शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

एटीएस मुंबईला आणखी एक उपमहानिरीक्षकपद

By admin | Updated: March 9, 2017 01:55 IST

वाढती देशविघातक कृत्ये व अतिरेकी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी कार्यरत असलेल्या दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) मुंबई विभागासाठी आता उपमहानिरीक्षक

- जमीर काझी,  मुंबई

वाढती देशविघातक कृत्ये व अतिरेकी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी कार्यरत असलेल्या दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) मुंबई विभागासाठी आता उपमहानिरीक्षक (डीआयजी)पद देण्यात आले आहे. पुण्यात कार्यरत असलेले हे पद मुंबईला स्थलांतरित करण्यात आले असून, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व अन्य राज्यातील एटीएसशी समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.एटीएसचे मुंबईतील विशेष महानिरीक्षकपद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे एटीएसप्रमुखावर दिल्लीतील बैठकांचा भार वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील ‘डीआयजी’चे पद मुंबईला हलविण्यात आले आहे, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी ११ आॅगस्टला एटीएसचे विशेष महानिरीक्षक निकेत कौशिक यांची रेल्वे पोलीस आयुक्तपदी बदली झाल्यापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांना अनेकवेळा दिल्लीत होणाऱ्या गुप्तचर यंत्रणांच्या बैठकींना जावे लागे, त्याचप्रमाणे आयजीच्या कामाची जबाबदारीही त्यांच्यावर पडली होती. त्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होऊ लागल्याने अनेकवेळा पुण्यातील उपमहानिरीक्षक सुहास वारके यांना दिल्लीतील बैठका, एटीएसच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाठविण्यात येऊ लागले. मात्र पुण्यातून हे काम हाताळणे अवघड होत असल्याने हे पद मुंबईला स्थलांतर करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याला हिरवा कंदील दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.डीआयजींवर असेल ही जबाबदारीउपमहानिरीक्षकांना आता एटीएसच्या तपासाचे पर्यवेक्षण करणे, अन्य राज्यातील एटीएस/ गुप्तचर यंत्रणा यांच्याशी समन्वय साधणे; तसेच दिल्लीतील समन्वय बैठकामध्ये हजर राहावे लागणार आहे. आयजीचेपद भरण्यात आल्यानंतर या कामाची विभागणी केली जाईल किंवा आवश्यकता वाटल्यास पुन्हा डीआयजीचे पद पुण्याला हलविण्यात येईल, असे सांगण्यात आले.दहशतवादविरोधी पथकासाठी अपर महासंचालक, आयजी व डीआयजीचे प्रत्येकी एक पद मंजूर असून, त्याशिवाय मुंबई व औरंगाबाद विभागात एक उपायुक्त आणि गुप्त वार्तासाठी एका तांत्रिक पदासह दोन अधीक्षक पदे मंजूर आहेत. पैकी आयजीचे पद सात महिन्यांपासून रिक्त असल्याने एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यानंतर उपमहानिरीक्षक सुहास वारके हे ज्येष्ठ अधिकारी आहेत. सुमारे साडेतीन वर्षे राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) प्रतिनियुक्तीवर काम केले असून, मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणात अधिक सक्रिय राहू नये, अशी त्यांनी आपल्याला सूचना केल्याचा आरोप सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रकाद्वारे केला होता. त्यानंतर त्यांची पुन्हा महाराष्ट्र केडरमध्ये बदली करण्यात आली.