शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे सहा हजार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 06:16 IST

राज्यात अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कलमांन्वये (अ‍ॅट्रॉसिटी) दाखल गुन्ह्यांचा आलेख जवळपास कायम राहिला आहे.

जमीर काझी  मुंबई : राज्यात अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कलमांन्वये (अ‍ॅट्रॉसिटी) दाखल गुन्ह्यांचा आलेख जवळपास कायम राहिला आहे. दरवर्षी दोन हजारांवर गुन्हे दाखल असून गेल्या तीन वर्षांत तब्बल साडे सहा हजारांवर गुन्हे घडले आहेत. त्यापैकी बहुतांश खटले अद्याप न्यायालयात प्रलंबित आहेत.अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना अटक करण्याबाबत नुकत्याच दिलेल्या निकालाबाबत देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१८ या कालावधीत राज्यातील प्रत्येक पोलीस घटकात दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला आहे. तब्बल ६,८१९ गुन्हे घडले आहेत.राज्यात २०१५मध्ये अ‍ॅट्रॉसिटीचे एकूण २३०४ गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक १३७ घटना या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल अहमदनगर (११६) व पुणे ग्रामीण (११४) गुन्हे दाखल होते. २०१६ व २०१७मध्ये राज्यातील अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.या दोन वर्षांत अनुक्रमे २१५५ व २१५२ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी काही गुन्ह्यांचा तपास अद्याप अपूर्ण आहे, तर अन्य खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.अपुरे मनुष्यबळअनुसूचित जाती जमातीसंबंधीचे गुन्हे अत्यंत गंभीर समजले जातात. त्यामुळे त्याचा तपास हा उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातो. त्याचप्रमाणे या गुन्ह्यासंबंधी आढावा घेण्यासाठी मुख्यालयात विशेष महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयाच्या अंतर्गत विशेष विभाग आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ आणि कामाच्या अन्य ताणामुळे ही गंभीर प्रकरणे तपासाविना रखडल्याची परिस्थिती आहे.