017 01:55 IST

वाढती देशविघातक कृत्ये व अतिरेकी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी कार्यरत असलेल्या दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) मुंबई विभागासाठी आता उपमहानिरीक्षक

- जमीर काझी,  मुंबई

वाढती देशविघातक कृत्ये व अतिरेकी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी कार्यरत असलेल्या दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) मुंबई विभागासाठी आता उपमहानिरीक्षक (डीआयजी)पद देण्यात आले आहे. पुण्यात कार्यरत असलेले हे पद मुंबईला स्थलांतरित करण्यात आले असून, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व अन्य राज्यातील एटीएसशी समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.एटीएसचे मुंबईतील विशेष महानिरीक्षकपद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे एटीएसप्रमुखावर दिल्लीतील बैठकांचा भार वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील ‘डीआयजी’चे पद मुंबईला हलविण्यात आले आहे, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी ११ आॅगस्टला एटीएसचे विशेष महानिरीक्षक निकेत कौशिक यांची रेल्वे पोलीस आयुक्तपदी बदली झाल्यापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांना अनेकवेळा दिल्लीत होणाऱ्या गुप्तचर यंत्रणांच्या बैठकींना जावे लागे, त्याचप्रमाणे आयजीच्या कामाची जबाबदारीही त्यांच्यावर पडली होती. त्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होऊ लागल्याने अनेकवेळा पुण्यातील उपमहानिरीक्षक सुहास वारके यांना दिल्लीतील बैठका, एटीएसच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाठविण्यात येऊ लागले. मात्र पुण्यातून हे काम हाताळणे अवघड होत असल्याने हे पद मुंबईला स्थलांतर करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याला हिरवा कंदील दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.डीआयजींवर असेल ही जबाबदारीउपमहानिरीक्षकांना आता एटीएसच्या तपासाचे पर्यवेक्षण करणे, अन्य राज्यातील एटीएस/ गुप्तचर यंत्रणा यांच्याशी समन्वय साधणे; तसेच दिल्लीतील समन्वय बैठकामध्ये हजर राहावे लागणार आहे. आयजीचेपद भरण्यात आल्यानंतर या कामाची विभागणी केली जाईल किंवा आवश्यकता वाटल्यास पुन्हा डीआयजीचे पद पुण्याला हलविण्यात येईल, असे सांगण्यात आले.दहशतवादविरोधी पथकासाठी अपर महासंचालक, आयजी व डीआयजीचे प्रत्येकी एक पद मंजूर असून, त्याशिवाय मुंबई व औरंगाबाद विभागात एक उपायुक्त आणि गुप्त वार्तासाठी एका तांत्रिक पदासह दोन अधीक्षक पदे मंजूर आहेत. पैकी आयजीचे पद सात महिन्यांपासून रिक्त असल्याने एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यानंतर उपमहानिरीक्षक सुहास वारके हे ज्येष्ठ अधिकारी आहेत. सुमारे साडेतीन वर्षे राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) प्रतिनियुक्तीवर काम केले असून, मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणात अधिक सक्रिय राहू नये, अशी त्यांनी आपल्याला सूचना केल्याचा आरोप सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रकाद्वारे केला होता. त्यानंतर त्यांची पुन्हा महाराष्ट्र केडरमध्ये बदली करण्यात आली.