शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

तीन वर्षांत ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे सहा हजार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 06:16 IST

राज्यात अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कलमांन्वये (अ‍ॅट्रॉसिटी) दाखल गुन्ह्यांचा आलेख जवळपास कायम राहिला आहे.

जमीर काझी  मुंबई : राज्यात अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कलमांन्वये (अ‍ॅट्रॉसिटी) दाखल गुन्ह्यांचा आलेख जवळपास कायम राहिला आहे. दरवर्षी दोन हजारांवर गुन्हे दाखल असून गेल्या तीन वर्षांत तब्बल साडे सहा हजारांवर गुन्हे घडले आहेत. त्यापैकी बहुतांश खटले अद्याप न्यायालयात प्रलंबित आहेत.अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना अटक करण्याबाबत नुकत्याच दिलेल्या निकालाबाबत देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१८ या कालावधीत राज्यातील प्रत्येक पोलीस घटकात दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला आहे. तब्बल ६,८१९ गुन्हे घडले आहेत.राज्यात २०१५मध्ये अ‍ॅट्रॉसिटीचे एकूण २३०४ गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक १३७ घटना या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल अहमदनगर (११६) व पुणे ग्रामीण (११४) गुन्हे दाखल होते. २०१६ व २०१७मध्ये राज्यातील अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.या दोन वर्षांत अनुक्रमे २१५५ व २१५२ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी काही गुन्ह्यांचा तपास अद्याप अपूर्ण आहे, तर अन्य खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.अपुरे मनुष्यबळअनुसूचित जाती जमातीसंबंधीचे गुन्हे अत्यंत गंभीर समजले जातात. त्यामुळे त्याचा तपास हा उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातो. त्याचप्रमाणे या गुन्ह्यासंबंधी आढावा घेण्यासाठी मुख्यालयात विशेष महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयाच्या अंतर्गत विशेष विभाग आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ आणि कामाच्या अन्य ताणामुळे ही गंभीर प्रकरणे तपासाविना रखडल्याची परिस्थिती आहे.